शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
5
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
6
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
7
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
8
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
9
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
10
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
11
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
12
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
13
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
14
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
15
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
16
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
17
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
18
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
19
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
20
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!

मृत मासे बघण्यासाठी नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:07 IST

गणपती विसर्जन करण्याच्या एकमेव असलेल्या गौतम तलावात लाखो मासे मृत झाल्यानंतर तलावाभोवती नागरिकांनी गर्दी केली.

त्र्यंबकेश्वर : गणपती विसर्जन करण्याच्या एकमेव असलेल्या गौतम तलावात लाखो मासे मृत झाल्यानंतर तलावाभोवती नागरिकांनी गर्दी केली.बघ्यांची गर्दी वाढत असून, मासे मृत कसे झाले याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. येथील ललिता शिंदे व नाशिकचे राजेश पंडित यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात या प्रकाराबद्दल तक्र ार दाखल केली आहे. येथील काही कार्यकर्त्यांनी त्वरित तळ्यात उतरून फुगून आलेले हजारो मासे काढून गोण्यांमध्ये भरून बाहेर नेले. एक किलो वजनापासून ते तीन ते चार किलो वजनापर्यंतचे मासे गोण्यांमध्ये भरून गावाबाहेर नेले. हे मासे खाण्याजोगे नसल्याने ते विषारी झाल्याने संबधितांनी ते जाळण्याचा निर्णय घेतला. गावात मात्र माशांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. कोणी म्हणते पाण्यात काहीतरी विषारी पदार्थ टाकून माशांचा मृत्यू घडवून आणला. या ठिकाणी काही आदिवासी व महिला माशांसाठी खाद्य म्हणून पाव विकून उदरनिर्वाह करीत असत. पावाचे तुकडे करून पाण्यात टाकले की, शेकडो मासे गोळा होऊन पावाचा फडशा पाडीत. माशांची ही गंमत पाहण्यासाठी यात्रेकरू पर्यटक पुन्हा पुन्हा पाव खरेदी करीत. मुक्या व गरीब जलचरांची ही मजा पाहताना बच्चे कंपनी अक्षरश: रंगून जात. तलावात पाव फेकले तरी शिल्लक असलेले मासे पावाला शिवतदेखील नाहीत. दरम्यान येथील ललिता शिंदे व राजेश पंडित यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात या प्रकाराबद्दल तक्र ार दाखल केली आहे.