शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकारीविना कळवण नगरपंचायतीचा कारभार ठप्प

By admin | Updated: May 15, 2016 22:32 IST

मागणी : अशोक चव्हाण यांना लक्ष घालण्यासाठी साकडे

कळवण : नगरपंचायतीमध्ये गेल्या पंधरा महिन्यांपासून मुख्याधिकाऱ्यांअभावी प्रशासन पूर्णत: ढेपाळले असून, पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने जनतेची कामे कशी करावी, असा प्रश्न सर्वानाच पडला आहे . जिल्ह्यातील नवनिर्मित नगरपंचायतमध्ये अशीच परिस्थिती असल्याने याप्रश्नी कळवण येथे काँग्रेसच्या वतीने आयोजित आदिवासी वनहक्क परिषदेला आलेल्या माजी मुख्यमंत्री,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी लक्ष घालावे, अशी मागणी कळवण नगरपंचायतचे वैद्यकीय व आरोग्य सभापती अतुल पगार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश पगार, काँग्रेसचे नगरसेवक मयुर बहीरम, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती रोहिणी महाले यांनी केली आहे. याप्रश्नी राज्यातील नवनिर्मित नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारींसह प्रमुख प्रशासकीय यंत्रणा नियुक्ती करण्याबाबत राज सरकारनचे लक्ष वेधून प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना दिली. नगरपंचायतीला ग्रामपंचायती पेक्षा जादा विकास निधी येत असल्याने जनतेत ही आशा निर्माण झाली होती. परंतु नगरपंचायतीची निवडणूक घोषित होताच नागरिकांनी निवडणुकीत हिरीरीने सहभाग घेतला. निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आली. त्याला आता सात महिने झाले. मात्र नगरपंचायतीच्या कारभारालाच पूर्ण खीळ बसली आहे.नागरिक नगरपंचायतीत चकरा मारून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व कर्मचारी यांना भेटतात. मात्र कागदपत्रे व दाखले कशी द्यायचे, याबाबत देण्याचे अधिकार कोणाकडे आहे याचा उलगडा पदाधिकाऱ्यांना व नगरसेवकांना होत नसल्याने हतबल झाले आहे. कळवण शहरातील प्रशासन ठप्प झाले आहे. कळवण नगरपंचायतीला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने आणि संपूर्ण कामकाज ठप्प पडले आहे. कळवण शहरातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्या पूर्ण करण्याची नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, नगरसेवक यांची मानसिकता आहे. पण, यंत्रणा नसल्याने पदाधिकारी व नगरसेवक हतबल झाले आहेत. (वार्ताहर)