शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

94 विद्यार्थ्यांच्या गुणांत झाला बदल

By admin | Updated: July 19, 2014 00:57 IST

94 विद्यार्थ्यांच्या गुणांत झाला बदल

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या गुणपडताळणीनंतर तब्बल ९४ विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल झाला आहे. या बदलामुळे या मुलांच्या एकूण गुणांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांना जर आपल्या गुणांच्या बाबतीत आणि उत्तरपत्रिकांच्या संदर्भात शंका असल्यास त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळाने व्यवस्था केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या त्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिकांची झेरॉक्स मिळते, त्या आधारे ते पुनर्मूल्यांकनासाठी अर्जही करू शकतात. याच लाभ दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे. इयत्ता बारावीतील गुणांची पडताळणी करून मिळावी, असे एकूण ७६८ इतके अर्ज प्राप्त झाले होते. तर सुमारे ८९० विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांची छायांकीत प्रत मिळावी, अशी मागणी केली होती. १५५ विद्यार्थ्यांनी गुणांचे पुनर्मूल्यांकन करण्याचीही मागणी केली होती. या प्रक्रियेतून बारावीच्या ९४ विद्यार्थ्यांना थेट लाभ झाला असून, त्यांच्या गुणांत बदल झाला आहे. अशाच प्रकारे इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी देखील लाभ घेतला. मात्र दहावीत अद्याप तरी अर्ज दाखल केलेल्या एकाही विद्यार्थ्याच्या गुणात बदल झालेला नाही. दहावीतील ११३ विद्यार्थ्यांनी गुण पडताळणी करून मिळावी यासाठी अर्ज केला आहे, तर ४४८ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींची मागणी केली आहे. पुनर्मूल्यांकनासाठी अत्यल्प २४ इतके अर्ज दाखल झाले होते. अजूनही ही प्रक्रिया सुरूच आहे. (प्रतिनिधी)