शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

फंडातील कर्मचार्‍यांवर टांगती तलवार

By admin | Updated: May 20, 2014 00:40 IST

आरोग्य विद्यापीठ : सहा प्राध्यापकांना दाखविला घरचा रस्ता

आरोग्य विद्यापीठ : सहा प्राध्यापकांना दाखविला घरचा रस्तासंदीप भालेराव/ नाशिक - २०१७ मध्ये फंडातील कर्मचार्‍यांची मुदत संपणार असून त्यांना यापुढे मुदतवाढ न देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे विद्यापीठ फंडातील सहा प्राध्यापकांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना पुन्हा मुदतवाढ न देता कामावरून कमी करून विद्यापीठाने प्रत्यक्ष कारवाईला सुरूवात केल्याचेही दाखवून दिले आहे. या प्रकारामुळे फंडातील कर्मचार्‍यांच्या नोकरीवर टांगती तलवार आली आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठात काही पदे शासनस्तरावरील असून काही पदे विद्यापीठ फंडातून भरली आहेत. फंडातील कर्मचार्‍यांचा करार हा पाच वर्षांसाठी आहे. साधारणपणे दिड वर्षापूर्वी फंडातील कर्मचार्‍यांची पाच वर्षांची मुदत संपल्याने त्यांना नोकरीवरून कमी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. परंतु कर्मचार्‍यांच्या रेट्यामुळे मोठ्या मुश्किलीने त्यांना २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. हे कर्मचारी २०१७ मध्ये पुन्हा नोकरीवर दावा सांगण्याची शक्यता गृहित धरून विद्यापीठाच्या प्रशासन विभागाने या कर्मचार्‍यांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्याची तयारी चालविली आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार फंडातील कर्मचार्‍यांना भविष्यात नोकरीचा दावा, तसेच नोकरीसाठी न्यायालयात न जाण्याचे शपथेवर सांगावे लागणार आहे. गेल्या १६ रोजी विद्यापीठ फंडातील सहा प्रोफेसरांची मुदत संपल्याने त्यांना मुदतवाढ न देता त्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. याचाच अर्थ विद्यापीठ यापुढे कुणालाही मुददवाढ देण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे विद्यापीठ फंडातील कर्मचार्‍यांमध्ये काहीशी चलबिचल निर्माण झाली आहे. विद्यापीठात सुमारे ३०० पेक्षा जास्त कर्मचारी हे विदयपीठ फंडातील आहेत. विशेष म्हणजे विदयापीठातील सर्व महत्वाच्या ाविभागात हे कर्मचारी कुशलतेने काम करीत आहेत. त्यांचा आजवरचा अनुभव विद्यापीठासाठी उपयुक्त ठरत असतांनाही याच कर्मचार्‍यांच्या मुळावर विद्यापीठ उठल्याने कर्मचार्‍यांमध्ये नुतन कुलसचिवांविषयी संताप आहे. कुलसचिवांवर नाराजीविद्यापीठाचे नुतन कुलसचिव यांनी पदभार घेतल्यानंतर ज्यांचा कार्यकाळ पुर्ण झाला अशा अंदाजे १२ ते १५ प्राध्यापकांना कामावरून कमी केले आहे. तसेच यापुढे फंडातील कर्मचार्‍यांना देखील मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे या कर्मचार्‍यांनी कुठेही दाद मागू नये यासाठी त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्याचीही शक्कल लढविली आहे.त्यानुसार या कर्मचार्‍यांना न्यायालयात देखील जाता येणार नाही की, आंदोलन, मोर्चे काढता येणार नाही. त्यामुळे नोकरीवर गदा आल्याने या कर्मचार्‍यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.