शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

शहर बस तोट्यात की नफ्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:32 IST

नाशिक : परिवहन महामंडळामार्फत नाशिक शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करणारी शहर बससेवा तोट्यात चालत असल्याचे कारण देत ही सेवा बंद करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एसटीच्या विभाग नियंत्रकांनी मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून शहर बससेवेच्या शहरी फेऱ्यांचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करण्यात आल्याने शहर बस वाहतुकीचा तोटा कोटीवरून लाखावर आल्याचे लेखी मान्य केल्यामुळे ही बससेवा तोट्यात की नफ्यात, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.

ठळक मुद्देविभाग नियंत्रकांची परस्परविरोधी भूमिकापरिवहन महामंडळाच्या या परस्पर विरोधी भूमिकेबद्दल आश्चर्य

नाशिक : परिवहन महामंडळामार्फत नाशिक शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करणारी शहर बससेवा तोट्यात चालत असल्याचे कारण देत ही सेवा बंद करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एसटीच्या विभाग नियंत्रकांनी मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून शहर बससेवेच्या शहरी फेऱ्यांचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करण्यात आल्याने शहर बस वाहतुकीचा तोटा कोटीवरून लाखावर आल्याचे लेखी मान्य केल्यामुळे ही बससेवा तोट्यात की नफ्यात, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.नाशिक शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करणाºया शहर बससेवेच्या फेºया गेल्या वर्षी तोट्याचे कारण दाखवून बंद करण्याचे प्रकार परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. वर्षानुवर्षे शहरातील प्रवाशांची वाहतूक करणारी बससेवा अचानक तोट्यात कशी गेली, असा सवाल त्यावेळी करण्यात येऊन बंद केलेल्या प्रवासी फेºया सुरू करण्याच्या मागणीसाठी राजकीय पक्षांनी आंदोलनेही केली. बस फेºयांच्या कपातीमुळे नोकरदार, शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असताना परिवहन महामंडळाने शहर बससेवा बंद करून ती नाशिक महापालिकेने चालवावी, असा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला व त्यामागे दरमहा होणाºया आर्थिक तोट्याचे कारण दिले आहे.नाशिक महापालिकादेखील शहर बससेवा चालविण्यास उताविळ झाल्याने त्यांनी या संदर्भातील व्यवहार्यता तपासण्यासाठी पैसे खर्च करून तांत्रिक सल्लागाराची नेमणूक केली आहे. असे असताना सदरची बससेवा परिवहनशहर बस तोट्यात की नफ्यात?(पान १ वरून)महामंडळानेच चालवावी यासाठी नाशिकचे उदय कुलकर्णी यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाला पत्र पाठवून विनंती केली व बससेवा बंद केल्यास शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून पडण्याची भीती व्यक्त केली होती. यावर न्यायालयानेही या पत्राची दखल घेत परिवहन महामंडळ व महापालिकेला याबाबत विचारणा केली असता, परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत शहर बससेवेतून दरवर्षी होणारा आर्थिक तोटा कमी झाल्याचे म्हटले आहे.या संदर्भात विभाग नियंत्रकांनी तोट्याचा महिनानिहाय तक्ता जोडला असून, त्यात एप्रिल २०१७ मध्ये ३ कोटी ८२ लाख रुपये तोटा होता तो आता चक्क फक्त २३ लाखांवर आल्याची आकडेवारी दिली आहे. शहरी फेºयांचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करण्यात आल्यामुळे तोटा कमी झाल्याचे मान्य केले आहे. फेºया तात्पुरत्या स्थगित शहर बस वाहतूक तोट्यात चालत असल्यामुळेच शहरांतर्गत फेºयांमध्ये कपात करणाºया परिवहन महामंडळाने एकीकडे तोट्यात कपात झाल्याचे सांगतानाच कपात केलेल्या फेºया या काही काळासाठीच स्थगित करण्यात आल्याचे व नंतर त्या पुन्हा सुरू करण्याचे मान्य केले आहे. या संदर्भात उदय कुलकर्णी यांना दिलेल्या पत्रात विभाग नियंत्रकांनी म्हटले आहे की, प्रतिवर्षी उन्हाळी सुट्टी कालावधीत शालेय मार्गावरील नियते तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात येतात व शाळा सुरू होण्याच्या वेळेत त्या फेºया पुनश्च सुरू करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे फेºया कमी केल्याने तोटा कमी झाला असे मान्य केले तर दुसरीकडे त्या फेºया पुन्हा सुरू करण्यात येऊनही तोट्यात कमालीची घट होत असल्याचे स्पष्ट झाल्याने परिवहन महामंडळाच्या या परस्पर विरोधी भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.