शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

94 विद्यार्थ्यांच्या गुणांत झाला बदल

By admin | Updated: July 19, 2014 00:57 IST

94 विद्यार्थ्यांच्या गुणांत झाला बदल

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या गुणपडताळणीनंतर तब्बल ९४ विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल झाला आहे. या बदलामुळे या मुलांच्या एकूण गुणांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांना जर आपल्या गुणांच्या बाबतीत आणि उत्तरपत्रिकांच्या संदर्भात शंका असल्यास त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळाने व्यवस्था केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या त्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिकांची झेरॉक्स मिळते, त्या आधारे ते पुनर्मूल्यांकनासाठी अर्जही करू शकतात. याच लाभ दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे. इयत्ता बारावीतील गुणांची पडताळणी करून मिळावी, असे एकूण ७६८ इतके अर्ज प्राप्त झाले होते. तर सुमारे ८९० विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांची छायांकीत प्रत मिळावी, अशी मागणी केली होती. १५५ विद्यार्थ्यांनी गुणांचे पुनर्मूल्यांकन करण्याचीही मागणी केली होती. या प्रक्रियेतून बारावीच्या ९४ विद्यार्थ्यांना थेट लाभ झाला असून, त्यांच्या गुणांत बदल झाला आहे. अशाच प्रकारे इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी देखील लाभ घेतला. मात्र दहावीत अद्याप तरी अर्ज दाखल केलेल्या एकाही विद्यार्थ्याच्या गुणात बदल झालेला नाही. दहावीतील ११३ विद्यार्थ्यांनी गुण पडताळणी करून मिळावी यासाठी अर्ज केला आहे, तर ४४८ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींची मागणी केली आहे. पुनर्मूल्यांकनासाठी अत्यल्प २४ इतके अर्ज दाखल झाले होते. अजूनही ही प्रक्रिया सुरूच आहे. (प्रतिनिधी)