शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

थेट सरपंच निवडीने चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:33 IST

तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू झाले असून, कळवण खुर्द व जयपूरच्या थेट सरपंचाची व ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली. तालुक्यात थेट १४ सरपंचपदासाठी ५३ उमेदवार रिंगणात उतरले असून, १४ गावातील ५४ प्रभागांतील १५२ जागांसाठी २९२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे.

कळवण : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू झाले असून, कळवण खुर्द व जयपूरच्या थेट सरपंचाची व ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली. तालुक्यात थेट १४ सरपंचपदासाठी ५३ उमेदवार रिंगणात उतरले असून, १४ गावातील ५४ प्रभागांतील १५२ जागांसाठी २९२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर दरम्यान मुदत संपणाºया तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी ७ आॅक्टोबरला तालुक्यात मतदान होणार आहे. स्थानिक पुढाºयांसह त्यांना मानणाºया नेत्यांचीही प्रतिष्ठा यातून पणाला लागणार आहे. यंदा पहिल्यांदाच गावचा सरपंच थेट जनतेतून निवडण्यात येणार आहे. लोकनियुक्त १४ गावांतील सरपंचपदासाठी ५३ उमेदवार रिंगणात उतरले आहे. ५४ प्रभागांतील १५२ जागांसाठी २९२ उमेदवारकळवण खुर्द ३ प्रभागातील ९ जागा (बिनविरोध), जयपूर ३ जागांसाठी ७ जागा ( बिनविरोध) कोसुर्डे ३ प्रभागातील ९ जागांसाठी १६ उमेदवार, पिळकोस ३ प्रभागातील ९ जागांसाठी २२ उमेदवार, देसराणे ३ प्रभागांतील ९ जागांसाठी १७ उमेदवार, मानूर ५ प्रभागांतील १३ जागांसाठी २९ उमेदवार, भादवण ३ प्रभागांतील ९ जागांसाठी २३ उमेदवार, पाळे खुर्द ३ प्रभागांतील ९ जागांसाठी २५ उमेदवार, वाडी बुद्रुक ४ प्रभागांतील ११ जागांसाठी २७ उमेदवार, बगडू ३ प्रभागांतील ७ जागांसाठी १३ उमेदवार, गोळाखाल ४ प्रभागांतील ११ जागांसाठी १९ उमेदवार, कुंडाणे (ओ) ३ प्रभागांतील ९ जागांसाठी १२ उमेदवार, जयदर ३ प्रभागांतील ९ जागांसाठी १२ उमेदवार, निवाणे ५ प्रभागांतील १३ जागांसाठी २५ उमेदवार, शिरसमणी ३ प्रभागांतील ९ जागांसाठी २५ उमेदवार, तर सुळे ३ प्रभागांतील ९ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असून, निवडणुकीचे खरे चित्र माघारीनंतर स्पष्ट होणार आहे.कळवण खुर्द, जयपूर बिनविरोधकळवण खुर्द व जयपूर ग्रामपंचायतच्या थेट सरपंचपदाची व ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक बिनविरोध होऊन कळवण खुर्द सरपंचपदी रत्ना पवार तर जयपूर सरपंचपदी मीनाक्षी गायकवाड यांची निवड झाली.  कळवण खुर्द ग्रामपंचायतमध्ये लीलाबाई भाऊसाहेब शिंदे, किशोर  वनजी गवळी, मंगला रमेश पवार, राहुल आनंदा गांगुर्डे, हितेंद्र शरद पगार, सविता भगवान शिंदे, मंगला महेश पवार व राजेंद्र कौतिक गवळी हे बिनविरोध निवडून आले असून, प्रभाग क्र मांक ३ मधील अनुसूचित  जमाती स्त्री राखीव उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने जागा रिक्त राहणार आहे. तर जयपूर ग्रामपंचायतमध्ये सुनील पोपटराव गायकवाड, सुनीता पोपट बागूल, अनिल सोमनाथ पवार, ललीता देवचंद बागुल, बळीराम तुळशीराम खैर, ज्योती सुभाष चौधरी, इंदूबाई धनराज पाडवी यांची बिनविरोध निवड झाली.१६ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाचे आरक्षणकळवण खुर्द ( अनुसूचित जमाती स्त्री) रत्ना लक्ष्मण पवार (बिनविरोध), जयपूर (अनुसूचित जमाती स्त्री) मीनाक्षी सुनील गायकवाड (बिनविरोध), कोसुर्डे (अनुसूचित जमाती), पिळकोस (अनुसूचित जमाती), देसराणे (अनुसूचित जमाती स्त्री), मानूर (अनुसूचित जमाती), भादवण (अनुसूचित जमाती, पाळे खुर्द (अनुसूचित जमाती), वाडी बुद्रुक (अनुसूचित जमाती), बगडू (अनुसूचित जमाती स्त्री), गोळाखाल (अनुसूचित जमाती स्त्री), कुंडाणे (ओ) अनुसूचित जमाती, जयदर (अनुसूचित जमाती स्त्री), निवाणे (अनुसूचित जमाती), शिरसमणी (अनुसूचित जमाती स्त्री), सुळे (अनुसूचित जमाती).