शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

शहर विकास आराखडा थेट सरकारला होणार सादर

By admin | Updated: February 5, 2015 00:17 IST

प्रकाश भुक्ते : पुन्हा महासभेवर मांडणी नाही

नाशिक : नव्याने तयार होत असलेला शहर विकास आराखडा महापालिकेच्या महासभेवर मांडला जाणार नसून, तो नागरिकांच्या हरकती-सूचनांनंतर थेट सरकारला सादर केला जाणार असल्याचे आराखडाकार आणि नगररचना उपसंचालक प्रकाश भुक्ते यांनी स्पष्ट केले आहे. भुक्ते यांच्या या खुलाशाने विकास आराखड्याबाबत आता महापालिकेचा कोणताही संबंध उरलेला नसून शासनच त्यावर अंतिम निर्णय जाहीर करणार आहे.शहर विकास आराखडा फुटल्यानंतर त्यावर महासभेत जोरदार चर्चा होऊन तो फेटाळण्यात आला होता. त्यानंतर शासनाने महापालिकेला आराखड्याचे काम न सोपविता नगररचना उपसंचालक प्रकाश भुक्ते यांच्याकडे नव्याने आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपविली. त्यानुसार आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महापालिकेत भुक्ते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी सदर आराखडा महासभेवर ठेवण्याची सूचना केली असता भुक्ते यांनी कायदेशीरदृष्ट्या तसे ठेवता येत नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी भुक्ते यांनी सांगितले, आराखडा तयार झाल्यानंतर जनतेच्या हरकती-सूचना मागविल्या जातील. त्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला जाईल. महापालिकेलाही त्यात सूचना व हरकती मांडण्याचा अधिकार आहे. सदर हरकती व सूचना नियोजन समितीकडे छाननीसाठी जाईल. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उपसंचालक अंतिम निर्णय घेऊन तो सरकारला सादर करतील. कायद्यातील तरतुदींनुसारच आराखडा तयार करण्यात येत असून, तो आता पुन्हा महापालिकेकडे मांडला जाणार नाही. दोन महिन्यांत आराखडा सादर करण्याचे प्रयत्न आहेत. आणखी मुदतवाढ मागितली जाऊ शकते; परंतु अर्धवट स्थितीत कोणतेही काम ठेवले जाणार नसल्याचेही भुक्ते यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)