शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

ढगाळ वातावरण : कांदा, डाळींब, गहू, हरबऱ्यावर औषध फवारणी

By admin | Updated: January 24, 2015 23:08 IST

पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

ब्राह्मणपाडे : मोसम खोऱ्यात गेल्या काही महिन्यांपासून सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे कांदा पिकावर करपा व मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. त्यामुळे शेतकरी पीक वाचविण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करताना दिसून येत आहे.मोसम खोऱ्यासह परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. कांदा पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते; मात्र चालू वर्षी निसर्ग जणू काय शेतकऱ्यांची कसोटी पाहत आहे. वटार : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या वटार, चौंधाणे येथे सकाळपासून वातावरणात अचानक बदल होऊन दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे कांदा, डाळींब, गहू, हरबरा या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. परिसरात यंदा बराच काळ थंडीचा जोर असल्यामुळे रब्बी पिके जोमात होती; पण गेल्या काही दिवसांपासून परिसरातील वातावरणात बदल झाला. वातावरणात धड थंडी नाही व धड उन्हाळा नाही, असे ढगाळ व रोगट स्वरूपाचे होते. परिणामी कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात मावा, करपा, पिवळेपणा येणे अशा प्रकारच्या रोगांनी मोठ्या प्रमाणात आक्रमण केले. त्यामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान होऊन उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तसेच डाळींब पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची चिन्हे आहेत. सततच्या वातावरणातील बदलामुळे डाळींब उत्पादक शेतकरी महागडी औषधे फवारणी करून ऐन फळ जोर बसण्याच्या वेळेत निसर्ग लहरीपणा करतो. तोंडात येणारा घास हिसकावला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा धास्तावला आहे. या ढगाळ वातावरणामुळे संकटाचेच ढग घुमत आहेत. (वार्ताहर)