शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

केद्राई धरणातून सोडलेले आवर्तन बंद

By admin | Updated: January 10, 2016 22:50 IST

शेतकरी संतप्त : शासनाचा केला निषेध

वडाळीभोई : खडकओझर येथील केद्राई धरणात अत्यंत कमी पाणी साठा शिल्लक असताना या धरणातून देवरगाव - खडकमाळेगाव या कालव्याला ९ दिवसांपासून पाणी सुरू होते. कालव्याला प्रचंड गळती असल्यामुळे वाहणारे कालव्यातील पाणी नदीत जाऊन नदीवरील  छोटे मोठे बंधारे भरून ते पाणी खडकमाळेगावपर्यंत पोहोचले तरी संबंधित विभागाने या वाया जाणाऱ्या पाण्याकडे लक्ष दिले  नाही, असा आरोप करीत संतप्त शेतकऱ्यांनी पाणी बंद केले. परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी थेट पाणी बंदचा पवित्रा घेऊन धरणावर जाऊन पाण्याचा विसर्ग बंद केला.यावेळी वडाळीभोईचे सरपंच निवृत्ती घाटे, खडकओझरचे सरपंच विजय पगार, सभापती दत्तू पगार, तुकाराम पगार, माधव वाघ, तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते. केद्राई धरणातून देवरगावपर्यंत पाणी सोडण्यास हरकत नव्हती, परंतु सोडलेले पाणी निफाड तालुक्यातील माळेगावपर्यंत जाऊन पोहचले त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले याला जबाबदार कोण असा प्रश्न संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला. तर केद्राई धरणाच्या पाण्याने वडाळीभोई, खडक ओझर, जोपुळ, भाटगाव आदि गावाची धरणाच्या पाण्याने तहान भागवली जाते. या परिसरात दुष्काळी परिस्थिती असतानाही एवढे पाणी वाया गेल्यामुळे प्रशासनाने यावर नियंत्रण ठेऊन पिण्यासाठी पाणी राखून ठेवणे गरजेचे असल्याचे मत वडाळीभोईचे सरपंच निवृत्ती घाटे व परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले.(वार्ताहर)