शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

शुद्धीकरण केंद्रासह जलकुंभाची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 00:13 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत प्रशासनाने जंतुमिश्रित पाणीपुरवठ्याची दखल घेत जलशुद्धीकरण केंद्र व गावातील जलकुंभाची स्वच्छता करण्यात आली आहे. जलकुंभाची स्वच्छता करण्यात आल्याने गुरुवारी (दि.१६) कोरडा दिवस पाळला जाणार असून, त्या दिवशी गावात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले आहे.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत प्रशासनाने जंतुमिश्रित पाणीपुरवठ्याची दखल घेत जलशुद्धीकरण केंद्र व गावातील जलकुंभाची स्वच्छता करण्यात आली आहे. जलकुंभाची स्वच्छता करण्यात आल्याने गुरुवारी (दि.१६) कोरडा दिवस पाळला जाणार असून, त्या दिवशी गावात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले आहे.नांदूरशिंगोटे गावातील नळांना मंगळवारी जंतुमिश्रित पाणीपुरवठा झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. नळाद्वारे चक्क जिंवत अळ्या आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाने दखल घेत तत्काळ उपाययोजना करण्यात आली आहे. गावाला कणकोरीस पाचगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. सदरची योजना भोजापूर धरणातून राबविण्यात आली असून, चास खिंडीत योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. दरम्यान, बुधवारी (दि. १५) सरपंच गोपाल शेळके, उपसरपंच रंजना शेळके, ग्रामविकास अधिकारी एस. डी. आहिरे, आरोग्यसेवक ए. बी. गांगुर्डे यांनी जंतुमिश्रित पाणी-पुरवठ्याची दखल घेत सकाळीच जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन पाहणी केली व तात्काळ स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी तसेच खासगी कर्मचाऱ्यांच्या मदतीने जलशुद्धीकरण केंद्रातील उपकरणांची पावडरच्या साहाय्याने स्वच्छता केली. तसेच नांदूरशिंगोटे येथील गावाला पाणीपुरवठा करणाºया दोन्हीही जलकुंभाची स्वच्छता केली.-------------------नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत: दिवसभर थांबून मोहीम राबवून घेतली. पावसाळ्याचे दिवस असल्याने विविध साथरोग पसरू नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने कोरडा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे.जलकुंभाची स्वच्छता झाल्याने एक दिवस त्यामध्ये पाणी साठवले जाणार नाही. त्यामुळे गुरु वारी गावाला पाणीपुरवठा होणार नसल्याने महिला व ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक