शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

हवामान बदलाने सर्दी-खोकल्याचा वाढला त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:09 IST

बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला असून, सर्दी-खोकल्याच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. थंडी तर कधी अचानकपणे वाढणारे ऊन यामुळे वातावरण असंतुलित झाल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असणाºया नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

नाशिक : बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला असून, सर्दी-खोकल्याच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. थंडी तर कधी अचानकपणे वाढणारे ऊन यामुळे वातावरण असंतुलित झाल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असणाºया नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.  शहराच्या कमाल तपमानात वाढ होण्यास सुरुवात झाल्याने उन्हाचा चटका जाणवत होता. सकाळी ८ वाजेपासून कडक ऊन पडत होते. सलग दहा ते बारा दिवस कमाल तपमान वाढल्यामुळे थंडी गायब होऊन उन्हाळा सुरू झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ लागला होता; मात्र पुन्हा दोन दिवसांपूर्वी कमाल तपमानाचा पारा घसरून पारा दहा अंशांवर आल्याने थंडी जाणवू लागली होती. दोन दिवस किमान तपमान घसरलेले असताना मंगळवारपासून पुन्हा पारा वर सरकू लागला आहे. मंगळवारी (दि.२३) किमान तपमान १२.६ अंश, तर कमाल तपमान २८ अंश इतके नोंदविले गेले.  एकूणच थंडी-ऊन कमी जास्त होऊ लागल्याने वातावरणावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. वातावरण बदलाचा हा फटका नागरिकांना बसू लागला असून, काही नागरिकांना सर्दी-पडसे व खोकल्याचा त्रास होऊ लागला आहे. खासगी दवाखान्यांमध्ये या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. हवामान बदलामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी.  दिवसा उनापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी, हॅट किंवा सनग्लास वापरावा तसेच महिलांनी सनकोट स्कार्फचा वापर करावा तसेच संध्याकाळीदेखील ऊबदार कपडे वापरावे जेणेकरून उन्हाचा चटका व थंड वाºयापासून बचाव होऊ शकेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. खोकला किंवा सर्दीचा त्रास होत असल्यास पाणी उकळून पिण्यास प्राधान्य द्यावे. दुचाकीवर प्रवास करताना नाकातोंडाला रुमाल बांधण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.तपमानात सातत्याने चढ-उतार शहराच्या किमान तपमानात सातत्याने चढ-उतार होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. बुधवारी (दि.२४) किमान तपमान ८.८इतके होते तर गुरूवारी (दि.२५) तपमान कमालीचे घसरले आणि ७.२ इतक्या नीचांकी तपमानाची नोंद झाली. या हंगामातील हे सवार्धिक कमी नीचांकी तपमान ठरले. शुक्रवारी (दि.२६) तपमानात काही अंशी वाढ होऊन ८ अंश इतके तपमान नोंदविले गेले. शनिवारी (दि.२७) ८.८ इतके किमान तपमान होते. एकूणच सातत्याने घसरणाºया किमान तपमानासोबत कमाल तपमानात मात्र या आठवड्यात सतत वाढ होत गेल्याने कमाल तपमानाचा पारा २८ अंशावरून पुरे ३०.६ अंशापर्यंत सरकला आहे. एकूणच नाशिककरांना सध्या कडाक्याच्या ऊन्हासोबत कडाक्याची थंडीही अनुभवयास येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही बदलत्या हवामानाचा परिणाम होत आहे.

टॅग्स :Temperatureतापमान