शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

शहर बस तोट्यात की नफ्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:32 IST

नाशिक : परिवहन महामंडळामार्फत नाशिक शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करणारी शहर बससेवा तोट्यात चालत असल्याचे कारण देत ही सेवा बंद करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एसटीच्या विभाग नियंत्रकांनी मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून शहर बससेवेच्या शहरी फेऱ्यांचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करण्यात आल्याने शहर बस वाहतुकीचा तोटा कोटीवरून लाखावर आल्याचे लेखी मान्य केल्यामुळे ही बससेवा तोट्यात की नफ्यात, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.

ठळक मुद्देविभाग नियंत्रकांची परस्परविरोधी भूमिकापरिवहन महामंडळाच्या या परस्पर विरोधी भूमिकेबद्दल आश्चर्य

नाशिक : परिवहन महामंडळामार्फत नाशिक शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करणारी शहर बससेवा तोट्यात चालत असल्याचे कारण देत ही सेवा बंद करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एसटीच्या विभाग नियंत्रकांनी मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून शहर बससेवेच्या शहरी फेऱ्यांचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करण्यात आल्याने शहर बस वाहतुकीचा तोटा कोटीवरून लाखावर आल्याचे लेखी मान्य केल्यामुळे ही बससेवा तोट्यात की नफ्यात, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.नाशिक शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करणाºया शहर बससेवेच्या फेºया गेल्या वर्षी तोट्याचे कारण दाखवून बंद करण्याचे प्रकार परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. वर्षानुवर्षे शहरातील प्रवाशांची वाहतूक करणारी बससेवा अचानक तोट्यात कशी गेली, असा सवाल त्यावेळी करण्यात येऊन बंद केलेल्या प्रवासी फेºया सुरू करण्याच्या मागणीसाठी राजकीय पक्षांनी आंदोलनेही केली. बस फेºयांच्या कपातीमुळे नोकरदार, शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असताना परिवहन महामंडळाने शहर बससेवा बंद करून ती नाशिक महापालिकेने चालवावी, असा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला व त्यामागे दरमहा होणाºया आर्थिक तोट्याचे कारण दिले आहे.नाशिक महापालिकादेखील शहर बससेवा चालविण्यास उताविळ झाल्याने त्यांनी या संदर्भातील व्यवहार्यता तपासण्यासाठी पैसे खर्च करून तांत्रिक सल्लागाराची नेमणूक केली आहे. असे असताना सदरची बससेवा परिवहनशहर बस तोट्यात की नफ्यात?(पान १ वरून)महामंडळानेच चालवावी यासाठी नाशिकचे उदय कुलकर्णी यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाला पत्र पाठवून विनंती केली व बससेवा बंद केल्यास शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून पडण्याची भीती व्यक्त केली होती. यावर न्यायालयानेही या पत्राची दखल घेत परिवहन महामंडळ व महापालिकेला याबाबत विचारणा केली असता, परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत शहर बससेवेतून दरवर्षी होणारा आर्थिक तोटा कमी झाल्याचे म्हटले आहे.या संदर्भात विभाग नियंत्रकांनी तोट्याचा महिनानिहाय तक्ता जोडला असून, त्यात एप्रिल २०१७ मध्ये ३ कोटी ८२ लाख रुपये तोटा होता तो आता चक्क फक्त २३ लाखांवर आल्याची आकडेवारी दिली आहे. शहरी फेºयांचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करण्यात आल्यामुळे तोटा कमी झाल्याचे मान्य केले आहे. फेºया तात्पुरत्या स्थगित शहर बस वाहतूक तोट्यात चालत असल्यामुळेच शहरांतर्गत फेºयांमध्ये कपात करणाºया परिवहन महामंडळाने एकीकडे तोट्यात कपात झाल्याचे सांगतानाच कपात केलेल्या फेºया या काही काळासाठीच स्थगित करण्यात आल्याचे व नंतर त्या पुन्हा सुरू करण्याचे मान्य केले आहे. या संदर्भात उदय कुलकर्णी यांना दिलेल्या पत्रात विभाग नियंत्रकांनी म्हटले आहे की, प्रतिवर्षी उन्हाळी सुट्टी कालावधीत शालेय मार्गावरील नियते तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात येतात व शाळा सुरू होण्याच्या वेळेत त्या फेºया पुनश्च सुरू करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे फेºया कमी केल्याने तोटा कमी झाला असे मान्य केले तर दुसरीकडे त्या फेºया पुन्हा सुरू करण्यात येऊनही तोट्यात कमालीची घट होत असल्याचे स्पष्ट झाल्याने परिवहन महामंडळाच्या या परस्पर विरोधी भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.