शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
3
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
4
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
5
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
6
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
7
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
8
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
9
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
10
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
11
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
12
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
13
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?
14
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
15
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
16
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
17
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
18
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
19
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
20
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार

94 विद्यार्थ्यांच्या गुणांत झाला बदल

By admin | Updated: July 19, 2014 00:57 IST

94 विद्यार्थ्यांच्या गुणांत झाला बदल

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या गुणपडताळणीनंतर तब्बल ९४ विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल झाला आहे. या बदलामुळे या मुलांच्या एकूण गुणांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांना जर आपल्या गुणांच्या बाबतीत आणि उत्तरपत्रिकांच्या संदर्भात शंका असल्यास त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळाने व्यवस्था केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या त्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिकांची झेरॉक्स मिळते, त्या आधारे ते पुनर्मूल्यांकनासाठी अर्जही करू शकतात. याच लाभ दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे. इयत्ता बारावीतील गुणांची पडताळणी करून मिळावी, असे एकूण ७६८ इतके अर्ज प्राप्त झाले होते. तर सुमारे ८९० विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांची छायांकीत प्रत मिळावी, अशी मागणी केली होती. १५५ विद्यार्थ्यांनी गुणांचे पुनर्मूल्यांकन करण्याचीही मागणी केली होती. या प्रक्रियेतून बारावीच्या ९४ विद्यार्थ्यांना थेट लाभ झाला असून, त्यांच्या गुणांत बदल झाला आहे. अशाच प्रकारे इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी देखील लाभ घेतला. मात्र दहावीत अद्याप तरी अर्ज दाखल केलेल्या एकाही विद्यार्थ्याच्या गुणात बदल झालेला नाही. दहावीतील ११३ विद्यार्थ्यांनी गुण पडताळणी करून मिळावी यासाठी अर्ज केला आहे, तर ४४८ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींची मागणी केली आहे. पुनर्मूल्यांकनासाठी अत्यल्प २४ इतके अर्ज दाखल झाले होते. अजूनही ही प्रक्रिया सुरूच आहे. (प्रतिनिधी)