शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात बालविवाह वाढले; विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासूनच कोरोनामुळे लॉकडाऊन व सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लादले गेले आहेत. अशा परिस्थितीत पालकांच्या मते उपवर ...

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासूनच कोरोनामुळे लॉकडाऊन व सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लादले गेले आहेत. अशा परिस्थितीत पालकांच्या मते उपवर झालेल्या मुलींचे मोजक्याच नातेवाईकांसमक्ष लग्न लावून देण्याचे प्रकार घडले आहेत. वयाची सोळा वा सतरा वर्षे कशीबशी पूर्ण केलेल्या मुलींचे लग्न लावून देण्यात आले असून, यातील काही लग्ने समाजाच्या समयसूचकतेने वेळीच रोखण्यात आली आहेत.

------------

पटसंख्येचा निश्चित आकडा काढणे कठीण

कोरोनाचे निर्बंध पाहता शासनाने कोरोनामुक्त गावांमध्येच शाळा उघडण्यास अनुमती दिली असल्यामुळे नाशिक जिल्ह्यात कोरोनामुक्त ३५५ गावांपैकी २०८ शाळा सुरू झाल्या आहेत. त्यातही फक्त ५० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आल्याने या शाळांमधील पटसंख्या काढणे शिक्षण विभागाला मुश्किल झाले आहे.

------

२०८ शाळा सुरू

१०१४ शाळा अद्यापही बंद

--------

एकूण हजेरी- ८,९२७

मुले- ५,०२३

मुली- ३,९०४

---------------

अल्पवयात मुली, मुलांचे लग्न लावणे कायद्याने गुन्हा आहे. असे लग्न लागत असेल तर महिला बालविकास विभाग, चाईल्डलाईन किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी. त्याची त्वरित दखल घेतली जाईल.

- सुरेखा पाटील, महिला व बालकल्याण अधिकारी

----------

दहावीच्या विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र

* नाशिक जिल्ह्यात गेल्या सात महिन्यांत बाल विवाहाच्या २२ घटना घडल्या आहेत. या लग्नाच्या तक्रारी झाल्याने त्याची दखल घेण्यात आली.

* बालविवाह करणाऱ्या कुटुंबीयांना समज देण्यात आली. त्यात ४ कुटुंबांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

-----------------

उपवर वय व आर्थिक विवंचना हेच कारण

* ग्रामीण भागात मुलींचे वाढलेले वय हेच कुटुंबासाठी काळजीचे कारण. त्यातही चांगल्या स्थळाला पसंती

* कमी वयातही लग्न करण्याची तयारी, आर्थिक विवंचनेमुळे लवकर लग्नाची घाई केली जाते.

--------------

अज्ञान, गरिबी व चालीरितीमुळे ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींचे लग्न लावण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. ते त्या मुलींसाठी व सामाजिक समतोल राखण्यास घातक ठरू शकते. ते टाळण्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे.

- शोभा पवार, सामाजिक कार्यकर्त्या