शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले कठोर निर्बंधांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:27 IST

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बुधवारपासून काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. मात्र नाशिककरांकडून ...

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बुधवारपासून काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. मात्र नाशिककरांकडून अजूनही बेफिकिरी दाखविली जात असल्याने परिस्थिती सुधारली नाहीच तर प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील; असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुक्रवारी दिला आहे. येत्या रविवारी परिस्थितीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही मांढरे यांनी जाहीर केले.

काेरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्ह्यात सायंकाळी सात वाजल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळून बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबतचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर चिंता व्यक्त केली. सण, समारंभ तसेच बाजारपेठेतील गर्दी नियंत्रित करण्यासाठी काही प्रमाणात निर्बंध लावण्यात आलेले आहेत. मात्र गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांचे स्वैर वागणे सुरूच असल्याचे दिसून येते. नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन असेच होत राहिले तर कठोर निर्णय घ्यावेच लागतील, असे स्पष्ट संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

याबाबत मांढरे यांनी सांगितले की, मागील वर्षी कोरोनाशी लढत नाशिक जिल्हा सावरत असताना पुन्हा एकदा काेरोनाचे संकट उभे राहिले आहे. गतवर्षीपेक्षा वाईट अवस्थेत हा आजार समोर उभा असताना नागरिकांचे वागणे मात्र स्वैर झाल्याचे दिसत आहे. वास्तविक संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा सर्वांत सोपा आणि प्रभावी मार्ग असताना आपण जिल्ह्यात केवळ काही निर्बंध आणले आहेत. मागील लॉकडाऊनचा अनुभव लक्षात घेता नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि अर्थचक्रही सुरू राहिले पाहिजे, या हेतूने केवळ गर्दी कमी करण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत; परंतु नागरिक त्यास अपेक्षित प्रतिसाद देताना दिसत नाहीत.

सद्य:स्थितीत जिल्ह्यात अडीच हजार पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. मृत्यूचा दर दोन टक्के असून तो अजूनही शून्यावर आलेला नाही. म्हणजे अडीच हजार रुग्णांमागे ५० रुग्णांवर मृत्यूची टांगती तलवार आहे. नागरिक असेच बेजबाबदारपणे वागत राहिले तर प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.

--कोट--

संकट आपल्या कुटुंबावरही

कोराेना नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने काही निर्बंध घातले आहेत. त्या आदेशाचे पालन करणे सर्वांच्याच हिताचे आहे. आपल्या कुटुंबावरही संकट येऊ शकते याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. कोरोनाचे संकट नियंत्रित करण्यासाठी संयम राखायला हवा. कुणीतरी येऊन कारवाई, दंड करील तेव्हाच आपण नियम पाळू, अशी मानसिकता न ठेवता आपण नियमांचे पालन केले तरच संसर्ग मर्यादित करू शकतो.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.