शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

शहर विकास आराखडा संशयास्पद

By admin | Updated: January 11, 2017 00:30 IST

दशरथ पाटील : शेतकऱ्यांवर अन्यायाची भावना

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंजूर करण्यात आलेला विकास आराखडा संभ्रम निर्माण करणारा व संशयास्पद असल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. या आराखड्यात भूमाफियांच्या पदरात दान टाकत शेतकऱ्यांवर अन्याय केल्याची भावनाही पाटील यांनी व्यक्त केली.राज्य शासनाने सोमवारी (दि. ९) शहर विकास आराखडा भागश: मंजूर केला. त्याबद्दल माजी महापौर दशरथ पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, शासनाने भागश: आराखडा प्रसिद्ध करत निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी चालविली आहे. सदर आराखडा महापालिका व शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. या आराखड्यात दसक-पंचक येथे एका पुढाऱ्याच्या जागेवरचे आरक्षण हटविण्यात आले आहे, तर मखमलाबाद येथे शाळा, दवाखाना यांचे आरक्षण हटविण्यात येऊन ते भूमाफियांना खुले केले आहे. तब्बल १२ टक्के आरक्षणे ही शेतकऱ्यांच्या जमिनींवर टाकण्यात आलेली आहेत. त्याबाबत कुठलेही खुलासे करण्यात आलेले नाहीत. अनेक डीपीरोड काढून टाकण्यात आले आहेत तर कुठे रस्त्यांची रुंदी कमी करण्यात आली आहे. ही आरक्षणे नेमकी कशासाठी व कोणाकरिता काढली याची सखोल चौकशी करण्याची मागणीही दशरथ पाटील यांनी केली आहे. अनेक आरक्षणे हटवत रहिवासी क्षेत्र दर्शविण्यात आले आहे. सदर रहिवास क्षेत्र कुणाच्या फायद्यासाठी करण्यात आले, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.