शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

मुख्याधिकारीविना कळवण नगरपंचायतीचा कारभार ठप्प

By admin | Updated: May 15, 2016 22:32 IST

मागणी : अशोक चव्हाण यांना लक्ष घालण्यासाठी साकडे

कळवण : नगरपंचायतीमध्ये गेल्या पंधरा महिन्यांपासून मुख्याधिकाऱ्यांअभावी प्रशासन पूर्णत: ढेपाळले असून, पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने जनतेची कामे कशी करावी, असा प्रश्न सर्वानाच पडला आहे . जिल्ह्यातील नवनिर्मित नगरपंचायतमध्ये अशीच परिस्थिती असल्याने याप्रश्नी कळवण येथे काँग्रेसच्या वतीने आयोजित आदिवासी वनहक्क परिषदेला आलेल्या माजी मुख्यमंत्री,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी लक्ष घालावे, अशी मागणी कळवण नगरपंचायतचे वैद्यकीय व आरोग्य सभापती अतुल पगार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश पगार, काँग्रेसचे नगरसेवक मयुर बहीरम, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती रोहिणी महाले यांनी केली आहे. याप्रश्नी राज्यातील नवनिर्मित नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारींसह प्रमुख प्रशासकीय यंत्रणा नियुक्ती करण्याबाबत राज सरकारनचे लक्ष वेधून प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना दिली. नगरपंचायतीला ग्रामपंचायती पेक्षा जादा विकास निधी येत असल्याने जनतेत ही आशा निर्माण झाली होती. परंतु नगरपंचायतीची निवडणूक घोषित होताच नागरिकांनी निवडणुकीत हिरीरीने सहभाग घेतला. निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आली. त्याला आता सात महिने झाले. मात्र नगरपंचायतीच्या कारभारालाच पूर्ण खीळ बसली आहे.नागरिक नगरपंचायतीत चकरा मारून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व कर्मचारी यांना भेटतात. मात्र कागदपत्रे व दाखले कशी द्यायचे, याबाबत देण्याचे अधिकार कोणाकडे आहे याचा उलगडा पदाधिकाऱ्यांना व नगरसेवकांना होत नसल्याने हतबल झाले आहे. कळवण शहरातील प्रशासन ठप्प झाले आहे. कळवण नगरपंचायतीला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने आणि संपूर्ण कामकाज ठप्प पडले आहे. कळवण शहरातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्या पूर्ण करण्याची नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, नगरसेवक यांची मानसिकता आहे. पण, यंत्रणा नसल्याने पदाधिकारी व नगरसेवक हतबल झाले आहेत. (वार्ताहर)