शहरं
Join us  
Trending Stories
1
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
2
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
3
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
4
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
5
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
6
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
7
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
8
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
9
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
10
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
13
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
14
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
15
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
16
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
17
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
18
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
19
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
20
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...

केद्राई धरणातून सोडलेले आवर्तन बंद

By admin | Updated: January 10, 2016 22:50 IST

शेतकरी संतप्त : शासनाचा केला निषेध

वडाळीभोई : खडकओझर येथील केद्राई धरणात अत्यंत कमी पाणी साठा शिल्लक असताना या धरणातून देवरगाव - खडकमाळेगाव या कालव्याला ९ दिवसांपासून पाणी सुरू होते. कालव्याला प्रचंड गळती असल्यामुळे वाहणारे कालव्यातील पाणी नदीत जाऊन नदीवरील  छोटे मोठे बंधारे भरून ते पाणी खडकमाळेगावपर्यंत पोहोचले तरी संबंधित विभागाने या वाया जाणाऱ्या पाण्याकडे लक्ष दिले  नाही, असा आरोप करीत संतप्त शेतकऱ्यांनी पाणी बंद केले. परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी थेट पाणी बंदचा पवित्रा घेऊन धरणावर जाऊन पाण्याचा विसर्ग बंद केला.यावेळी वडाळीभोईचे सरपंच निवृत्ती घाटे, खडकओझरचे सरपंच विजय पगार, सभापती दत्तू पगार, तुकाराम पगार, माधव वाघ, तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते. केद्राई धरणातून देवरगावपर्यंत पाणी सोडण्यास हरकत नव्हती, परंतु सोडलेले पाणी निफाड तालुक्यातील माळेगावपर्यंत जाऊन पोहचले त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले याला जबाबदार कोण असा प्रश्न संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला. तर केद्राई धरणाच्या पाण्याने वडाळीभोई, खडक ओझर, जोपुळ, भाटगाव आदि गावाची धरणाच्या पाण्याने तहान भागवली जाते. या परिसरात दुष्काळी परिस्थिती असतानाही एवढे पाणी वाया गेल्यामुळे प्रशासनाने यावर नियंत्रण ठेऊन पिण्यासाठी पाणी राखून ठेवणे गरजेचे असल्याचे मत वडाळीभोईचे सरपंच निवृत्ती घाटे व परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले.(वार्ताहर)