शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पावसाची सर्वदूर हजेरी; इगतपुरीत अतिवृष्टी

By admin | Updated: June 24, 2017 18:32 IST

आषाढ महिन्याच्या पहिल्याच दिवशी आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : आषाढ महिन्याच्या पहिल्याच दिवशी आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली असून, इगतपुरी येथे अतिवृष्टी होऊन सर्वत्र जलमय वातावरण झाले तर पेठ व त्र्यंबकेश्वर येथेही दिवसभर पाऊस सुरूच राहिला. नाशिक शहरातही शनिवारी पहाटेपासून पावसाने मुक्काम ठोकल्यामुळे शहरातील जनजीवन दिवसभर विस्कळीत झाले. दरम्यान, पावसाच्या दमदार हजेरीमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होऊन धरणांच्या साठ्यातही वाढ होऊ लागली आहे.यंदा पाऊस सरासरी इतकाच होणार असल्याचा तसेच मान्सून वेळेत दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे पावसाची प्रतीक्षा केली जात होती. मृग नक्षत्रात हजेरी लावून गेलेल्या पावसाने गेल्या दहा दिवसांपासून दडी मारल्यामुळे हवामान खात्याचा अंदाज चुकतो की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. परंतु महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याच्या वृत्ताने सर्व सुखावलेले असताना शुक्रवारी रात्रीपासूनच पावसाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. त्र्यंबकेश्वर येथे शुक्रवारी रात्रीतून ७० मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. शनिवारी पहाटेपासून मात्र पावसाने सर्वत्र जोर धरला. नाशिक शहरातही सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने संततधार लावली. दिवसभर सूर्यदर्शनही दुर्लभ झाले. पावसाच्या हजेरीने हवामानात बदल झाला असून, गारवा निर्माण झाला आहे. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठ, सुरगाणा व इगतपुरी येथे दिवसभर मुसळधार पाऊस झाला. इगतपुरी येथे सायंकाळी पाच वाजेपर्यंत १५७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली तर सुरगाणा येथेही ७४ मिलिमीटर तर त्र्यंबक येथे १२० मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे.