शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

केद्राई धरणातून सोडलेले आवर्तन बंद

By admin | Updated: January 10, 2016 22:50 IST

शेतकरी संतप्त : शासनाचा केला निषेध

वडाळीभोई : खडकओझर येथील केद्राई धरणात अत्यंत कमी पाणी साठा शिल्लक असताना या धरणातून देवरगाव - खडकमाळेगाव या कालव्याला ९ दिवसांपासून पाणी सुरू होते. कालव्याला प्रचंड गळती असल्यामुळे वाहणारे कालव्यातील पाणी नदीत जाऊन नदीवरील  छोटे मोठे बंधारे भरून ते पाणी खडकमाळेगावपर्यंत पोहोचले तरी संबंधित विभागाने या वाया जाणाऱ्या पाण्याकडे लक्ष दिले  नाही, असा आरोप करीत संतप्त शेतकऱ्यांनी पाणी बंद केले. परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी थेट पाणी बंदचा पवित्रा घेऊन धरणावर जाऊन पाण्याचा विसर्ग बंद केला.यावेळी वडाळीभोईचे सरपंच निवृत्ती घाटे, खडकओझरचे सरपंच विजय पगार, सभापती दत्तू पगार, तुकाराम पगार, माधव वाघ, तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते. केद्राई धरणातून देवरगावपर्यंत पाणी सोडण्यास हरकत नव्हती, परंतु सोडलेले पाणी निफाड तालुक्यातील माळेगावपर्यंत जाऊन पोहचले त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले याला जबाबदार कोण असा प्रश्न संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला. तर केद्राई धरणाच्या पाण्याने वडाळीभोई, खडक ओझर, जोपुळ, भाटगाव आदि गावाची धरणाच्या पाण्याने तहान भागवली जाते. या परिसरात दुष्काळी परिस्थिती असतानाही एवढे पाणी वाया गेल्यामुळे प्रशासनाने यावर नियंत्रण ठेऊन पिण्यासाठी पाणी राखून ठेवणे गरजेचे असल्याचे मत वडाळीभोईचे सरपंच निवृत्ती घाटे व परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले.(वार्ताहर)