शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शहर बस तोट्यात की नफ्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:32 IST

नाशिक : परिवहन महामंडळामार्फत नाशिक शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करणारी शहर बससेवा तोट्यात चालत असल्याचे कारण देत ही सेवा बंद करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एसटीच्या विभाग नियंत्रकांनी मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून शहर बससेवेच्या शहरी फेऱ्यांचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करण्यात आल्याने शहर बस वाहतुकीचा तोटा कोटीवरून लाखावर आल्याचे लेखी मान्य केल्यामुळे ही बससेवा तोट्यात की नफ्यात, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.

ठळक मुद्देविभाग नियंत्रकांची परस्परविरोधी भूमिकापरिवहन महामंडळाच्या या परस्पर विरोधी भूमिकेबद्दल आश्चर्य

नाशिक : परिवहन महामंडळामार्फत नाशिक शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करणारी शहर बससेवा तोट्यात चालत असल्याचे कारण देत ही सेवा बंद करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एसटीच्या विभाग नियंत्रकांनी मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून शहर बससेवेच्या शहरी फेऱ्यांचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करण्यात आल्याने शहर बस वाहतुकीचा तोटा कोटीवरून लाखावर आल्याचे लेखी मान्य केल्यामुळे ही बससेवा तोट्यात की नफ्यात, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.नाशिक शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करणाºया शहर बससेवेच्या फेºया गेल्या वर्षी तोट्याचे कारण दाखवून बंद करण्याचे प्रकार परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. वर्षानुवर्षे शहरातील प्रवाशांची वाहतूक करणारी बससेवा अचानक तोट्यात कशी गेली, असा सवाल त्यावेळी करण्यात येऊन बंद केलेल्या प्रवासी फेºया सुरू करण्याच्या मागणीसाठी राजकीय पक्षांनी आंदोलनेही केली. बस फेºयांच्या कपातीमुळे नोकरदार, शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असताना परिवहन महामंडळाने शहर बससेवा बंद करून ती नाशिक महापालिकेने चालवावी, असा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला व त्यामागे दरमहा होणाºया आर्थिक तोट्याचे कारण दिले आहे.नाशिक महापालिकादेखील शहर बससेवा चालविण्यास उताविळ झाल्याने त्यांनी या संदर्भातील व्यवहार्यता तपासण्यासाठी पैसे खर्च करून तांत्रिक सल्लागाराची नेमणूक केली आहे. असे असताना सदरची बससेवा परिवहनशहर बस तोट्यात की नफ्यात?(पान १ वरून)महामंडळानेच चालवावी यासाठी नाशिकचे उदय कुलकर्णी यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाला पत्र पाठवून विनंती केली व बससेवा बंद केल्यास शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून पडण्याची भीती व्यक्त केली होती. यावर न्यायालयानेही या पत्राची दखल घेत परिवहन महामंडळ व महापालिकेला याबाबत विचारणा केली असता, परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत शहर बससेवेतून दरवर्षी होणारा आर्थिक तोटा कमी झाल्याचे म्हटले आहे.या संदर्भात विभाग नियंत्रकांनी तोट्याचा महिनानिहाय तक्ता जोडला असून, त्यात एप्रिल २०१७ मध्ये ३ कोटी ८२ लाख रुपये तोटा होता तो आता चक्क फक्त २३ लाखांवर आल्याची आकडेवारी दिली आहे. शहरी फेºयांचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करण्यात आल्यामुळे तोटा कमी झाल्याचे मान्य केले आहे. फेºया तात्पुरत्या स्थगित शहर बस वाहतूक तोट्यात चालत असल्यामुळेच शहरांतर्गत फेºयांमध्ये कपात करणाºया परिवहन महामंडळाने एकीकडे तोट्यात कपात झाल्याचे सांगतानाच कपात केलेल्या फेºया या काही काळासाठीच स्थगित करण्यात आल्याचे व नंतर त्या पुन्हा सुरू करण्याचे मान्य केले आहे. या संदर्भात उदय कुलकर्णी यांना दिलेल्या पत्रात विभाग नियंत्रकांनी म्हटले आहे की, प्रतिवर्षी उन्हाळी सुट्टी कालावधीत शालेय मार्गावरील नियते तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात येतात व शाळा सुरू होण्याच्या वेळेत त्या फेºया पुनश्च सुरू करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे फेºया कमी केल्याने तोटा कमी झाला असे मान्य केले तर दुसरीकडे त्या फेºया पुन्हा सुरू करण्यात येऊनही तोट्यात कमालीची घट होत असल्याचे स्पष्ट झाल्याने परिवहन महामंडळाच्या या परस्पर विरोधी भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.