शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
2
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
3
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
4
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
5
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
6
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
7
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
8
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
9
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
10
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
11
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
12
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
13
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
14
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
15
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
20
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले कठोर निर्बंधांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:27 IST

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बुधवारपासून काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. मात्र नाशिककरांकडून ...

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बुधवारपासून काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. मात्र नाशिककरांकडून अजूनही बेफिकिरी दाखविली जात असल्याने परिस्थिती सुधारली नाहीच तर प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील; असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुक्रवारी दिला आहे. येत्या रविवारी परिस्थितीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही मांढरे यांनी जाहीर केले.

काेरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्ह्यात सायंकाळी सात वाजल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळून बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबतचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर चिंता व्यक्त केली. सण, समारंभ तसेच बाजारपेठेतील गर्दी नियंत्रित करण्यासाठी काही प्रमाणात निर्बंध लावण्यात आलेले आहेत. मात्र गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांचे स्वैर वागणे सुरूच असल्याचे दिसून येते. नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन असेच होत राहिले तर कठोर निर्णय घ्यावेच लागतील, असे स्पष्ट संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

याबाबत मांढरे यांनी सांगितले की, मागील वर्षी कोरोनाशी लढत नाशिक जिल्हा सावरत असताना पुन्हा एकदा काेरोनाचे संकट उभे राहिले आहे. गतवर्षीपेक्षा वाईट अवस्थेत हा आजार समोर उभा असताना नागरिकांचे वागणे मात्र स्वैर झाल्याचे दिसत आहे. वास्तविक संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा सर्वांत सोपा आणि प्रभावी मार्ग असताना आपण जिल्ह्यात केवळ काही निर्बंध आणले आहेत. मागील लॉकडाऊनचा अनुभव लक्षात घेता नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि अर्थचक्रही सुरू राहिले पाहिजे, या हेतूने केवळ गर्दी कमी करण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत; परंतु नागरिक त्यास अपेक्षित प्रतिसाद देताना दिसत नाहीत.

सद्य:स्थितीत जिल्ह्यात अडीच हजार पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. मृत्यूचा दर दोन टक्के असून तो अजूनही शून्यावर आलेला नाही. म्हणजे अडीच हजार रुग्णांमागे ५० रुग्णांवर मृत्यूची टांगती तलवार आहे. नागरिक असेच बेजबाबदारपणे वागत राहिले तर प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.

--कोट--

संकट आपल्या कुटुंबावरही

कोराेना नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने काही निर्बंध घातले आहेत. त्या आदेशाचे पालन करणे सर्वांच्याच हिताचे आहे. आपल्या कुटुंबावरही संकट येऊ शकते याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. कोरोनाचे संकट नियंत्रित करण्यासाठी संयम राखायला हवा. कुणीतरी येऊन कारवाई, दंड करील तेव्हाच आपण नियम पाळू, अशी मानसिकता न ठेवता आपण नियमांचे पालन केले तरच संसर्ग मर्यादित करू शकतो.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.