शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सटाणा तालुक्यात कडकडीत बंद

By admin | Updated: June 4, 2017 02:07 IST

सटाणा : शेतकऱ्याच्या राज्यव्यापी संपाच्या आज शनिवारी तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर संप मागे घेतल्याचे जाहीर केले

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : शेतकऱ्याच्या राज्यव्यापी संपाच्या आज शनिवारी तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर संप मागे घेतल्याचे जाहीर केले असले तरी बागलाण तालुक्यातील शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शनिवारी शहरातील आठवडे बाजार इतिहासात प्रथमच बंद ठेऊन शेतकरी संपला उत्स्फूर्त पाठिंबा दिला.तसेच शहरातील व्यापाऱ्यांनीही दिवसभर दुकाने बंद ठेऊन पाठिंबा दिला.त्यामुळे दिवसभर शहरात शुकशुकाट होता.शेतकर्यांचा सातबारा उतारा कोरा करावा ,शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा आदी मागण्यासाठी ७ जून पर्यंत शेतकरी संपावर उतरला आहे. या राज्यव्यापी संपाला धार देण्यासाठी तीन दिवसांपासून सटाणा ,लखमापूर ,नामपूर ,ताहाराबाद ,जायखेडा ,वीरगाव ,डांगसौंदाणे आदी ठिकाणी रास्तारोको ब आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले होते. शेतकरी क्र ांती मोर्चाचे रामचंद्रबापू पाटील ,पंडितराव भदाणे ,सुभाष नंदन ,पाप्पुतात्या बच्छाव ,राघोनाना अिहरे ,यशवंत पाटील ,यशवंत अिहरे ,शैलेश सूर्यवंशी ,किशोर कदम ,प्रकाश निकम ,पांडुरंग सोनवणे ,ज.ल.पाटील ,दगाबापू सोनवणे आदींनी शनिवारी शहरातील आठवडे बाजार व बाजार पेठ बंदचे आवाहन केले होते. सकाळी देखील क्र ांती मोर्चाचे नगरसेवक राहुल पाटील ,दिनकर सोनवणे ,काका सोनवणे ,आनंद सोनवणे ,धर्मा सोनवणे ,साहेबराव सोनवणे यांनी शहरात रॅली काढून बंदचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला शहर कडकडीत बंद ठेऊन उत्स्फूर्त पाठिंबा दिला.दरम्यान सटाणा शहरात आठवड्याच्या दर शनिवारी साप्ताहिक बाजार भरतो .या बाजारासाठी संपूर्ण कसमादे पट्टयासह साक्र ी तालुक्यातील शेतकरी ,शेतमाल व्यापारी माल विक्र ीसाठी येतात .यामुळे एका दिवसात लाखो रु पयांची उलाढाल होत असते. शेतकऱ्याच्या या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी क्र ांती मोर्चाने बाजार बंदची हाक दिली होती. तसेच किराणा व्यापारी संघटना , सुवर्णकार संघटना , हार्डवेअर असोसिएशन, हॉकर्स युनियन आदींनी दिवसभर दुकाने बंद ठेवल्यामुळे शहरात अघोषित संचारबंदी लागू झाल्याचे चित्र होते.बंद काळात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात होता.