शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

लोकसंवादात मुख्यमंत्र्यांची नाशिकला हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:40 IST

नाशिक : शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाºया केंद्र व राज्य सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकºयांशी थेट ‘लोकसंवाद’ साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील शेतकºयांशी सोमवारी संवाद साधला, परंतु गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्याचे प्रमुख उत्पादन असलेल्या कांद्याचे भाव सातत्याने गडगडल्यामुळे शेतकºयांमध्ये असलेला संताप लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी नाशिकला टाळून जळगाव व नगर जिल्ह्यातील शेतकºयांशी संवाद साधला. थेट मुख्यमंत्र्यांच्या पुढ्यात गाºहाणे मांडण्याची संधी मिळणार असल्याने सकाळी ८ वाजेपासून घर सोडलेल्या जिल्ह्णातील शेतकºयांच्या पदरी अखेर निराशा पडली.

ठळक मुद्देशेतकरी हिरमुसले : कांद्याच्या प्रश्नावरून चर्चा टाळली

नाशिक : शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाºया केंद्र व राज्य सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकºयांशी थेट ‘लोकसंवाद’ साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील शेतकºयांशी सोमवारी संवाद साधला, परंतु गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्याचे प्रमुख उत्पादन असलेल्या कांद्याचे भाव सातत्याने गडगडल्यामुळे शेतकºयांमध्ये असलेला संताप लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी नाशिकला टाळून जळगाव व नगर जिल्ह्यातील शेतकºयांशी संवाद साधला. थेट मुख्यमंत्र्यांच्या पुढ्यात गाºहाणे मांडण्याची संधी मिळणार असल्याने सकाळी ८ वाजेपासून घर सोडलेल्या जिल्ह्णातील शेतकºयांच्या पदरी अखेर निराशा पडली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाच्या तयारीसाठी गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील कृषी खात्याचे अधिकारी व्यस्त होते. ज्या शेतकºयांना शासनाच्या कृषी योजनांचा लाभ मिळाला अशा ‘समाधानी’ शेतकºयांचा शोध घेण्याबरोबरच त्यांना मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना काय बोलावे व काय बोलू नये याचे धडे देण्यात आले. सोमवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री मुंबईहून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील शेतकºयांशी संवाद साधणार असल्यामुळे सकाळी ८ वाजेपासूनच शेतकरी गावाहून जिल्ह्णाच्या मुख्यालयी पोहोचले. परंतु नियोजित वेळेत बदल करण्यात येऊन दुपारी पावणेबारा वाजता मुख्यमंत्र्यांनी संवाद साधायला सुरुवात केली. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे तेथून लोकसंवादाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जवळपास बहुतांशी जिल्ह्यांशी संवाद साधला. उत्तर महाराष्टÑातील जळगाव व नगर जिल्ह्यांतील शेतकºयांना ‘हाल-हवाल’ विचारणाºया मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे सकाळी ८ वाजेपासून घर सोडलेल्या शेतकºयांच्या पदरी निराशा पडली तर कृषी खात्याने आपले पितळ उघडले झाले नाही म्हणून समाधान व्यक्त केले. मुळात नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याचे भाव कोसळत असून, शेतकºयांनी थेट पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना कांदा विक्रीचे पैसे मनिआॅर्डरने पाठवून आपला संताप व्यक्त केला आहे, तर गावोगावी कांदा रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध नोंदविला जात आहे.खेड्या-पाड्यातून आलेल्या शेतकºयांची उपासमार कायमसरकारकडून अद्यापही कांद्याबाबत कोणतेही ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांनी कांद्याचा प्रश्न उपस्थित करून व्यथा मांडल्यास सरकारचे हसे होण्याची शक्यता गृहीत धरूनच मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांकडे पाठ फिरविली. दुपारी २ वाजता हा संवादाचा कार्यक्रम चालला तोपर्यंत खेड्या-पाड्यातून आलेल्या शेतकºयांची उपासमार कायम राहिली. या संवादापासून शासकीय अधिकाºयांना दूर ठेवण्यात आले होते.

शेतकरी हिरमुसले : कांद्याच्या प्रश्नावरून चर्चा टाळलीलोकसंवादात मुख्यमंत्र्यांची नाशिकला हुलकावणीनाशिक : शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाºया केंद्र व राज्य सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकºयांशी थेट ‘लोकसंवाद’ साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील शेतकºयांशी सोमवारी संवाद साधला, परंतु गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्याचे प्रमुख उत्पादन असलेल्या कांद्याचे भाव सातत्याने गडगडल्यामुळे शेतकºयांमध्ये असलेला संताप लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी नाशिकला टाळून जळगाव व नगर जिल्ह्यातील शेतकºयांशी संवाद साधला. थेट मुख्यमंत्र्यांच्या पुढ्यात गाºहाणे मांडण्याची संधी मिळणार असल्याने सकाळी ८ वाजेपासून घर सोडलेल्या जिल्ह्णातील शेतकºयांच्या पदरी अखेर निराशा पडली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाच्या तयारीसाठी गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील कृषी खात्याचे अधिकारी व्यस्त होते. ज्या शेतकºयांना शासनाच्या कृषी योजनांचा लाभ मिळाला अशा ‘समाधानी’ शेतकºयांचा शोध घेण्याबरोबरच त्यांना मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना काय बोलावे व काय बोलू नये याचे धडे देण्यात आले. सोमवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री मुंबईहून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील शेतकºयांशी संवाद साधणार असल्यामुळे सकाळी ८ वाजेपासूनच शेतकरी गावाहून जिल्ह्णाच्या मुख्यालयी पोहोचले. परंतु नियोजित वेळेत बदल करण्यात येऊन दुपारी पावणेबारा वाजता मुख्यमंत्र्यांनी संवाद साधायला सुरुवात केली. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे तेथून लोकसंवादाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जवळपास बहुतांशी जिल्ह्यांशी संवाद साधला. उत्तर महाराष्टÑातील जळगाव व नगर जिल्ह्यांतील शेतकºयांना ‘हाल-हवाल’ विचारणाºया मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे सकाळी ८ वाजेपासून घर सोडलेल्या शेतकºयांच्या पदरी निराशा पडली तर कृषी खात्याने आपले पितळ उघडले झाले नाही म्हणून समाधान व्यक्त केले. मुळात नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याचे भाव कोसळत असून, शेतकºयांनी थेट पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना कांदा विक्रीचे पैसे मनिआॅर्डरने पाठवून आपला संताप व्यक्त केला आहे, तर गावोगावी कांदा रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध नोंदविला जात आहे.खेड्या-पाड्यातून आलेल्या शेतकºयांची उपासमार कायमसरकारकडून अद्यापही कांद्याबाबत कोणतेही ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांनी कांद्याचा प्रश्न उपस्थित करून व्यथा मांडल्यास सरकारचे हसे होण्याची शक्यता गृहीत धरूनच मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांकडे पाठ फिरविली. दुपारी २ वाजता हा संवादाचा कार्यक्रम चालला तोपर्यंत खेड्या-पाड्यातून आलेल्या शेतकºयांची उपासमार कायम राहिली. या संवादापासून शासकीय अधिकाºयांना दूर ठेवण्यात आले होते.