शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
4
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
5
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
6
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
7
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
8
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
9
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
10
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
11
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
12
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
13
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
14
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
15
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
16
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
18
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
19
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
20
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरण : कांदा, डाळींब, गहू, हरबऱ्यावर औषध फवारणी

By admin | Updated: January 24, 2015 23:08 IST

पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

ब्राह्मणपाडे : मोसम खोऱ्यात गेल्या काही महिन्यांपासून सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे कांदा पिकावर करपा व मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. त्यामुळे शेतकरी पीक वाचविण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करताना दिसून येत आहे.मोसम खोऱ्यासह परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. कांदा पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते; मात्र चालू वर्षी निसर्ग जणू काय शेतकऱ्यांची कसोटी पाहत आहे. वटार : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या वटार, चौंधाणे येथे सकाळपासून वातावरणात अचानक बदल होऊन दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे कांदा, डाळींब, गहू, हरबरा या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. परिसरात यंदा बराच काळ थंडीचा जोर असल्यामुळे रब्बी पिके जोमात होती; पण गेल्या काही दिवसांपासून परिसरातील वातावरणात बदल झाला. वातावरणात धड थंडी नाही व धड उन्हाळा नाही, असे ढगाळ व रोगट स्वरूपाचे होते. परिणामी कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात मावा, करपा, पिवळेपणा येणे अशा प्रकारच्या रोगांनी मोठ्या प्रमाणात आक्रमण केले. त्यामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान होऊन उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तसेच डाळींब पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची चिन्हे आहेत. सततच्या वातावरणातील बदलामुळे डाळींब उत्पादक शेतकरी महागडी औषधे फवारणी करून ऐन फळ जोर बसण्याच्या वेळेत निसर्ग लहरीपणा करतो. तोंडात येणारा घास हिसकावला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा धास्तावला आहे. या ढगाळ वातावरणामुळे संकटाचेच ढग घुमत आहेत. (वार्ताहर)