शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

पालिकेला जाग आली, पण अर्धवट!

By admin | Updated: December 17, 2015 00:25 IST

कृषिनगर उद्यान : काम अपूर्ण ठेवून कर्मचारी माघारी

नाशिक : कृषिनगर येथील खुल्या जागेतील उद्यानात वाढलेले तण आणि तुटक्या खेळण्या याबाबत लोकमतमध्ये वृत्त येताच महापालिका प्रशासनाने तातडीने दुरुस्तीसाठी कर्मचारी पाठविले. परंतु वर वर तण काढण्याच्या प्रकारामुळे उद्यानाची बकाल अवस्था कायम आहे. त्यामुळे पालिकेने वरवरची कारवाई करून काय साध्य केले असा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थात, पालिकेने हे काम सुरू केले असून दोन दिवसात कृषिनगर येथे समाज मंदिर, संत ज्ञानेश्वर वाचनालय आणि दत्तमंदिर असून उद्यानही साकारले आहे. परंतु खुली जागा दिसली की उद्यान साकारायचे नंतर त्याची देखभाल दुरुस्ती करायचीच नाही, या महापालिकेच्या प्रकारामुळे शहरातील बहुतांशी उद्यानांची जी अवस्था आहे, तशीच अवस्था कृषिनगर उद्यानाची झाली. यासंदर्भात लोकमतने उद्यानातील वाढलेले गवत, झुडपे आणि खेळण्यांची झालेली दुरवस्था यावर प्रकाश टाकला. इतकेच नव्हे तर नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनदेखील दखल घेतली जात नसल्याची हतबलतादेखील व्यक्त केली. यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पालिकेच्या वतीने याठिकाणी कर्मचारी पाठविण्यात आले आणि झाडांची छाटणी करतानाच काही प्रमाणात तण काढण्यात आले. परंतु सर्व काम न करताच कर्मचारी अवघ्या काही तासातच माघारी गेल्याने उद्यानाची दुरवस्था कायम आहे. यासंदर्भात पालिकेच्या सूत्रांनी काम सुरूच राहील आणि दोन ते तीन दिवसात उद्यान सुस्थितीत राहील असा दावा केला आहे. (प्रतिनिधी)