शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

त्र्यंबक तालुक्यात चिकनगुनियाची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:55 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसूल गटातील जातेगाव बुद्रुक परिसरात चिकनगुनिया व डेंग्यू या आजाराने थैमान घातले आहे. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे जातेगाव व परिसरात सुमारे २०० च्या वर रुग्णांना गुडघ्याला, हात व पायांना सूज येणे आदी लक्षणे दिसून आली.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचे दुर्लक्ष : २०० हून अधिक जणांना हात-पायांना सूज

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसूल गटातील जातेगाव बुद्रुक परिसरात चिकनगुनिया व डेंग्यू या आजाराने थैमान घातले आहे. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे जातेगाव व परिसरात सुमारे २०० च्या वर रुग्णांना गुडघ्याला, हात व पायांना सूज येणे आदी लक्षणे दिसून आली.या आजारांबद्दल जिल्हा किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस इरफान शेख यांनी आवाज उठविला. त्यानंतर आरोग्य विभाग व प्रशासनातील अधिकारी यांचा संयुक्त पाहणी दौरा व आजाराबाबत उपाययोजना करण्यासाठी बैठक घेण्यात आली. कोणत्याही आजारासाठी तपासणी करून योग्य निष्कर्ष काढणे व त्यावर उपाययोजना करणे, काळजी घेणे गरजेचे असते. मात्र, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे जातेगाव परिसरात रुग्णांना गुडघ्याला, हात-पायाला सूज येणे ही लक्षणे दिसून येत आहेत. वास्तविक त्याच वेळेस तालुका आरोग्य विभागाने त्वरित निदान व उपचाराची कार्यवाही केली असती तर दोनशेपेक्षा जास्त रुग्ण झालेच नसते.दरम्यान, सध्या घरोघर सर्वेक्षण करणे, आपत्कालीन पथक तयार करून २४ तास सुरू ठेवणे, बाधित रुग्णांवर उपचार करणे याबरोबरच इतरही सूचना जसे की कोरडा दिवस पाळणे, घरातील पाणी साठविण्याची भांडी कोरडी करणे अशा सूचना करण्यात आल्या. पुढील दहा दिवसांत साथ नियंत्रित होणे अपेक्षित आहे. तसेच शेजारच्या गावांमध्येही या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून उपाययोजना करण्याची गरज आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्या रुपांजली माळेकर, पंचायत समिती सभापती मोतीराम दिवे, गटविकास अधिकारी किरण जाधव, नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर, मिथुन राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील, सरपंच लक्ष्मण वाघेरे, उपसरपंच हेमराज महाले, ग्रामसेवक बी. टी. सूर्यवंशी, आरोग्य विस्तार अधिकारी सुनील जाधव, किरण तरवारे, दिलीप तरवारे, संजय महाले, डॉ.श्रीकांत पाटील, डॉ. नंदकुमार नवाळे याबरोबरच आशा कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती,आरोग्य कर्मचारी आदी पाहणी दौऱ्याप्रसंगी उपस्थित होते.गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वीच आम्ही संयुक्त दौरा करून बरोबरीच्या डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी असे रुग्णांचे सर्वेक्षण करून हा प्रकार चिकन गुनियाचा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. चिकनगुनिया बरा होण्यास वेळ लागतो. जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. योग्य औषधाने हा आजार बरा होतो.-डॉ. मोतीलाल पाटील, तालुका आरोग्य अधिकारी

टॅग्स :hospitalहॉस्पिटलtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर