शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

अखर्चित निधीवरून छगन भुजबळ संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 00:56 IST

जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधींचे नियतव्यय मंजूर असूनही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे केवळ २० टक्केच निधी खर्च झाल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने ही अतिशय निराशाजनक बाब आहे. कोट्यवधींचा निधी हातात असतानाही योजनांवरील खर्च होऊ शकलेला नाही, या उलट तांत्रिक कारणे सांगितली जात आहेत ही बाब गंभीर असल्याने याप्रकरणी दोषी आढळणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाºयांना दिले.

ठळक मुद्देनियोजन समिती बैठक । कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश

नाशिक : जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधींचे नियतव्यय मंजूर असूनही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे केवळ २० टक्केच निधी खर्च झाल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने ही अतिशय निराशाजनक बाब आहे. कोट्यवधींचा निधी हातात असतानाही योजनांवरील खर्च होऊ शकलेला नाही, या उलट तांत्रिक कारणे सांगितली जात आहेत ही बाब गंभीर असल्याने याप्रकरणी दोषी आढळणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाºयांना दिले. उर्वरित निधी खर्चाच्या संदर्भात तरतुदी तातडीने पूर्ण कराव्यात असे आदेश देतानाच पुढील दहा दिवसांत पुन्हा नियोजन समितीच्या बैठकीत आढावा घेण्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी जाहीर केले.जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे पार पडली. यावेळी व्यासपीठावर खासदर भारती पवार, हेमंत गोडसे, कृषिमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे,पोलीस अधीक्षक आरती सिंह उपस्थित होते. यावेळी भुजबळ यांनी सन २०१८ ते २०१९ आणि २०१९ मधील सद्य:स्थिती यामधील सर्वसाधारण योजना, आदिवासी उपाययोजना आणि अनुसूचित जाती उपाययोजनेची माहिती घेतली. याप्रसंगी विविध विभागांतील अधिकाºयांनी मंजूर नियतव्यय आणि खर्च निधीचा आढावा सादर केला असता प्राप्त निधीच्या अत्यंत कमी टक्के काम झाल्याची बाब समोर आल्याने भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकाºयांनी कर्तव्य आणि विकासाच्या बाबतीत दाखविलेल्या असंवेदनशील भूमिकेविषयी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करून जिल्ह्णाच्या विकासासाठी निधी हवाय की नको असा थेट प्रश्नच अधिकाºयांना विचारलाच शिवाय नाशिक जिल्ह्यात काम करायचे नसेल, तर ‘अन्य जिल्ह्यात खुशालजा’ असे म्हणण्याची वेळ भुजबळांवर आली.सन २०१९-२०२० मधील मंजूर नियतव्यय ७९१ कोटी रुपये असताना खर्च केवळ १६४ कोटी रुपयेच होत असेल तर ही बाब अतिशय गंभीर असल्याचे भुजबळ यांनी अधोरेखित केले. ज्यांना मंजूर कामे, मागणी केलेला निधी, कामांचा तपशील तसेच स्पीलओव्हरची माहितीच सभागृहापुढे मांडता आली नाही अशा अधिकाºयांवर कारवाई करण्याचे आदेशच त्यांनी दिले.सरकार बदनाम होता कामा नयेअधिकाºयांनी आता लागलीच कामाला सुरुवात करा, असे सांगतानाच भुजबळ यांनी आपल्या खात्याचे पैसे योजनांवर खर्च कसे होतील याकडे अधिकाºयांनी लक्ष दिले पाहिजे सुचविले. सरकारचे नाव बदनाम होता कामा नये असे सांगून जिल्हाधिकाºयांनी अशा कामचुकार अधिकाºयांसदर्भात तातडीने निर्णय घेतले पाहिजे, असेही सांगितले. आगामी दहा दिवसांत कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे आदेशदेखील त्यांनी अधिकाºयांना दिले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी