शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

आणेवारीचे निकष बदलून दुष्काळ जाहीर करा

By admin | Updated: October 20, 2015 22:46 IST

इगतपुरी : भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांशी पाणीटंचाईबाबत चर्चा

इगतपुरी : तालुक्यातील महसूल विभागातील सहा मंडळनिहाय पावसाची टक्केवारी कमी जास्त असून मोठी तफावतीची आहे. त्याच चुकीच्या पद्धतीनुसार सरासरी पर्जन्यमान ठरवून तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होतो. हा अन्याय दूर करण्यासाठी निकष बदलावेत अशी मागणी इगतपुरी तालुका भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची मंत्रालयात भेट घेऊन शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.आकडेवारी पाहता यामध्ये मोठी तफावत आहे. परंतु आणेवारी लावताना पूर्ण तालुक्याच्या पावसाचे प्रमाण धरले जाते. परिणामी तालुक्याची आणेवारी कमी असताना ५० टक्क्यांपेक्षा जास्त धरली गेल्याने शेतकरी वर्गावर अन्याय होतो. शासनाने हे निकष बदलून तालुक्याची आणेवारी ५० टक्क्यांच्या आत लावून इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा, असे निवेदनात नमूद आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, तालुकाध्यक्ष पांडुरंग बऱ्हे, महेश श्रीश्रीमाळ, भाऊसाहेब धोंगडे, अण्णासाहेब डोंगरे, मुन्ना शेख, मुन्ना पवार, पांडुरंग बऱ्हे, भाऊसोहब कडभाने, शहराध्यक्ष मुन्ना पवार, कैलास चौधरी, महेश श्रीश्रीमाळ, नंदुपाटील गाडवे, खंडेराव धांडे, संजय गुळवे, जयराम गव्हाणे, राजाराम गोवर्धने, भागीरथ भगत, अलीम शेख, तौफीक गलेरिया आदि उपस्थित होते.