शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

सभागृहात हुशारी, कामकाजात अडाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:20 IST

पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून थेट पंचायतराज व्यवस्था बळकट करण्यासाठी ग्रामपंचायतींना निधी वर्ग केला जातो. यंदा मात्र पंचायतराज ...

पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून थेट पंचायतराज व्यवस्था बळकट करण्यासाठी ग्रामपंचायतींना निधी वर्ग केला जातो. यंदा मात्र पंचायतराज व्यवस्थेतून पंचायत समित्या, जिल्हा परिषदांनादेखील दहा-दहा टक्के निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, जेणेकरून सदस्यांना आपल्या गटात विकासकामे करता यावीत. परंतु, ही कामे करताना त्यातील पन्नास टक्के बंधित व पन्नास टक्के अबंधित कामांवर खर्च व्हावा, असे अपेक्षित धरण्यात आले आहे. बंधितची कामे व अबंधितची कामे काय असतील, हे देखील शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे इतके सरळधोपट नियम असताना, ७२ सदस्यांपैकी निम्म्या सदस्यांनी आपल्या गटात कामे सुचविताना बंधित व अबंधित कामांची वर्गवारी करताना चुका केल्या आहेत. परिणामी, अगोदरच वर्षभरापासून रखडलेल्या निधी खर्चाचे नियोजन आपसूकच आणखी पुढे ढकलले गेले आहे. एकीकडे गटात विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची सभागृहात ओरड करायची व दुसरीकडे मिळालेला निधी खर्च कोठे व कसा करायचा, याबाबत अनभिज्ञ राहायचे असाच हा प्रकार आहे. मुळात पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी खर्चाच्या नियोजनास उशीर झाला आहे. त्यात प्रत्येक वेळा सदस्यांकडून कामांमध्ये फेरबदल, दुरुस्ती सुचविली जात असल्याने परिपूर्ण प्रस्ताव तयार करून तो प्रशासनाकडे पाठविण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे आज काम सुचविले आणि आठवडाभरात त्याची सुरुवात झाली, अशी जादूची कांडी फिरवल्यागत कधी होत नाही, शासकीय कामात तर नाहीच नाही. त्यामुळे गेल्या साडेचार वर्षांत जिल्हा परिषद सदस्य म्हणून कामकाज करताना इतका अंदाजही जर सदस्यांना येऊ शकत नसेल, तर त्यांची कारकीर्द वाया गेली असेच म्हणावे लागेल. मात्र, ज्यांनी याचा अचूक अंदाज बांधला त्यांना शाबासकी द्यावी लागेल, ती यासाठी की, त्यांना ‘खऱ्या’ अर्थाने जिल्हा परिषद कळाली असेच म्हणावे लागेल. बाकी राहिला प्रश्न कामांचा तर विद्यमान सदस्यांच्या काळात त्याची फळे जनतेला चाखायला मिळाली तरी पुरे झाले.

-श्याम बागुल