शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलाने सर्दी-खोकल्याचा वाढला त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:09 IST

बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला असून, सर्दी-खोकल्याच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. थंडी तर कधी अचानकपणे वाढणारे ऊन यामुळे वातावरण असंतुलित झाल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असणाºया नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

नाशिक : बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला असून, सर्दी-खोकल्याच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. थंडी तर कधी अचानकपणे वाढणारे ऊन यामुळे वातावरण असंतुलित झाल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असणाºया नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.  शहराच्या कमाल तपमानात वाढ होण्यास सुरुवात झाल्याने उन्हाचा चटका जाणवत होता. सकाळी ८ वाजेपासून कडक ऊन पडत होते. सलग दहा ते बारा दिवस कमाल तपमान वाढल्यामुळे थंडी गायब होऊन उन्हाळा सुरू झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ लागला होता; मात्र पुन्हा दोन दिवसांपूर्वी कमाल तपमानाचा पारा घसरून पारा दहा अंशांवर आल्याने थंडी जाणवू लागली होती. दोन दिवस किमान तपमान घसरलेले असताना मंगळवारपासून पुन्हा पारा वर सरकू लागला आहे. मंगळवारी (दि.२३) किमान तपमान १२.६ अंश, तर कमाल तपमान २८ अंश इतके नोंदविले गेले.  एकूणच थंडी-ऊन कमी जास्त होऊ लागल्याने वातावरणावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. वातावरण बदलाचा हा फटका नागरिकांना बसू लागला असून, काही नागरिकांना सर्दी-पडसे व खोकल्याचा त्रास होऊ लागला आहे. खासगी दवाखान्यांमध्ये या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. हवामान बदलामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी.  दिवसा उनापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी, हॅट किंवा सनग्लास वापरावा तसेच महिलांनी सनकोट स्कार्फचा वापर करावा तसेच संध्याकाळीदेखील ऊबदार कपडे वापरावे जेणेकरून उन्हाचा चटका व थंड वाºयापासून बचाव होऊ शकेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. खोकला किंवा सर्दीचा त्रास होत असल्यास पाणी उकळून पिण्यास प्राधान्य द्यावे. दुचाकीवर प्रवास करताना नाकातोंडाला रुमाल बांधण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.तपमानात सातत्याने चढ-उतार शहराच्या किमान तपमानात सातत्याने चढ-उतार होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. बुधवारी (दि.२४) किमान तपमान ८.८इतके होते तर गुरूवारी (दि.२५) तपमान कमालीचे घसरले आणि ७.२ इतक्या नीचांकी तपमानाची नोंद झाली. या हंगामातील हे सवार्धिक कमी नीचांकी तपमान ठरले. शुक्रवारी (दि.२६) तपमानात काही अंशी वाढ होऊन ८ अंश इतके तपमान नोंदविले गेले. शनिवारी (दि.२७) ८.८ इतके किमान तपमान होते. एकूणच सातत्याने घसरणाºया किमान तपमानासोबत कमाल तपमानात मात्र या आठवड्यात सतत वाढ होत गेल्याने कमाल तपमानाचा पारा २८ अंशावरून पुरे ३०.६ अंशापर्यंत सरकला आहे. एकूणच नाशिककरांना सध्या कडाक्याच्या ऊन्हासोबत कडाक्याची थंडीही अनुभवयास येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही बदलत्या हवामानाचा परिणाम होत आहे.

टॅग्स :Temperatureतापमान