शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

स्वच्छता कर्मचाऱ्यांची उघड्यावर ‘डबापरेड’

By admin | Updated: August 4, 2015 22:42 IST

हालच हाल : सोळाशे कर्मचाऱ्यांना ना निवास, ना शौचालय

नाशिक : कुंभमेळ्याच्या काळात स्वच्छतेसाठी उत्तर प्रदेशातून पाचारण करण्यात आलेल्या तब्बल सोळाशे कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. आठवड्याभरापूर्वी मुला-बाळांसह दाखल झालेल्या या कर्मचाऱ्यांची ना निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे ना शौचालयाची. साधुग्राममध्ये एका नाल्याच्या कडेला उघड्यावर राहत असलेल्या यांपैकी काही कर्मचाऱ्यांना साधूंकडूनही अपमानास्पद वागणूक मिळत आहे. एवढेच नव्हे, तर शौचालयांअभावी त्यांना उघड्यावरच नैसर्गिक विधी करावे लागत असल्याने स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशातील चार ठेकेदारांकडून प्रशासनाने सफाई कर्मचाऱ्यांना नाशकात बोलावले आहे. अलाहाबाद, बांदा व फतेहपूर जिल्ह्यांतील या कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा देऊ, असे आश्वासन मिळाल्याने ते नाशकात दाखल झाले; मात्र प्रारंभीचे काही दिवस त्यांना उघड्यावरच राहावे लागले. ठेकेदाराकडे तक्रार केल्यानंतर काही कर्मचाऱ्यांची व्यवस्था काही पत्र्याच्या खोल्यांत करण्यात आली, तर उर्वरित कर्मचाऱ्यांच्या हातात मेणकापड देऊन ‘तुम्हीच कोठेही तंबू बांधून घ्या’, असे सांगण्यात आले. या कर्मचाऱ्यांनी नाल्याच्या कडेला तंबू उभारले खरे; पण तेथे वीज, पाण्यासह अन्य कोणत्याही सुविधा नाहीत. शेजारी साधूंची स्नानगृहे, शौचालये आहेत; मात्र तेथून साधू त्यांना हाकलून देत आहेत. यापैकी काही कर्मचाऱ्यांना दिलेल्या पत्र्याच्या खोल्याही अपुऱ्या असून, दहा जणांच्या जागेत पंचवीस कर्मचाऱ्यांना कोंबण्यात आले आहे. बायका-मुलांसह आलेल्या या कर्मचाऱ्यांचे रोजच हाल सुरू असून, या अवस्थेतच त्यांना काम करावे लागत आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४, ४ ते रात्री १२ व १२ ते सकाळी ८ अशा तीन शिफ्टमध्ये त्यांचे काम चालते. दगडांवर चूल करीत त्यावरच हे लोक अन्न शिजवत असून, पाऊस आल्यावर त्यातही व्यत्यय येत असल्याचे यातील काही कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)साधू म्हणतात, यांना हाकलासाधुग्राममध्ये राहत असलेल्या या कर्मचाऱ्यांना तेथून हाकलण्याची मागणी साधू करीत आहेत. ‘ये लोग सब दूषित कर देंगे’ असे साधूंचे म्हणणे असून, या कर्मचाऱ्यांच्या महिला व मुलांनाही स्नानगृहे, शौचालयांचा वापर करण्यास मज्जाव करीत आहेत. येणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोखलेनाशिकमध्ये दाखल झालेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनाच राहायला जागा शिल्लक नसल्याने ठेकेदारांनी आता उत्तर प्रदेशातून येणाऱ्या आणखी कर्मचाऱ्यांना रोखले आहे. आहे त्या कर्मचाऱ्यांचेच प्रचंड हाल होत असल्याने वाढीव कर्मचाऱ्यांची डोकेदुखी नको, असा विचार करीत ठेकेदारांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. चार्जिंगसाठी पाच रुपये!या कर्मचाऱ्यांना विजेची सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकांचे मोबाइल बंद पडले आहेत. काही जण साधूंकडे व अन्य ठिकाणांहून पाच रुपये देऊन मोबाइल चार्ज करवून घेत आहेत. याशिवाय वीज नसल्याने कर्मचाऱ्यांना रात्रही अंधारातच काढावी लागत आहे.लपून-छपून शौचालयातसाधू शौचालयात जाऊ देत नसल्याने त्यांची नजर चुकवून स्वच्छता कर्मचाऱ्यांना शौचासाठी जावे लागत आहे. काही कर्मचारी तर कामाच्या ठिकाणीच नैसर्गिक विधी उरकून घेत आहेत. तर काही कर्मचारी उघड्यावरच शौचासाठी बसत असल्याने परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.