शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

शहराने पांघरली धुक्याची दुलई

By admin | Updated: September 27, 2015 00:23 IST

वातावरणात बदल : पावसाने पुन्हा घेतली विश्रांती

नाशिक : गणेश चतुर्थीनंतर शहरात सुरू झालेल्या पावसाने अचानकपणे विश्रांती घेतली असून, सध्या पहाटेच्या सुमारास शहर धुक्याची दुलई पांघरत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. धुक्यात हरविलेले शहर साडेसहा वाजताच सूर्यकिरणांनी उजळून निघत असल्याचा अनुभव सध्या नाशिककर घेत आहे.शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. पहाटे शहराच्या विविध उपनगरांमध्ये दाट धुके व दवबिंंदू पडत आहे. अवघ्या अर्धा तास दाट धुके नागरिकांना पहावयास मिळते. पहाटेची झुंजूमुंजू होताच धुके हटू लागते आणि सूर्याची किरणे हळुवारपणे दाटलेल्या धुक्यातून शहरावर पडत आहेत; मात्र आठ वाजताच सूर्याची किरणे तीव्र होत असून, प्रखर ऊन नाशिकरांना गेल्या तीन दिवसांपासून जाणवू लागले आहे. त्याचप्रमाणे वाऱ्याचे प्रमाणही शहरात कमी झाले असून, एकूणच ‘आक्टोबर हीट’ची चाहूल आतापासूनच जाणवू लागली आहे. भाद्रपद महिन्याचा दुसरा आठवडा संपला असल्याने हळूहळू उन्हाची तीव्रता वाढू लागल्याचे चिन्ह शहरात दिसत आहे. तसेच नऊ वाजेनंतर वातावरणात काही प्रमाणात गारवाही जाणवत असल्याने दुचाकीवरून प्रवास करताना नाशिककरांना थंडी भरत आहे, तर रात्रीचे भोजन आटोपल्यानंतर शतपावलीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना थंड हवेची मंद झुळूक आल्हाददायक वातावरणाची अनुभूती करून देणारी ठरत आहे. एकूणच निसर्गाच्या बदलत्या हवामान चक्रामुळे सध्या नाशिककरांना आगळा वेगळा वातावरण अनुभवयास मिळत आहे. दिवसाच्या बदलत्या प्रहरानुसार वातावरणाची लयदेखील बदलत जात असल्याचे निदर्शनास येत आहे. पहाटे धुके , दुपारी ऊन, संध्याकाळी गारवा, रात्री थंडी असे वातावरण सध्या शहरात अनुभवयास येत आहे. (प्रतिनिधी)