शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

साफसफाईचा देखावा

By admin | Updated: April 29, 2016 03:31 IST

डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी खाडीपर्यंत वाहून नेणाऱ्या नाल्यांचे अस्तित्व धोक्यात येवू लागले आहे.

नामदेव मोरे,

नवी मुंबई-डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी खाडीपर्यंत वाहून नेणाऱ्या नाल्यांचे अस्तित्व धोक्यात येवू लागले आहे. प्रत्येक वर्षी नालेसफाईचा फक्त देखावा केला जात आहे. ७४ किलोमीटर लांबीच्या नाल्यांच्या पात्रात अतिक्रमण होत आहे. झोपड्यांचे बांधकाम सुरु असून, पालिका एकत्रित नाला व्हिजनच्या नावाखाली या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे.नवी मुंबईमध्ये विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास केला जात आहे. शहराच्या एका बाजूला डोंगर व दुसऱ्या बाजूला खाडी आहे. पावसाळ्यामध्ये डोंगरावरील पाणी मुख्य नाल्यांमधून खाडीमध्ये मिसळते. शहरातील मुख्य नाले सुरक्षा कवचाची भूमिका पार पाडत आहेत. परंतु मागील काही वर्षांमध्ये नाल्यांच्या काठावर अतिक्रमण होवू लागले आहे. भराव टाकून पात्र अरुंद केले जात आहे. एमआयडीसीमध्ये मुख्य नाल्यामध्ये डेब्रिज टाकले जात आहे. बोनसरी, इंदिरानगर, खैरणे एमआयडीसी, दिघा व इतर अनेक ठिकाणी मुख्य नाल्याला लागून झोपड्या बांधल्या जात आहेत. शहराच्या सुरक्षेला धोका पोहोचविणाऱ्या या अतिक्रमणाकडे महापालिका व एमआयडीसी प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.महापालिका प्रत्येक वर्षी पावसाळापूर्व नालेसफाईची कामे करण्यासाठी लाखो रुपये खर्च करत आहे. यामध्ये मुख्य नाल्यांमधील अडथळे दूर करण्याच्या कामांचाही समावेश आहे. फक्त काही ठिकाणी साचलेला गाळ काढला जातो. परंतु मुख्य नाल्याच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत नाल्यातील डेब्रिज काढले जात नाही. अनेक ठिकाणी पात्र अरुंद झालेले आहे. पात्र पुन्हा पूर्ववत करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नाल्यांच्या काठावरील अतिक्रमण हटविले जात नाही. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपये खर्च करुन साफसफाई केल्याचे दाखविले जात आहे. जुईनगरजवळील नाल्यातील गाळ कित्येक वर्षांमध्ये काढलेला नाही सानपाडा ते जुईनगरदरम्यान नाल्यातील गाळ काढला नाही तर पाणी रोडवर येण्याची शक्यता आहे. अनेक नाल्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासन दहा वर्षांपासून एकत्रित नाला व्हिजन राबविण्याचे आश्वासन देत आहे.जेएनएनयूआरएमअंतर्गत नाला व्हिजन राबविण्यात येणार होते. परंतु प्रत्यक्षात काहीच कार्यवाही झालेली नाही. शहरामधील सर्व नाल्यांचे सर्वेक्षण करण्याची गरज आहे. महापालिकेकडे शहराची छायाचित्रे आहेत. १२ ते १३ वर्षात कुठे अतिक्रमण झाले, कुठे भराव टाकण्यात आला याचा प्राथमिक अंदाज येवू शकतो. नाल्याच्या काठावर झालेली बांधकामे हटविण्यासाठी तत्काळ कारवाई सुरु केली नाही तर भविष्यात पावसाचे पाणी झोपडपट्टीमध्ये व शहरात जावून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशाकडेही दुर्लक्षबोनसरी परिसरामध्ये काही भूमाफियांनी नाल्यामध्ये भराव टाकून झोपड्या व व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम केले होते. याविषयी शिवसेना पदाधिकारी महेश कोठीवाले व इतर रहिवाशांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर एमआयडीसीने कारवाई केली परंतु दोन महिन्यात पुन्हा तिथे अतिक्रमण झाले आहे.