शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

आचारसंहिता : मतदारांच्या पार्ट्यांवर लक्ष ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:07 IST

जिल्ह्यत ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारांकरवी नामांकन भरले जात असताना या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता अधिकाधिक कडक करून राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. जाहीर प्रचारावर निर्बंध लावतानाच, उमेदवारी दाखल करण्यासाठी फक्त तीनच कार्यकर्त्यांना मुभा देण्यात आली आहे.

नाशिक : जिल्ह्यत ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारांकरवी नामांकन भरले जात असताना या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता अधिकाधिक कडक करून राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. जाहीर प्रचारावर निर्बंध लावतानाच, उमेदवारी दाखल करण्यासाठी फक्त तीनच कार्यकर्त्यांना मुभा देण्यात आली आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीचे नामांकन आॅनलाइन पद्धतीने भरण्याची सक्ती करण्यात आली असून, यंदा सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून घेण्यात येणार असल्याने त्यादृष्टीने गावातील भाऊबंदकी, राजकीय वैमनस्य या सर्व गोष्टींचा विचार करीत आयोगाने आचारसंहितेच्या माध्यमातून त्यावर निर्बंध आणले आहेत. ज्या जिल्ह्यातील एकूण गावांच्या ५० टक्के ग्रामपंचायतींच्या निवडणुका असतील त्या संपूर्ण जिल्ह्णात आचारसंहिता जारी करण्याचा तर ज्या तालुक्यातील ५० टक्के ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील त्या तालुक्यात संपूर्ण आचारसंहिता जारी करण्यात येणार असून, सध्या ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत त्या ग्रामपंचायतीला लागून असलेल्या गावांमध्येदेखील आचारसंहिता जारी राहणार आहे. ज्या ठिकाणी निवडणुका आहेत त्या ठिकाणी आचारसंहिता जारी असेल, अन्यत्र विकासकामे करण्यास कोणतीही हरकत आयोगाने ठेवली नसली तरी, लगतच्या मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही कृत्य करण्यास मात्र मज्जाव करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यापासून ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाºयाच्या कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात येणार असून, नामांकन भरण्यास येणाºया उमेदवारासोबत फक्त तीन व्यक्तींनाच निवडणूक अधिकाºयाच्या दालनात प्रवेश असणार आहे. गावाचे क्षेत्र तसेच लोकसंख्या मर्यादित असल्यामुळे ग्रामपंचायतीत उमेदवारी करणाºया उमेदवाराला प्रभागात फक्त एकच प्रचार कार्यालय उघडण्यास अनुमती असून, प्रचारासाठी वाहन व कार्यकर्त्यांची गरज नसल्याचे आयोगाने म्हटले आहे; मात्र उमेदवाराने मागणी केल्यास एक चारचाकी किंवा दोन दुचाकी वाहने प्रचारासाठी वापरता येतील त्याची रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे व एका उमेदवाराने वापरलेले वाहन दुसरा उमेदवार प्रचारासाठी वापरू शकणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.