शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

बालमृत्यूप्रकरणी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:58 IST

राष्टÑवादी महिला कॉँग्रेसची निदर्शने : कुपोषण कमी करण्याची मागणी नाशिक : न्यायाची अपेक्षा करतेय आई, मूल वाचवा, दत्तक नाशिक वाºयावर, शासनाचा निषेध असे फलक घेऊन राष्टÑवादी कॉँग्रसेच्या महिला पदाधिकाºयांनी हातात नवजात बाळांच्या प्रतिमा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

राष्टÑवादी महिला कॉँग्रेसची निदर्शने : कुपोषण कमी करण्याची मागणी

नाशिक : न्यायाची अपेक्षा करतेय आई, मूल वाचवा, दत्तक नाशिक वाºयावर, शासनाचा निषेध असे फलक घेऊन राष्टÑवादी कॉँग्रसेच्या महिला पदाधिकाºयांनी हातात नवजात बाळांच्या प्रतिमा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा न झाल्यास राष्ट्रवादी महिला काँग्रेस तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी पदाधिकाºयांनी दिला. राष्ट्रवादी महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा रुग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हा रु ग्णालयातील नवजात अर्भक मृत्यूप्रकरणी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दोन दिवसांपूर्वीच नाशिकला भेट देत राज्य सरकारवर टीका केल्यानंतर बुधवारी (दि. १३) जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता.तालुकावार असलेले सरकारी दवाखाने, महानगरपालिकेचे दवाखाने यातही पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य रुग्णास वैद्यकीय सेवा मिळत नाही. तसेच स्वाइन फ्लू, डेंग्यू व अन्य साथींनी जिल्ह्यात थैमान घातल्याने त्यावरील लसी व औषधसाठा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणीही डॉ. पवार यांनी यावेळी केली.आंदोलनात युवती जिल्हाध्यक्ष प्रतीक्षा बिल्लाडे, नगरसेवक सुषमा पगारे, समीना मेमन, शोभा साबळे, अनिता भामरे, माधुरी गायधनी, योगिता आवारे, अपर्णा देशमुख, मेघा दराडे, सायरा शेख, अर्चना परछा, पूनम बर्वे, मंजूषा महेश, पूनम शहा, पुष्पा सहारे, कमल सोनवणे, सरला गायकवाड, मनीषा गाडेकर, मंदा आव्हाड, विनता सिंग, अर्चना आव्हाड, आफरिन सय्यद, संगीता कंगना, उज्ज्वला गायकवाड, नैना भालेराव, रूप गीत, कोमल निकाळे, अंकिता पवार, गायत्री झांजरे, काजल बोदंडे, पूजा कर्डक, राधा कुटे, कोमल शिंदे, वैशाली आहिरे, प्रियंका मानधने आदींसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.पालकमंत्री फिरकले नसल्याने नाराजीकुपोषित, नवजात व मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांसाठी आवश्यक असलेले फक्त १८ इन्क्युबेटर मशीन्स उपलब्ध असून, प्रत्यक्षात आता तेथे ४२ बालके ठेवलेली आहेत. त्यामुळे बालके दगावण्याचाच धोका जास्त आहे. एवढी मोठी घटना घडल्यानंतरही जिल्ह्याचे पालकमंत्री फिरकले नसल्याने जिल्हाध्यक्ष बलकवडे यांनी नाराजी व्यक्त केली.