शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल

By admin | Updated: October 11, 2014 00:08 IST

मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल

मनमाड : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे दिल्लीवाल्यांनी सांगण्याची गरज नाही. ते जनताच ठरवणार असून, होणारा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, अशी गर्जना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनमाड येथे केले. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, कारभारी अहेर, माजी आमदार संजय पवार, राजाभाऊ देशमुख, अलताफ खान, दादा भुसे, नितीन अहेर, सुहास कांदे, एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ढवळे उपस्थित होते.सभेची सुरवातच ठाकरे यांनी मनमाडच्या पाण्याने केली. शहराचा पाणीप्रश्न अद्याप सुटलेला नसताना निवडणुकीत मते मिळवण्यासाठी शहराचा पाणीप्रश्न सोडवल्याचे सांगणाऱ्यांच्या खोटारडेपणाला जनता भुलणार नाही. शिवसेनेकडे सत्ता नसतानाही टंचाई काळात शिवसेनेने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवली असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. भुजबळांवर तोफ डागताना ते म्हणाले की, तेलगी घोटाळा, चिखलीकर घोटाळा आम्ही विसरून गेलो काय अन््् आज ते तुमच्यासमोर येताय साधूसंत असल्याप्रमाणे. आपल्या भाषणात त्यांनी कॉँग्रेस राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबरच भाजपलाही टीकेचे लक्ष बनवले. भाजपासोबतची युती आपण तोडली नाही. संकटाच्या वेळी त्यांना शिवसेनेची गरज भासली. महाराष्ट्र गिळण्यासाठी नव्हे, तर घडवण्यासाठी पाहिजे आहे. भाजपाला पराभव दिसू लागल्याने देशातील वेगवेगळ्या राज्यातील मंत्री महाराष्ट्रात प्रचारासाठी येत असल्याची टीका ठाकरे त्यांनी केली. मतदारांच्या प्रतिसादामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होणारच असा विश्वास ठाकरे शेवटी यांनी व्यक्त केला. एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ढवळे यांच्या संघटनेने शिवसेनाला पाठिंबा दिला असल्याने ताकद वाढली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(वार्ताहर)