शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
4
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
5
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
6
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
7
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
8
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
9
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
10
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
11
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
12
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
13
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
14
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
15
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
16
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
17
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
18
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
19
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

नाल्याची आॅनलाइन ट्रीटमेंट बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 01:52 IST

नाशिक : नीरीच्या वतीने सोमेश्वरजवळ नाल्यातील प्रदूषित पाण्याचे नैसर्गिक झाडांच्या माध्यमातून शुद्धीकरण करण्यासाठी साकारण्यात आलेला प्रकल्प बंद पडला असून, औद्योगिक क्षेत्रातील हजारो लिटर पाणी गोदापात्रात सहज मिसळले जात आहे.

ठळक मुद्देगोदावरी प्रदूषण : सोमेश्वरजवळील प्रयोगाला घरघर

नाशिक : नीरीच्या वतीने सोमेश्वरजवळ नाल्यातील प्रदूषित पाण्याचे नैसर्गिक झाडांच्या माध्यमातून शुद्धीकरण करण्यासाठी साकारण्यात आलेला प्रकल्प बंद पडला असून, औद्योगिक क्षेत्रातील हजारो लिटर पाणी गोदापात्रात सहज मिसळले जात आहे.गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केल्यानंतर नीरी या संस्थेचे मार्गदर्शन घेतले. त्याचवेळी नीरीने महापालिकेला हा सल्ला दिला होता. परंतु हा प्रस्ताव नंतर रेंगाळला होता. कालांतराने गोदावरी प्रदूषणासाठी पर्यावरणप्रेमी सरसावल्यानंतर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नदी शुद्धीकरणासाठी हा प्रकल्प साकारण्याचे ठरले होते. त्यानुसार सोमेश्वरजवळील नाल्यावर प्रक्रिया करण्यासाठी हा प्रकल्प नीरीने स्वखचाने तयार केला असून, त्यानंतर महापालिकेकडे देखभाल-दुरुस्तीसाठी दिला आहे.नीरी आणि आयआयटी पवई यांनी संयुक्तरीत्या नैसर्गिक झाडांपासून नाल्यातील प्रदूषणकारी घटक शोषून त्यातल्या त्यात चांगले पाणी प्रवाही करण्यासाठी फायटोईड टेक्नॉलॉजीचा हा प्रकल्प शोधून काढला. ज्याप्रमाणे नदीतील काही प्रमाणात प्रदूषित पाणी नैसर्गिक पद्धतीतील नदीतील काही वनस्पती स्वच्छ ठेवतात, त्याच धर्तीवर या प्रकल्पात शुद्धीकरण होते. दगड आणि खड्यांच्या माध्यमातून एक चौथरा तयार केल्यानंतर त्यात कर्दळी संवर्गातील झाडे लावली जातात आणि त्यांच्या मुळातून नाल्याचे पाणी प्रवाही होईल अशी व्यवस्था केली जाते. त्यामुळे आपोआप पाण्यातील काही प्रदूषणकारी घटक शोषले जातात.कुंभमेळ्यापूर्वी हा पथदर्शी प्रकल्प साकारून महापालिकेच्या ताब्यात दिल्यानंतर त्याची देखभाल करणे महापालिकेचे काम असतानादेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सध्या या प्रकल्पाची दुरवस्था झाली असून, फेसाळ पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. औद्योगिक वसाहतीतील हे रसायनयुक्त पाणी असून, ते थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने गोदावरी अधिक प्रदूषित होण्यास मदत होते आहे. दुरुस्ती आश्वासनाकडे दुर्लक्षकाही महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी सदस्य तसेच विविध शासकीय अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. त्यावेळी या प्रकल्पाची अवस्था चांगली नव्हतीच. मनपाच्या अधिकाºयांनी याबाबत दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले आहे.