शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

जुन्या नाशिकचा बदलणार चेहरामोहरा

By admin | Updated: September 21, 2016 00:35 IST

स्मार्ट सिटी : हनुमानवाडीचे पालटणार रूपडे, पाणीपुरवठ्यात तंत्रज्ञानाचा वापर

नाशिक : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाच्या दुसऱ्या फेरीत अखेर नाशिकचा समावेश झाला आणि सिंहस्थ कुंभमेळ्यातील बदलानंतर नाशिकचा आणखी नव्या विकास पर्वाला प्रारंभ होणार आहे. नाशिक महापालिकेने सादर केलेल्या आराखड्यानुसार जुन्या नाशिकचा चेहरामोहरा बदलणार असून, ग्रीनफिल्ड अंतर्गत पंचवटीतील हनुमानवाडीचेही रूपडे पालटणार आहे. याशिवाय, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाणीपुरवठा व पार्किंग व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर बदल अपेक्षित आहेत. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाच्या दुसऱ्या फेरीसाठी महापालिकेने ३० जून २०१६ रोजी केंद्राला आराखडा सादर केला होता. दुसऱ्या फेरीत नाशिकची निवड अपेक्षित मानली जात होती. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: नाशिक दौऱ्यात नाशिकची स्मार्ट निवड होण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार, केंद्र सरकारने मंगळवारी जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत नाशिकचा समावेश झाला असून, नाशिकने महाराष्ट्रातील पाच शहरांमध्ये कल्याण, डोंबिवली, नागपूर, ठाणे शहरांनंतर चौथा क्रमांक मिळविला आहे, तर एकूण २७ शहरांच्या यादीत ११व्या स्थानावर झेप घेतली आहे. डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तयार केला होता. त्यासाठी लोकांचाही सहभाग घेण्यात आला होता. प्रस्ताव तयार करण्यासाठी ‘क्रिसिल’ या नामवंत संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. प्रस्तावात नाशिक महापालिकेने पॅनसिटी, रेट्रोफिटिंग आणि ग्रीनफिल्ड याअंतर्गत तीन प्रस्ताव सादर केले होते. त्यानुसार जुन्या नाशिकची पुनर्विकास योजना आहे.