शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

शहर विकास आराखडा संशयास्पद

By admin | Updated: January 11, 2017 00:30 IST

दशरथ पाटील : शेतकऱ्यांवर अन्यायाची भावना

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंजूर करण्यात आलेला विकास आराखडा संभ्रम निर्माण करणारा व संशयास्पद असल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. या आराखड्यात भूमाफियांच्या पदरात दान टाकत शेतकऱ्यांवर अन्याय केल्याची भावनाही पाटील यांनी व्यक्त केली.राज्य शासनाने सोमवारी (दि. ९) शहर विकास आराखडा भागश: मंजूर केला. त्याबद्दल माजी महापौर दशरथ पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, शासनाने भागश: आराखडा प्रसिद्ध करत निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी चालविली आहे. सदर आराखडा महापालिका व शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. या आराखड्यात दसक-पंचक येथे एका पुढाऱ्याच्या जागेवरचे आरक्षण हटविण्यात आले आहे, तर मखमलाबाद येथे शाळा, दवाखाना यांचे आरक्षण हटविण्यात येऊन ते भूमाफियांना खुले केले आहे. तब्बल १२ टक्के आरक्षणे ही शेतकऱ्यांच्या जमिनींवर टाकण्यात आलेली आहेत. त्याबाबत कुठलेही खुलासे करण्यात आलेले नाहीत. अनेक डीपीरोड काढून टाकण्यात आले आहेत तर कुठे रस्त्यांची रुंदी कमी करण्यात आली आहे. ही आरक्षणे नेमकी कशासाठी व कोणाकरिता काढली याची सखोल चौकशी करण्याची मागणीही दशरथ पाटील यांनी केली आहे. अनेक आरक्षणे हटवत रहिवासी क्षेत्र दर्शविण्यात आले आहे. सदर रहिवास क्षेत्र कुणाच्या फायद्यासाठी करण्यात आले, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.