शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

निमगाव-सिन्नर ग्रामस्थांचे टॅँकर बंद केल्याने हाल

By admin | Updated: October 24, 2015 22:31 IST

आरोप : टॅँकर सुरू करण्यास टाळाटाळ

 सिन्नर : तालुक्यातील निमगाव-सिन्नरला तीन आठवड्यांपासून पिण्याच्या पाण्याच्या टॅँकर बंद केल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. टॅँकर सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाहणी करून फेरप्रस्ताव सादर केल्यानंतरही टॅँकर सुरू केला जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महसूल अधिकाऱ्यांकडून टॅँकर सुरू करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सरपंच बाळासाहेब सानप यांनी केला आहे. निमगाव-सिन्नर येथे तीव्र पाणीटंचाई असल्याने गाव व वाड्यावस्त्यांसाठी सहा टॅँकरच्या फेऱ्या मंजूर होत्या. त्यापैकी दररोज चार खेपा येत होत्या. तथापि, गेल्या महिन्यात थोड्या-फार प्रमाणात झालेल्या पावसानंतर टॅँकर बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यावर सरपंच सानप यांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. गावात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यानंतरही सिन्नरच्या पर्जन्यमापकाच्या आकडेवारीहून टॅँकर बंद केल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. २ आॅक्टोबर रोजी ग्रामसभेत टॅँकर बंद करण्यात आल्याचा आरोप आला. त्यावेळी ग्रामसभेत पुन्हा टॅँकर सुरू करण्याचा ठराव करण्यात आला. मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवकाने पाऊस झाल्यानंतर टॅँकर बंद करण्यासाठी कोणताही अहवाल पाठविलेला नसताना टॅँकर कसा बंद झाला, असा सवाल सानप यांनी उपस्थित केला आहे. गावात तीव्र पाणीटंचाई असल्याची तक्रार सरपंच सानप यांच्यासह ग्रामस्थांनी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनीही तहसलीदार मनोजकुमार खैरनार यांना टॅँकर सुरू करण्याबाबत सूचना केल्या. तहसीलदार खैरनार यांनी स्वत: निमगाव-सिन्नर येथे पाहणी केली, त्यावेळी महिलांनी त्यांना तीव्र पाणीटंचाईची माहिती दिली. फेरप्रस्ताव पाठविल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांची स्वाक्षरी झाली नसल्याने टॅँकर सुरू झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. तीन आठवठ्यंपासून टॅँकर बंद असल्याने निमगाव-सिन्नर येथील ग्रामस्थांना तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. गंभीर पाणीटंचाईकडे महसूल अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याची माहिती सरपंच सानप यांनी दिली. (वार्ताहर)गुरुवारी हंडामोर्चा

निमगाव-सिन्नर येथील ग्रामस्थांना तीन आठवड्यांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने महिला संतप्त झाल्या आहेत. येत्या गुरुवारपर्यंत टॅँकर सुरू न झाल्यास तहसील कार्यालयावर हंडामोर्चा काढण्याचा इशारा सरपंच बाळासाहेब सानप यांच्यासह गणेश मुळे, रामनाथ आव्हाड, शिवाजी सानप, मनोहर सानप, परशराम दौंड, शिवाजी सैंद्रे, निवृत्ती सानप यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.