शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

अखर्चित निधीवरून छगन भुजबळ संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 00:56 IST

जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधींचे नियतव्यय मंजूर असूनही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे केवळ २० टक्केच निधी खर्च झाल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने ही अतिशय निराशाजनक बाब आहे. कोट्यवधींचा निधी हातात असतानाही योजनांवरील खर्च होऊ शकलेला नाही, या उलट तांत्रिक कारणे सांगितली जात आहेत ही बाब गंभीर असल्याने याप्रकरणी दोषी आढळणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाºयांना दिले.

ठळक मुद्देनियोजन समिती बैठक । कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश

नाशिक : जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधींचे नियतव्यय मंजूर असूनही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे केवळ २० टक्केच निधी खर्च झाल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने ही अतिशय निराशाजनक बाब आहे. कोट्यवधींचा निधी हातात असतानाही योजनांवरील खर्च होऊ शकलेला नाही, या उलट तांत्रिक कारणे सांगितली जात आहेत ही बाब गंभीर असल्याने याप्रकरणी दोषी आढळणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाºयांना दिले. उर्वरित निधी खर्चाच्या संदर्भात तरतुदी तातडीने पूर्ण कराव्यात असे आदेश देतानाच पुढील दहा दिवसांत पुन्हा नियोजन समितीच्या बैठकीत आढावा घेण्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी जाहीर केले.जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे पार पडली. यावेळी व्यासपीठावर खासदर भारती पवार, हेमंत गोडसे, कृषिमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे,पोलीस अधीक्षक आरती सिंह उपस्थित होते. यावेळी भुजबळ यांनी सन २०१८ ते २०१९ आणि २०१९ मधील सद्य:स्थिती यामधील सर्वसाधारण योजना, आदिवासी उपाययोजना आणि अनुसूचित जाती उपाययोजनेची माहिती घेतली. याप्रसंगी विविध विभागांतील अधिकाºयांनी मंजूर नियतव्यय आणि खर्च निधीचा आढावा सादर केला असता प्राप्त निधीच्या अत्यंत कमी टक्के काम झाल्याची बाब समोर आल्याने भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकाºयांनी कर्तव्य आणि विकासाच्या बाबतीत दाखविलेल्या असंवेदनशील भूमिकेविषयी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करून जिल्ह्णाच्या विकासासाठी निधी हवाय की नको असा थेट प्रश्नच अधिकाºयांना विचारलाच शिवाय नाशिक जिल्ह्यात काम करायचे नसेल, तर ‘अन्य जिल्ह्यात खुशालजा’ असे म्हणण्याची वेळ भुजबळांवर आली.सन २०१९-२०२० मधील मंजूर नियतव्यय ७९१ कोटी रुपये असताना खर्च केवळ १६४ कोटी रुपयेच होत असेल तर ही बाब अतिशय गंभीर असल्याचे भुजबळ यांनी अधोरेखित केले. ज्यांना मंजूर कामे, मागणी केलेला निधी, कामांचा तपशील तसेच स्पीलओव्हरची माहितीच सभागृहापुढे मांडता आली नाही अशा अधिकाºयांवर कारवाई करण्याचे आदेशच त्यांनी दिले.सरकार बदनाम होता कामा नयेअधिकाºयांनी आता लागलीच कामाला सुरुवात करा, असे सांगतानाच भुजबळ यांनी आपल्या खात्याचे पैसे योजनांवर खर्च कसे होतील याकडे अधिकाºयांनी लक्ष दिले पाहिजे सुचविले. सरकारचे नाव बदनाम होता कामा नये असे सांगून जिल्हाधिकाºयांनी अशा कामचुकार अधिकाºयांसदर्भात तातडीने निर्णय घेतले पाहिजे, असेही सांगितले. आगामी दहा दिवसांत कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे आदेशदेखील त्यांनी अधिकाºयांना दिले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी