शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

बालमृत्यूप्रकरणी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:58 IST

राष्टÑवादी महिला कॉँग्रेसची निदर्शने : कुपोषण कमी करण्याची मागणी नाशिक : न्यायाची अपेक्षा करतेय आई, मूल वाचवा, दत्तक नाशिक वाºयावर, शासनाचा निषेध असे फलक घेऊन राष्टÑवादी कॉँग्रसेच्या महिला पदाधिकाºयांनी हातात नवजात बाळांच्या प्रतिमा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

राष्टÑवादी महिला कॉँग्रेसची निदर्शने : कुपोषण कमी करण्याची मागणी

नाशिक : न्यायाची अपेक्षा करतेय आई, मूल वाचवा, दत्तक नाशिक वाºयावर, शासनाचा निषेध असे फलक घेऊन राष्टÑवादी कॉँग्रसेच्या महिला पदाधिकाºयांनी हातात नवजात बाळांच्या प्रतिमा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा न झाल्यास राष्ट्रवादी महिला काँग्रेस तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी पदाधिकाºयांनी दिला. राष्ट्रवादी महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा रुग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हा रु ग्णालयातील नवजात अर्भक मृत्यूप्रकरणी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दोन दिवसांपूर्वीच नाशिकला भेट देत राज्य सरकारवर टीका केल्यानंतर बुधवारी (दि. १३) जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता.तालुकावार असलेले सरकारी दवाखाने, महानगरपालिकेचे दवाखाने यातही पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य रुग्णास वैद्यकीय सेवा मिळत नाही. तसेच स्वाइन फ्लू, डेंग्यू व अन्य साथींनी जिल्ह्यात थैमान घातल्याने त्यावरील लसी व औषधसाठा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणीही डॉ. पवार यांनी यावेळी केली.आंदोलनात युवती जिल्हाध्यक्ष प्रतीक्षा बिल्लाडे, नगरसेवक सुषमा पगारे, समीना मेमन, शोभा साबळे, अनिता भामरे, माधुरी गायधनी, योगिता आवारे, अपर्णा देशमुख, मेघा दराडे, सायरा शेख, अर्चना परछा, पूनम बर्वे, मंजूषा महेश, पूनम शहा, पुष्पा सहारे, कमल सोनवणे, सरला गायकवाड, मनीषा गाडेकर, मंदा आव्हाड, विनता सिंग, अर्चना आव्हाड, आफरिन सय्यद, संगीता कंगना, उज्ज्वला गायकवाड, नैना भालेराव, रूप गीत, कोमल निकाळे, अंकिता पवार, गायत्री झांजरे, काजल बोदंडे, पूजा कर्डक, राधा कुटे, कोमल शिंदे, वैशाली आहिरे, प्रियंका मानधने आदींसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.पालकमंत्री फिरकले नसल्याने नाराजीकुपोषित, नवजात व मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांसाठी आवश्यक असलेले फक्त १८ इन्क्युबेटर मशीन्स उपलब्ध असून, प्रत्यक्षात आता तेथे ४२ बालके ठेवलेली आहेत. त्यामुळे बालके दगावण्याचाच धोका जास्त आहे. एवढी मोठी घटना घडल्यानंतरही जिल्ह्याचे पालकमंत्री फिरकले नसल्याने जिल्हाध्यक्ष बलकवडे यांनी नाराजी व्यक्त केली.