शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:17 IST

ब्रम्हगिरी येथील अवैध उत्खननप्रकरणी सात दिवसात चौकशी करून संबंधितांवर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबईत झालेल्या बैठकीत पर्यावरण ...

ब्रम्हगिरी येथील अवैध उत्खननप्रकरणी सात दिवसात चौकशी करून संबंधितांवर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबईत झालेल्या बैठकीत पर्यावरण राज्यमंत्र्यांनी दिले आणि पर्यावरण रक्षणासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला पुन्हा नव्याने पालवी फुटली. त्यास फुलोरा फुटावा आणि अपेक्षांच्या रोपट्याला पाने-फुले यावीत, यासाठी सातत्यपूर्ण कामकाजाचे खतपाणी मिळाले तरच या मोहिमेतील टवटवीतपणा टिकून राहील. असाच काहीसा उत्साह चार महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या टास्क फोर्सच्या निर्णयामुळे निर्माण झाला होता. संतोषा, भागडी येथील पर्वताच्या पायथ्याजवळ सुरू असलेले अवैध उत्खनन तत्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु पर्यावरण कार्यकर्त्यांचा हा आनंद केव्हा विरला हे कुणाला कळलेही नाही. केवळ एका वर्षासाठी स्थापन झालेल्या पर्यावरण टास्क फोर्सच्या बैठका अचानक का थांबल्या, याचे उत्तर पर्यावरण कार्यकर्ते मागत आहेत. त्याचे उत्तर अजूनही मिळत नाही. हीच गत पर्यावरण राज्यमंत्र्यांच्या आदेशाची होऊ नये इतकेच.

पर्यावरणाच्या विषयावर स्थापन झालेला जिल्ह्यातील टास्क फोर्स भारतातील पहिला टास्क फोर्स असल्याचे श्रेय जिल्हा प्रशासनाला मिळून गेले. मात्र, दोन बैठकांनंतर तिसऱ्या बैठकीला अद्याप मुहूर्त लागणार नसेल तर या अतिमहत्त्वाच्या टास्क फोर्सच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. टास्क फोर्स स्थापन झाल्यानंतरही पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना दिल्ली दरबारी आणि मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार असतील तर टास्क फोर्स स्थापन होऊन काय हासील झाले, याचेही उत्तर मिळणे महत्त्वाचे ठरते.

जिल्हा टास्क फोर्स स्थापन झाल्यानंतर दोन बैठका झाल्या. त्यामध्ये कार्यपद्धतीची रूपरेषा ठरून गेली. उपसमित्यांची जबाबदारी संबंधित कार्यकर्त्यांच्या खांद्यावर देण्यात आली. गोदावरी बचाव, दुर्ग संवर्धन, उत्खनन, संस्कृती रक्षण, पुरातन वारसा अशा अनेक समित्यांनी आपापल्या कौशल्याने बैठका घेऊन अहवाल तयार केले आहेत. जोपर्यंत टास्क फोर्सची पुढची बैठक होत नाही तोपर्यंत हे अहवालही फाईलबंदच राहणार असतील तर मग ज्या उदात्त हेतूने टास्क फोर्स स्थापन झाला, त्याचा हेतू सफल होणार नसेल तर टास्क फोर्सकडे कोणत्या अपेक्षेने पाहावे, याचे उत्तरही जिल्हा प्रशासनाकडून मिळणे क्रमप्राप्त ठरते.

आता तर पर्यावरण राज्यमंत्र्यांनीच ब्रम्हगिरी कृती समितीतील सदस्यांना घेऊन सर्वेक्षण समिती गठीत करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या टास्क फोर्सच्या अस्तित्त्वाचाही प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेच यासाठीचा नियोजनबद्ध कृती कार्यक्रम आखला तरच या मोहिमेला आणि टास्क फोर्सलाही जिवंतपणा येऊ शकेल. अन्यथा ब्रम्हगिरीच्या संवर्धनाचे कामकाज मुंबईतून सुरू झाले तर ते कितपत फलद्रुप होऊ शकेल, याचा सारासार विचार सर्वांनाच करावा लागेल. टास्क फोर्सचे नेमके अडले कुठे, हेही एकदाचे स्पष्ट झालेले बरे.

- संदीप भालेराव.