शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

पतसंस्था संचालकांचा घेराव

By admin | Updated: November 13, 2016 01:07 IST

भरणा स्वीकारावा : आर्थिक पुरवठ्याची मागणी

राशिवडे : भोगावती साखर कारखान्यावर प्रशासक आल्याने अनागोंदी कारभाराला आळा बसेल असे वाटत असताना ‘भोगावती’चा कारभार मात्र आर्थिक खाईत रुतत चालला आहे. जंबो भरती करूनही कुशल कामगार पाहिजेत या नावाखाली सेवानिवृत्त कामगारांना परत कामावर रुजू करून घेतले आहे.अधिकाऱ्यांची मनमानी आणि प्रशासकांच्या दुर्लक्षाने ‘भोगावती’चा यावर्षीचा गळीत हंगाम निर्विघ्न व पुढील गळीत हंगामात कारखाना चालू होणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारखाना आर्थिक संकटातून जात असताना जंबो भरती होऊनही कंत्राटी कामगार नेमायचे, अधिकाऱ्यांनी काटकसरीचा कारभार न करता आपली व सग्यासोयऱ्यांची सोय पाहायची यामुळे आधीच डबघाईला आलेल्या कारखान्याला पुन्हा आर्थिक अरिष्टात रुतवायचे काम सुरू आहे.‘भोगावती’ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मागील हंगामात नवीन ५८० जणांची जंबो नोकर भरती झाली; मात्र तज्ज्ञ कामगारांच्या नावावर संचालक मंडळाने अकुशल नातेवाइकांची वर्णी लावली. तज्ज्ञ नसल्याने बॉयलर विभागात वीस, तर उत्पादन विभागाकडे दहा सेवानिवृत्त कामगारांना मासिक पंधरा हजार रुपये पगारावर पुन्हा कामावर घेतले आहे. नवीन नऊ अधिकाऱ्यांनी आपला पगार वाढवून घेतला. हे करताना कोणत्या ठरावाने पगारवाढ घेतली हे प्रशासकीय संचालक मंडळास माहिती नसल्याचे स्पष्ट होत आहे.पूर्णवेळ प्रशासक असूनही दुपारनंतर येणारे प्रशासक, जंबो नोकर भरती करूनही कंत्राटी कामगारांकडून होत असलेले काम यामुळे ‘भोगावती’च्या प्रशासनाच्या कामाबाबत शंका उत्पन्न होत आहे. कार्यक्षेत्रात तज्ज्ञ युवकांची फौज असताना सेवानिवृत्तांना पुन्हा का बोलावून घेतले हा संशोधनाचा विषय आहे. कार्यक्षेत्रात अन्य कारखान्यांच्या ऊसतोड टोळ्या उतरल्याने ऊस बाहेर जाऊ लागला आहे. या हंगामात भोगावती प्रशासनाने पाच लाख टन गळिताचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे आव्हान कसे पेलणार हा प्रश्न आहे. (वार्ताहर)