शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड : मंगरूळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वादाबाबत तहसीलदारांना निवेदन ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:53 IST

चांदवड : मंगरूळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मंगरूळ, भरवीर, देवगाव, शिवाजीनगर अशा चार गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीवर बहिष्कारग्रामपंचायत कार्यालयास कुलूप

चांदवड : तालुक्यातील मंगरूळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मंगरूळ, भरवीर, देवगाव, शिवाजीनगर अशा चार गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे. परंतु प्रत्येक गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी अशी सन १९९९ पासून ग्रामस्थांची सतत मागणी असून, गेल्या १७ वर्षांपासून ग्रामपंचायत विभाजनाचा प्रस्ताव पाठवून व पाठपुरावा करूनही ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन होत नाही. त्यामुळे चारही गावांतील ग्रामस्थांनी विभाजन न झाल्याने पुन्हा एकदा या निवडणुकीवर बहिष्कार टाकला, तशा आशयाचे निवेदन तहसीलदार डॉ. शरद मंडलिक यांना ग्रामस्थांनी दिले. यावेळी विलास ढोमसे, विजय पुंजाराम जाधव, अशोक भोसले, सुनील देशमुख, रवींद्र जाधव, सचिन म्हैसधुणे, संजय धाकराव, बाळासाहेब पवार, गणपतराव शिंदे, बाळासाहेब कावळे, प्रकाश देशमाने, योगेश ढोमसे, जालिंदर जाधव, दौलत कांदळकर, शिवाजी चव्हाण, मांगीलाल कांदळकर, गोविंद निरभवणे, गोरख ढगे, अंबादास घोलप, बाळकृष्ण जाधव आदींसह असंख्य नागरिकांच्या सह्या आहेत. या विभाजनाचा प्रस्ताव पडताळणी करून दि. ३० मार्च २०१५ रोजी ग्रामविकास मंत्रालयात दाखल केला होता. परंतु सिंहस्थाच्या कारणामुळे ग्रामपंचायतीच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्यात आल्याने सदरचा प्रस्ताव शासनाने परत पाठविला. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या चारही पोटनिवडणुकांवर गावातील ग्रामस्थांनी एकमताने बहिष्कार टाकला व शासनदरबारी दुसºयांदा ग्रामपंचायत विभाजनाचा प्रस्ताव विहित नमुन्यात तयार करून गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त, प्रधान सचिव, पंचायत राज यांच्या कार्यालयामधून सर्व अटींची पूर्तता करून जून २०१७ मध्ये पाठविला असून, आता पाचव्या वेळी ग्रामपंचायत मंगरूळची पोटनिवडणूक लागली आहे. त्यावरही सर्वच ग्रामस्थांनी एकमताने बहिष्कार टाकला आहे. जोपर्यंत या ग्रामपंचायतीचे विभाजन होत नाही तोपर्यंत निवडणूक होऊ देणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी केला असून, यासाठी मोर्चा, आंदोलने छेडून ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यालयास कायमस्वरूपी कुलूप लावू, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री राज्यमंत्री दादा भुसे, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार डॉ. राहुल अहेर, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.