शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पतंग पकडतांना विहिरीत पडून बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 17:20 IST

सिन्नर : कटलेली पतंग पकडतांना पाय घसरुन विहिरीत पडल्याने बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शहराजवळील मापारवाडी रस्त्यालगत घडली. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

आर्यन विलास नवाळे (१२) रा. संत हरीबाबा नगर, सिन्नर हा सहावीत शिकणारा मुलगा त्याच्या मित्रांसोबत शेतात पतंग उडवत होता. यावेळी कटलेली पतंग पकडत असतांना तो धनंजय जाधव यांच्या शेतातील विहिरीत पाय घसरुन पडला. विहिर पाण्याने तुटंब भरलेली होती. आर्यन विहिरीत पडल्यानंतर मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. जवळ राहणाऱ्या नागरिकांनी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते विजय बोºहाडे यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी सिन्नर पोलीस व नगरपरिषद अग्निशामक दलाला माहिती दिली. विहिरीत भरपूर पाणी असल्याने त्यात गळ टाकून शोधकार्य राबविण्यात आले. विलास गांगुर्डे, सागर गवळी, मनोज शिंदे यांच्यासह अग्निशामक दलाचे लाला वाल्मिक, नारायण मुंडे, जयेश बोरस्ते, हरिष पाटील यांनी विहिरीत शोधकार्य केले. त्यानंतर आर्यनचा मृतदेह मिळून आला. नगरपरिषद रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Accidentअपघात