शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

नाव बदलणे आता झाले सोपे

By admin | Updated: July 28, 2014 23:29 IST

नाव बदलणे आता झाले सोपे

 

विंचूर : नावात काय आहे असे शेक्सपिअर म्हणून गेला आहे. पण हे म्हणताना शेक्सपिअरचे नाव मात्र घ्यावेच लागते. सर्वसाधारणत: विवाहानंतर नाव बदलले जाते. मात्र प्रॉपर्टीसाठी, अंकशास्त्राच्या नियमाप्रमाणे किंवा नाव आवडत नाही म्हणून नाव बदलणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. नाव, आडनाव, आणि धर्म बदलण्याच्या पूर्वीच्या किचकट आणि वेळखाऊ पद्धतीत आता बदल करण्यात आला असून, सदर प्रक्रिया आॅनलाइन करण्यात आली आहे. नाव बदलण्याबाबतच्या जाहिराती शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठीची छापील अर्जाची पद्धत संपुष्टात आली असून, आॅनलाइन पद्धतीमुळे हा त्रास निश्चितपणे कमी होणार असल्याने नाव कट करण्याची कटकट कमी होणार आहे.मुद्रण व लेखनसामग्री संचालनालयामार्फत साधारण व असाधारण अशा ३२ प्रकारचे राजपत्र छपाई करून प्रसिद्ध केली जातात. त्यापैकी नागरिकांना नाव, धर्म व जन्मतारीख बदलाबाबतचे जाहिरातीचे राजपत्र भाग दोनमध्ये छपाई केली जाते. त्यासाठी नागरिकांना संचालनालयाच्या खिडकीवर रांग लावून अर्ज प्राप्त करुन अर्ज भरुन सादर करावे लागत होते. शासन राजपत्रही आॅनलाइन प्रसिद्ध करण्यात येणार आहे. लग्न झाल्यावर नाव बदलणे किंवा दाखल्यावरील जन्मतारीख बदलणे यासाठी शासकीय मुद्रण व लेखनसामग्री संचालनालयात जाऊन अर्ज करावा लागतो. शासनपत्रात ते प्रसिद्ध करून घेण्याची पद्धत होती. ही प्रक्रिया वेळखाऊ व किचकट होती. मात्र ही प्रक्रिया यापुढे आता आॅनलाइन पद्धतीने राहणार असून, त्यासाठीचे शुल्कदेखील आॅनलाइन पद्धतीने भरण्याची सोय शासनाने करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेता यावा म्हणून अर्ज भरताना पासपोर्ट, वाहनचालक परवाना, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड यापैकी कुठल्याही एकाची प्रत स्कॅन करून जोडावी लागणार आहे.(वार्ताहर)