शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

जग सुंदर करण्यासाठी विचार बदला देशमुख : गिरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:14 IST

नाशिक : तुम्हाला जग सुंदर हवे असेल, तर आहे त्या परिस्थितीची तक्रार न करता अडीअडचणींवर मात करत प्रयत्न करतानाच तुमचे आचार-विचार बदला, तरच जग बदलू शकते.

ठळक मुद्देचांगल्या विचाराने सुरुवात केली तर आपले जग सुंदर होऊ शकतेछोट्या छोट्या लढायांनी आपल्या देशाच्या विकासाची लढाई

नाशिक : तुम्हाला जग सुंदर हवे असेल, तर आहे त्या परिस्थितीची तक्रार न करता अडीअडचणींवर मात करत प्रयत्न करतानाच तुमचे आचार-विचार बदला, तरच जग बदलू शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. ते रावसाहेब थोरात सभागृह येथे आनंद अ‍ॅग्रो ग्रुप व गिरणा गौरव प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित गिरणा गौरव पुरस्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते. गुरुवारी (दि.५) सायंकाळी हा सोहळा दिमाखात पार पडला. ते पुढे म्हणाले की, चांगल्या विचाराने सुरुवात केली तर आपले जग सुंदर होऊ शकते. आपले अनुभवविश्व संपन्न होऊ शकते. छोट्या छोट्या लढायांनी आपल्या देशाच्या विकासाची लढाई आपण लढू शकतो. याप्रसंगी गौरी सावंत (समाजसेवा), अरविंद जगताप (लेखक, दिग्दर्शक), सारिका अहिरराव (पोलीस), अश्विनी बोरस्ते (समाजसेवा), सोमनाथ कोकरे (छायाचित्रकार), डॉ. तानाजी वाघ, विश्वास ठाकूर (सहकार), समाधान हिरे (उद्योजक), कृष्णा भामरे (कृषिमित्र), डॉ. सरोज जगताप (शैक्षणिक), चंद्रशेखर सोनवणे (लायन्स क्लब) यांना मान्यवरांच्या हस्ते गिरणा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक अमर हबीब यांनी मार्गदर्शन केले. मानिनी दाणी यांनी स्वागतगीत म्हटले. सुरेश पवार यांनी स्वागत केले. वैशाली अहिरे यांनी प्रास्ताविक केले. उद्धव अहेर यांनी पुरस्कार निवडीची प्रक्रिया स्पष्ट करतानाच आजवरचे अनुभवही नमूद केले. मान्यवरांच्या हस्ते ‘आदर्श पोल्ट्री उद्योजक’, ‘आभाळाचा उंबरा’ या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार प्रतापराव सोनवणे, शशिकांत जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.चांगले बदल घडविण्यासाठी प्रेरणा घ्यावीप्रतिकूल परिस्थितीतही समाजात चांगले बदल घडवून आणणाऱ्यांकडून प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बदलाकडे वाटचाल करणारी लघुरूपातील ताकद या पुरस्कारार्थींच्या रूपाने दिसत असल्याचेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.