शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

मुख्याधिकारीविना कळवण नगरपंचायतीचा कारभार ठप्प

By admin | Updated: May 15, 2016 22:32 IST

मागणी : अशोक चव्हाण यांना लक्ष घालण्यासाठी साकडे

कळवण : नगरपंचायतीमध्ये गेल्या पंधरा महिन्यांपासून मुख्याधिकाऱ्यांअभावी प्रशासन पूर्णत: ढेपाळले असून, पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने जनतेची कामे कशी करावी, असा प्रश्न सर्वानाच पडला आहे . जिल्ह्यातील नवनिर्मित नगरपंचायतमध्ये अशीच परिस्थिती असल्याने याप्रश्नी कळवण येथे काँग्रेसच्या वतीने आयोजित आदिवासी वनहक्क परिषदेला आलेल्या माजी मुख्यमंत्री,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी लक्ष घालावे, अशी मागणी कळवण नगरपंचायतचे वैद्यकीय व आरोग्य सभापती अतुल पगार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश पगार, काँग्रेसचे नगरसेवक मयुर बहीरम, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती रोहिणी महाले यांनी केली आहे. याप्रश्नी राज्यातील नवनिर्मित नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारींसह प्रमुख प्रशासकीय यंत्रणा नियुक्ती करण्याबाबत राज सरकारनचे लक्ष वेधून प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना दिली. नगरपंचायतीला ग्रामपंचायती पेक्षा जादा विकास निधी येत असल्याने जनतेत ही आशा निर्माण झाली होती. परंतु नगरपंचायतीची निवडणूक घोषित होताच नागरिकांनी निवडणुकीत हिरीरीने सहभाग घेतला. निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आली. त्याला आता सात महिने झाले. मात्र नगरपंचायतीच्या कारभारालाच पूर्ण खीळ बसली आहे.नागरिक नगरपंचायतीत चकरा मारून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व कर्मचारी यांना भेटतात. मात्र कागदपत्रे व दाखले कशी द्यायचे, याबाबत देण्याचे अधिकार कोणाकडे आहे याचा उलगडा पदाधिकाऱ्यांना व नगरसेवकांना होत नसल्याने हतबल झाले आहे. कळवण शहरातील प्रशासन ठप्प झाले आहे. कळवण नगरपंचायतीला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने आणि संपूर्ण कामकाज ठप्प पडले आहे. कळवण शहरातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्या पूर्ण करण्याची नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, नगरसेवक यांची मानसिकता आहे. पण, यंत्रणा नसल्याने पदाधिकारी व नगरसेवक हतबल झाले आहेत. (वार्ताहर)