शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
2
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
3
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
4
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
5
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
6
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
7
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
8
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
9
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
10
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
11
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
12
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
13
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
14
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
15
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
16
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
17
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
18
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
19
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
20
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...

उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 16:51 IST

खामखेडा : गेल्या चार-पाच दिवसांपासून अचानक उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले आहेत.

ठळक मुद्देमार्च महिन्याच्या सुरुवातीपासून वातावरणात बदल होऊन ऊन तापू लागले आहे. सकाळी आठ वाजेपासून सूर्यदेवता आग ओकण्यात सुरुवात करत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवू लागला आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही नागरिकांच्या दैनंदिन काम

खामखेडा : गेल्या चार-पाच दिवसांपासून अचानक उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले आहेत.सध्या सर्वत्र शेतीकामे सुरू आहेत. विशेष म्हणजे उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरू असल्याने शिवारात सर्वत्र कांदा काढण्याचे काम जोमात आहे. परंतु कडक उन्हामुळे शेतीत काम करणारे शेतमजुरांनी कामाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. मजूर सकाळी आठ वाजता शेतात जाऊन अकरा वाजेपर्यंत काम करतात. आणि अकरा वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत शेतातील झाड्याच्या सावलीत आराम करताना दिसून येत आहे. चार वाजेनंतर पुन्हा सायंकाळी सात वाजेपर्यंत शेतात काम करतात. गाय, बकऱ्या, मेंढ्या चारणारे गुराखीसुद्धा सकाळी लवकर आपली जनावरे चारण्यासाठी नेऊन दुपारी नदीकिनारी किंवा शेतातील झाडाच्या सावलीखाली आपली जनावरे उभी करून आराम करणे पसंत करत आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळाच्या वेळेतही बदल केला आहे. दुपारी भरणारी शाळा सकाळ सत्रात केल्या आहेत. या कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेस कोणीही बाहेर फिरताना दिसून येत नाही. दुपारच्या वेळेस बाहेर फिरणारे नागरिक टोपी किंवा उपरणे डोक्यावर घेऊन बचाव करताना दिसत आहे. प्रचंड उखडा असल्याने दुपारच्या वेळेस पंखासुद्धा गरम हवा फेकत असल्याने लोक झाडाच्या सावलीखाली आराम करणे पसंत करीत आहेत. चालू वर्षी मार्च महिन्यातच उन्हाचा चटका बसत असल्याने एप्रिल-मे महिना कसा जाईल यांच्यावर नागरिकतिं चर्चा होत आहे.कडक उन्हामुळे अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शिवारातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. उन्हामुळे शेतातील पिकांनासुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासू लागली आहे. सकाळी पाणी भरूनही कडक उन्हामुळे सायंकाळी जमीन कोरडी दिसून येत आहे. तेव्हा पिके कशी जतन करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.