शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

फंडातील कर्मचार्‍यांवर टांगती तलवार

By admin | Updated: May 20, 2014 00:40 IST

आरोग्य विद्यापीठ : सहा प्राध्यापकांना दाखविला घरचा रस्ता

आरोग्य विद्यापीठ : सहा प्राध्यापकांना दाखविला घरचा रस्तासंदीप भालेराव/ नाशिक - २०१७ मध्ये फंडातील कर्मचार्‍यांची मुदत संपणार असून त्यांना यापुढे मुदतवाढ न देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे विद्यापीठ फंडातील सहा प्राध्यापकांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना पुन्हा मुदतवाढ न देता कामावरून कमी करून विद्यापीठाने प्रत्यक्ष कारवाईला सुरूवात केल्याचेही दाखवून दिले आहे. या प्रकारामुळे फंडातील कर्मचार्‍यांच्या नोकरीवर टांगती तलवार आली आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठात काही पदे शासनस्तरावरील असून काही पदे विद्यापीठ फंडातून भरली आहेत. फंडातील कर्मचार्‍यांचा करार हा पाच वर्षांसाठी आहे. साधारणपणे दिड वर्षापूर्वी फंडातील कर्मचार्‍यांची पाच वर्षांची मुदत संपल्याने त्यांना नोकरीवरून कमी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. परंतु कर्मचार्‍यांच्या रेट्यामुळे मोठ्या मुश्किलीने त्यांना २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. हे कर्मचारी २०१७ मध्ये पुन्हा नोकरीवर दावा सांगण्याची शक्यता गृहित धरून विद्यापीठाच्या प्रशासन विभागाने या कर्मचार्‍यांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्याची तयारी चालविली आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार फंडातील कर्मचार्‍यांना भविष्यात नोकरीचा दावा, तसेच नोकरीसाठी न्यायालयात न जाण्याचे शपथेवर सांगावे लागणार आहे. गेल्या १६ रोजी विद्यापीठ फंडातील सहा प्रोफेसरांची मुदत संपल्याने त्यांना मुदतवाढ न देता त्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. याचाच अर्थ विद्यापीठ यापुढे कुणालाही मुददवाढ देण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे विद्यापीठ फंडातील कर्मचार्‍यांमध्ये काहीशी चलबिचल निर्माण झाली आहे. विद्यापीठात सुमारे ३०० पेक्षा जास्त कर्मचारी हे विदयपीठ फंडातील आहेत. विशेष म्हणजे विदयापीठातील सर्व महत्वाच्या ाविभागात हे कर्मचारी कुशलतेने काम करीत आहेत. त्यांचा आजवरचा अनुभव विद्यापीठासाठी उपयुक्त ठरत असतांनाही याच कर्मचार्‍यांच्या मुळावर विद्यापीठ उठल्याने कर्मचार्‍यांमध्ये नुतन कुलसचिवांविषयी संताप आहे. कुलसचिवांवर नाराजीविद्यापीठाचे नुतन कुलसचिव यांनी पदभार घेतल्यानंतर ज्यांचा कार्यकाळ पुर्ण झाला अशा अंदाजे १२ ते १५ प्राध्यापकांना कामावरून कमी केले आहे. तसेच यापुढे फंडातील कर्मचार्‍यांना देखील मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे या कर्मचार्‍यांनी कुठेही दाद मागू नये यासाठी त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्याचीही शक्कल लढविली आहे.त्यानुसार या कर्मचार्‍यांना न्यायालयात देखील जाता येणार नाही की, आंदोलन, मोर्चे काढता येणार नाही. त्यामुळे नोकरीवर गदा आल्याने या कर्मचार्‍यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.