शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नाशकात थंडीचा कडाका कायम

By admin | Updated: January 13, 2017 01:37 IST

नीचांक : किमान तपमान ६.००

नाशिक : राज्यात नाशिक सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून अग्रस्थानावर कायम आहे. किमान तपमानात सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे नाशिककरांना थंडीचा कडाका सहन करावा लागत असून, गुरुवारी (दि. १२) नाशिकची राज्यात सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून पुन्हा नोंद करण्यात आली आहे.गेल्या बुधवारी सकाळी हवामान खात्याने ५.८ अंश इतके हंगामातील सर्वांत नीचांकी तपमान नोंदविले होते. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थंडीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी पारा ५.२ अंशांवर आला आहे.जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून नाशिककर चांगलेच गारठले असून, आतापर्यंत या हंगामातील सर्वांत नीचांकी तपमानाची नोंद बुधवारी हवामान खात्याकडून करण्यात आली. अहमदनगरचे किमान तपमान ६.८, मालेगाव ७.०, पुणे ७.४, सातारा ९.५, सांगली ११.५, सोलापूर १०.६, अकोला ८.०, अमरावती ८.४, महाबळेश्वर ११.८ असे तपमान पुण्याच्या वेधशाळेने नोंदविले आहे.वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, डॉक्टरांकडून पाणी गरम करून पिण्याचा सल्ला दिला जात आहे. शहरामध्ये दोन दिवसांपासून दिवसभर हवेत गारवा क ायम असून, संध्याकाळी त्यात वाढ होत असल्याने नाशिककर सध्या दिवसभर उबदार कपड्यांचा वापर करताना दिसून येत आहे. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारीमध्ये नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचा अनुभव येत आहे.

निफाड @ 4निफाड : तालुक्यातील कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात ४ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तपमानाची नोंद झाल्याने संपूर्ण निफाड तालुका गारठून गेला होता. यावर्षी या तालुक्यात हे ४ अंश सेल्सिअस इतके सर्वात कमी तपमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावर्षी तालुक्यात पाऊस चांगला झालेला असून, कडाक्याच्या थंडीने मधून मधून या तालुक्याला गारठून टाकले आहे.