शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रक्रि येत बदल आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:19 IST

देशातील लोकशाहीप्रणाली अबाधित राखण्यासाठी निवडणूकप्रक्रियेत बदल आवश्यक असून, देशभरात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगर परिषदा व महापालिका निवडणुका एकत्रित घेतल्यास निवडणूक प्रक्रिया आणखी प्रभावशाली होईल, असा विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी व्यक्त केला.

शिवराज पाटील : लोकशाहीप्रणालीवर नाशिकरांनी साधला संवादनाशिक : देशातील लोकशाहीप्रणाली अबाधित राखण्यासाठी निवडणूकप्रक्रियेत बदल आवश्यक असून, देशभरात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगर परिषदा व महापालिका निवडणुका एकत्रित घेतल्यास निवडणूक प्रक्रिया आणखी प्रभावशाली होईल, असा विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी व्यक्त केला. शंकराचार्य न्यासचा सांस्कृतिक विभाग व ज्योती स्टोअर्स यांच्या संयुक्त ‘लेखक तुमच्या भेटीला’ उपक्रमांतर्गत शिवराज पाटील यांनी ‘स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर भारतीय लोकशाहीचा प्रवास कोणत्या दिशेने?’ विषयावर बोलताना शिवराज पाटील यांनी देशातील लोकशाही प्रणालीसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध राष्ट्रांमधील लोकशाही व्यवस्थेविषयी भाष्य केले. व्यासपीठावर माजी आरोग्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार निशिगंधा मोगल, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इ. वायुनंदन, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, वसंत खैरनार, आशिष कुलकर्णी उपस्थित होते. पाटील म्हणाले, निवडणुकीत होणारा पैशांचा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीचा खर्च करणे गरजेचे असून दहा कोटींपेक्षा अधिक उत्पन्न गटावर निवडणूक कर आकारल्यास सरकारला असा खर्च करणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आयोजकांच्या रेंगाळलेले सत्कार समारंभ, परिचय, प्रास्ताविक, अधिक वेळ घेतल्याने पाटील यांनी नाराजी व्यक्त करीत आपण मनोगत आवरते घेणार असल्याचे सुरुवातीलाच स्पष्ट करत उपस्थितांशी प्रश्नोत्तरांतून विषय मांडणार असल्याचे सांगितले. परंतु, तरीही पहिल्या रांगेतील काही श्रोत्यांनी पाटील यांना मूळ विषयाला बगल देऊन मुंबई हल्ल्याविषयी व काश्मीर प्रश्नाविषयी प्रश्न विचारून विषयांतर घडविण्याचा प्रयत्न केला.त्यावर पाटील यांनी लोकशाहीला अनुसरून बोलताना काही धार्मिक विद्वेश निर्माण करणारे घटक मूळ मुद्द्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. तसेच केवळ तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या दुरगामी विचारांमुळेच कलम ३७०च्या माध्यमातून काश्मीर भारताचा भाग म्हणून कायमस्वरूपी भारताशी जोडून राहिल्याचे स्पष्ट केले.राजकीय, सामाजिक समानता गरजेचीदेशातील लोकशाही मजबूत राहण्यासाठी देशात सामाजिक व राजकीय समानता असणे गरजेचे आहे. देशात सध्या सामाजिक समानता वाढली आहे. आंतरजातीय विवाह होत असताना निवडणुकांमध्ये अजूनही धर्म- जात असे मुद्दे येतात. परंतु कोणत्याही धर्म अथवा जातीची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक नाही. त्यामुळे जातीव्यवस्थेवर आधारीत लोकशाही अस्तित्वात येणे शक्य नसल्याचे शिवराज पाटील म्हणाले.घटनेत नव्हे, विचारांमध्ये बदल हवाकाही संघटनांची राजकीय विचारसरणी ही धार्मिक विषमतावादी विचारांनी प्रेरित असून, अन्य जाती- धर्मांना अस्पृष्यतेची वागणूक देऊन राष्ट्र समाज एकत्रित होणे कदापि शक्य नाही. अशा धार्मिक घटकांचे राष्ट्र एकीकरणाच्या व राष्ट्राभिमानाच्या नावाखाली घटनेत बदल करण्याचे प्रयत्न सुरू आहे. परंतु, एकसंघ समाज निर्मितीसाठी घटनेत नव्हे, तर विचारसरणीत बदल घडवून आणण्याची गरज असल्याचे शिवराज यांनी स्पष्ट केले.