शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

येवला शहरात स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:24 IST

स्वच्छ भारत अभियानास तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येवल्यात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणात नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

येवला : स्वच्छ भारत अभियानास तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येवल्यात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणात नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याधिकारी दिलीप मेनकर, नगरसेवक गणेश शिंदे, शिफक शेख, प्रवीण बनकर, रु पेश लोणारी, अमजद शेख, प्रमोद सस्कर, सचिन शिंदे, छाया क्षीरसागर, पद्मा शिंदे, निसार शेख यांच्यासह मुक्तानंद महाविद्यालयाचे प्राचार्य बी. बी. रहाणे, एन्झोकेम विद्यालयाचे प्राचार्य विजय नंदनवार, मुख्याध्यापक राजेंद्र चिंचले, गौरव कांबळे, बाळू जगताप, उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होत विद्यालय परिसर स्वच्छ करून अभियानाला सुरुवात केली. यानंतर सुरेश कोल्हे यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी प्राध्यापक सुदाम पातळे व अजय विभांडिक यांनी राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत विद्यार्थ्यांचे पाच पथक तयार केले. या पथकांसह मान्यवरांनी सेनापती तात्या टोपे स्मारक, क्रीडा संकुल, ग्रामीण रुग्णालय परिसर, हुडको वसाहत व प्रशासकीय इमारतीमध्ये स्वच्छता अभियान राबविले.  दत्ता महाले यांनी सूत्रसंचालन केले. मुख्य लिपिक बापू मांडवडकर यांनी आभार मानले. यावेळी उपमुख्याधिकारी आर. आय. शेख, स्वच्छता निरीक्षक एस. टी. संसारे, घनश्याम उंबरे, राजेश दाणेज, श्रावण जावळे, शिवशंकर सदावर्ते, सुरेश गोंडाळे, अशोक कोकाटे, दत्तात्रय गुंजाळ, प्रशांत पाटील, शशिकांत मोरे, श्रावण जावळे यांच्यासह स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले.