शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

तपासणी करण्याची नागरिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 18:00 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणार्या घोटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून मुंबई येथे भाजीपाला घेऊन जाणारे पिक अप, टेम्पो, आदी वाहनांच्या चालकांची तसेच त्यांच्या कुटुंबाची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देग्रामस्तरावर तपासणीसाठी विशेष पथकाची नेमणूक

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणार्या घोटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून मुंबई येथे भाजीपाला घेऊन जाणारे पिक अप, टेम्पो, आदी वाहनांच्या चालकांची तसेच त्यांच्या कुटुंबाची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या घोटी येथे भाजीपाल्याची सर्वात जास्त आवक जावक मुंबई येथे मोठ्या प्रमाणावर स्थानिक वाहनाने होत असल्यामुळे मुंबईहून येणाºया भाजीपाला वाहनांच्या चालकांची व त्यांच्या कुटुंबाची तपासणी करण्यात यावी, यामुळे तालुक्यात तसेच त्याच्या कुटुंबाला धोका निर्माण होणार नाही अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. इगतपुरीच्या तहसिलदार अर्चना पागीरे यांनी याबाबत माहिती देतांना सांगितले की, मुंबईहून येणाºया भाजीपाला वाहनांच्या चालकासोबत एकच व्यक्ती देण्यात यावा. तसेच चालकाने गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक असून चालकाने मास्क लावूनच वाहन चालवायच्या सूचना घोटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला बैठकीदरम्यान दिल्या असल्याचे पागीरे यांनी सांगितले. तसेच ग्रामस्तरावर देखील एका पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकामध्ये सरपंच हे अध्यक्षस्थानी असून ग्रामसेवक, तलाठी, सचिव, कृषी सहाय्यक, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, आशासेविका या पथकामध्ये सदस्य म्हणून काम करत आहेत. यांच्यामार्फत बाहेरून येणाºया प्रत्येक व्यक्तीची माहिती दैनंदिन येत असते. तसेच स्वस्त धान्य दुकानांमध्ये काही काळाबाजार होत असेल, किंवा दुकानदार किराणा माल जास्त दराने देत असेल तर त्यांच्यावर तिथेच गुन्हा दाखल करण्याचे आदेश तालुक्यातील तलाठी यांना दिले असल्याचे तहसिलदार पागीरे यांनी माहिती देतांना सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTravel Tipsट्रॅव्हल टिप्स