शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

बालकांच्या भोजन निधीसाठी बालगृहचालक मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार

By admin | Updated: January 17, 2016 22:08 IST

बालकांच्या भोजन निधीसाठी बालगृहचालक मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार

कळवण : नाशिक जिल्ह्यातील सुमारे दोन हजार काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अनाथ, निराधार बालकांचे भोजन अनुदान आणि कर्मचाऱ्यांचे वेतन ठप्प असून, या बालकांना सांभाळणारी बालगृहे अखेरची घटका मोजत आहेत. या संवेदनशील विषयाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील बालगृहचालक आज त्यांची भेट घेऊन साकडे घालणार आहेत.जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाच्या मान्यतेने स्वयंसेवी संस्थांची २५ बालगृहे कार्यरत आहेत. यात जिल्हा बालकल्याण समिती (बाल न्यायालय)कडून सुमारे १८०० ते २००० काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके वास्तव्यास आहेत. शासनाकडून प्रतिदिन प्रतिबालक २१ रु पये अनुदान दिले जाते. बालकांना अहोरात्र सांभाळणाऱ्या २०० कर्मचाऱ्यांना तर वेतनच नाही. बालकांसाठीचे तुटपुंजे अनुदानही गेल्या तीन वर्षांपासून ठप्प झाल्याने संस्थाचालकांनी उधार-उसनवारी करून बालकांचे संगोपन चालवले असताना उधारी थकल्याने धान्य, किराणा आदिंचा पुरवठा बंद व्हायला आला आहे. हिवाळी अधिवेशनातही भोजन निधीची पुरवणी मागणी नामंजूर झाल्याने या बालकांच्या आणि बिन पगारी कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर उपासमारीचे संकट घोंगावत असून, नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने याप्रश्नी लक्ष घालून जिल्ह्यातील जर्जर झालेल्या बालगृहांचा भोजन अनुदानाचा व कर्मचारी वेतनाचा प्रश्न सोडवून त्यांना संजीवनी द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील बालगृहचालक व कर्मचाऱ्यांच्या वतीने आर. के. जाधव, संजय गायकवाड, लक्ष्मण देवरे, परमदेव अहिरे, सुशीला अलबाड, दिलीप कांकरिया, आशीर्वाद पवार, संदीप शिंदे, शेखर गायकवाड, हरिश्चंद्र गवळी आदिंनी केली आहे. (वार्ताहर)