शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
5
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
6
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
7
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
8
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
9
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
10
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
11
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
12
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
13
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
14
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
15
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
16
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
17
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
18
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
19
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
20
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी

मृत मासे बघण्यासाठी नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:07 IST

गणपती विसर्जन करण्याच्या एकमेव असलेल्या गौतम तलावात लाखो मासे मृत झाल्यानंतर तलावाभोवती नागरिकांनी गर्दी केली.

त्र्यंबकेश्वर : गणपती विसर्जन करण्याच्या एकमेव असलेल्या गौतम तलावात लाखो मासे मृत झाल्यानंतर तलावाभोवती नागरिकांनी गर्दी केली.बघ्यांची गर्दी वाढत असून, मासे मृत कसे झाले याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. येथील ललिता शिंदे व नाशिकचे राजेश पंडित यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात या प्रकाराबद्दल तक्र ार दाखल केली आहे. येथील काही कार्यकर्त्यांनी त्वरित तळ्यात उतरून फुगून आलेले हजारो मासे काढून गोण्यांमध्ये भरून बाहेर नेले. एक किलो वजनापासून ते तीन ते चार किलो वजनापर्यंतचे मासे गोण्यांमध्ये भरून गावाबाहेर नेले. हे मासे खाण्याजोगे नसल्याने ते विषारी झाल्याने संबधितांनी ते जाळण्याचा निर्णय घेतला. गावात मात्र माशांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. कोणी म्हणते पाण्यात काहीतरी विषारी पदार्थ टाकून माशांचा मृत्यू घडवून आणला. या ठिकाणी काही आदिवासी व महिला माशांसाठी खाद्य म्हणून पाव विकून उदरनिर्वाह करीत असत. पावाचे तुकडे करून पाण्यात टाकले की, शेकडो मासे गोळा होऊन पावाचा फडशा पाडीत. माशांची ही गंमत पाहण्यासाठी यात्रेकरू पर्यटक पुन्हा पुन्हा पाव खरेदी करीत. मुक्या व गरीब जलचरांची ही मजा पाहताना बच्चे कंपनी अक्षरश: रंगून जात. तलावात पाव फेकले तरी शिल्लक असलेले मासे पावाला शिवतदेखील नाहीत. दरम्यान येथील ललिता शिंदे व राजेश पंडित यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात या प्रकाराबद्दल तक्र ार दाखल केली आहे.