शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

शहर, जिल्ह्यातील बससेवा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:11 IST

नाशिक : शेतकरी संघनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या काळातही राज्य परिवहन महामंडळाची नाशिक जिल्ह्यातील बससेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती महामंडळाकडून ...

नाशिक : शेतकरी संघनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या काळातही राज्य परिवहन महामंडळाची नाशिक जिल्ह्यातील बससेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली. बसेस बंद करण्याच्या बाबतीत कोणत्याही सूचना नसल्याने जिल्हा आणि शहरातील सर्व बसेस सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात आले.

नव्या कृषी कायद्याच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर बससेवर कोणताही परिणाम झालेला नाही. दुपारपर्यंत जिल्ह्यातील सर्व बसेस सुरळीत सुरू होत्या. प्रवाशांची संख्या मात्र कमी असल्याने दुपारनंतर अनेक फऱ्या रद्द करण्याची वेळ आली. सकाळी आंदोलनाची तीव्रता अधिक असल्याने बाहेरगावी जाणाऱ्या काही बसेसच्या काचांना जाळ्या लावण्याची दक्षता घेण्यात आली.

जिल्ह्यात तसेच शहरातील सकाळच्या फेऱ्या सुरळीत सुरू होत्या. जिल्ह्यात २० पेक्षा अधिक, तर शहरात ४० पेक्षा अधिक बसेस सुरू आहेत. या सर्व बसेस नियमितपणे सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत. अत्यावश्यक सेवा असल्याने बसेस बंद करण्यात आलेल्या नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामीण भागात बसस्थानकांत प्रवाशीच नसल्याने निम्म्या फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली. बाजारपेठा तसेच बाजार समित्यादेखील बंद असल्यामुळे त्याचा परिणाम महामंडळाच्या बसेसवर झाला.