शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

जग सुंदर करण्यासाठी विचार बदला देशमुख : गिरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:14 IST

नाशिक : तुम्हाला जग सुंदर हवे असेल, तर आहे त्या परिस्थितीची तक्रार न करता अडीअडचणींवर मात करत प्रयत्न करतानाच तुमचे आचार-विचार बदला, तरच जग बदलू शकते.

ठळक मुद्देचांगल्या विचाराने सुरुवात केली तर आपले जग सुंदर होऊ शकतेछोट्या छोट्या लढायांनी आपल्या देशाच्या विकासाची लढाई

नाशिक : तुम्हाला जग सुंदर हवे असेल, तर आहे त्या परिस्थितीची तक्रार न करता अडीअडचणींवर मात करत प्रयत्न करतानाच तुमचे आचार-विचार बदला, तरच जग बदलू शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. ते रावसाहेब थोरात सभागृह येथे आनंद अ‍ॅग्रो ग्रुप व गिरणा गौरव प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित गिरणा गौरव पुरस्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते. गुरुवारी (दि.५) सायंकाळी हा सोहळा दिमाखात पार पडला. ते पुढे म्हणाले की, चांगल्या विचाराने सुरुवात केली तर आपले जग सुंदर होऊ शकते. आपले अनुभवविश्व संपन्न होऊ शकते. छोट्या छोट्या लढायांनी आपल्या देशाच्या विकासाची लढाई आपण लढू शकतो. याप्रसंगी गौरी सावंत (समाजसेवा), अरविंद जगताप (लेखक, दिग्दर्शक), सारिका अहिरराव (पोलीस), अश्विनी बोरस्ते (समाजसेवा), सोमनाथ कोकरे (छायाचित्रकार), डॉ. तानाजी वाघ, विश्वास ठाकूर (सहकार), समाधान हिरे (उद्योजक), कृष्णा भामरे (कृषिमित्र), डॉ. सरोज जगताप (शैक्षणिक), चंद्रशेखर सोनवणे (लायन्स क्लब) यांना मान्यवरांच्या हस्ते गिरणा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक अमर हबीब यांनी मार्गदर्शन केले. मानिनी दाणी यांनी स्वागतगीत म्हटले. सुरेश पवार यांनी स्वागत केले. वैशाली अहिरे यांनी प्रास्ताविक केले. उद्धव अहेर यांनी पुरस्कार निवडीची प्रक्रिया स्पष्ट करतानाच आजवरचे अनुभवही नमूद केले. मान्यवरांच्या हस्ते ‘आदर्श पोल्ट्री उद्योजक’, ‘आभाळाचा उंबरा’ या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार प्रतापराव सोनवणे, शशिकांत जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.चांगले बदल घडविण्यासाठी प्रेरणा घ्यावीप्रतिकूल परिस्थितीतही समाजात चांगले बदल घडवून आणणाऱ्यांकडून प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बदलाकडे वाटचाल करणारी लघुरूपातील ताकद या पुरस्कारार्थींच्या रूपाने दिसत असल्याचेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.