शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

त्र्यंबक तालुक्यात चिकनगुनियाची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:55 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसूल गटातील जातेगाव बुद्रुक परिसरात चिकनगुनिया व डेंग्यू या आजाराने थैमान घातले आहे. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे जातेगाव व परिसरात सुमारे २०० च्या वर रुग्णांना गुडघ्याला, हात व पायांना सूज येणे आदी लक्षणे दिसून आली.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचे दुर्लक्ष : २०० हून अधिक जणांना हात-पायांना सूज

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसूल गटातील जातेगाव बुद्रुक परिसरात चिकनगुनिया व डेंग्यू या आजाराने थैमान घातले आहे. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे जातेगाव व परिसरात सुमारे २०० च्या वर रुग्णांना गुडघ्याला, हात व पायांना सूज येणे आदी लक्षणे दिसून आली.या आजारांबद्दल जिल्हा किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस इरफान शेख यांनी आवाज उठविला. त्यानंतर आरोग्य विभाग व प्रशासनातील अधिकारी यांचा संयुक्त पाहणी दौरा व आजाराबाबत उपाययोजना करण्यासाठी बैठक घेण्यात आली. कोणत्याही आजारासाठी तपासणी करून योग्य निष्कर्ष काढणे व त्यावर उपाययोजना करणे, काळजी घेणे गरजेचे असते. मात्र, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे जातेगाव परिसरात रुग्णांना गुडघ्याला, हात-पायाला सूज येणे ही लक्षणे दिसून येत आहेत. वास्तविक त्याच वेळेस तालुका आरोग्य विभागाने त्वरित निदान व उपचाराची कार्यवाही केली असती तर दोनशेपेक्षा जास्त रुग्ण झालेच नसते.दरम्यान, सध्या घरोघर सर्वेक्षण करणे, आपत्कालीन पथक तयार करून २४ तास सुरू ठेवणे, बाधित रुग्णांवर उपचार करणे याबरोबरच इतरही सूचना जसे की कोरडा दिवस पाळणे, घरातील पाणी साठविण्याची भांडी कोरडी करणे अशा सूचना करण्यात आल्या. पुढील दहा दिवसांत साथ नियंत्रित होणे अपेक्षित आहे. तसेच शेजारच्या गावांमध्येही या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून उपाययोजना करण्याची गरज आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्या रुपांजली माळेकर, पंचायत समिती सभापती मोतीराम दिवे, गटविकास अधिकारी किरण जाधव, नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर, मिथुन राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील, सरपंच लक्ष्मण वाघेरे, उपसरपंच हेमराज महाले, ग्रामसेवक बी. टी. सूर्यवंशी, आरोग्य विस्तार अधिकारी सुनील जाधव, किरण तरवारे, दिलीप तरवारे, संजय महाले, डॉ.श्रीकांत पाटील, डॉ. नंदकुमार नवाळे याबरोबरच आशा कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती,आरोग्य कर्मचारी आदी पाहणी दौऱ्याप्रसंगी उपस्थित होते.गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वीच आम्ही संयुक्त दौरा करून बरोबरीच्या डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी असे रुग्णांचे सर्वेक्षण करून हा प्रकार चिकन गुनियाचा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. चिकनगुनिया बरा होण्यास वेळ लागतो. जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. योग्य औषधाने हा आजार बरा होतो.-डॉ. मोतीलाल पाटील, तालुका आरोग्य अधिकारी

टॅग्स :hospitalहॉस्पिटलtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर