शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

चांदवड : मंगरूळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वादाबाबत तहसीलदारांना निवेदन ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:53 IST

चांदवड : मंगरूळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मंगरूळ, भरवीर, देवगाव, शिवाजीनगर अशा चार गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीवर बहिष्कारग्रामपंचायत कार्यालयास कुलूप

चांदवड : तालुक्यातील मंगरूळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मंगरूळ, भरवीर, देवगाव, शिवाजीनगर अशा चार गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे. परंतु प्रत्येक गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी अशी सन १९९९ पासून ग्रामस्थांची सतत मागणी असून, गेल्या १७ वर्षांपासून ग्रामपंचायत विभाजनाचा प्रस्ताव पाठवून व पाठपुरावा करूनही ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन होत नाही. त्यामुळे चारही गावांतील ग्रामस्थांनी विभाजन न झाल्याने पुन्हा एकदा या निवडणुकीवर बहिष्कार टाकला, तशा आशयाचे निवेदन तहसीलदार डॉ. शरद मंडलिक यांना ग्रामस्थांनी दिले. यावेळी विलास ढोमसे, विजय पुंजाराम जाधव, अशोक भोसले, सुनील देशमुख, रवींद्र जाधव, सचिन म्हैसधुणे, संजय धाकराव, बाळासाहेब पवार, गणपतराव शिंदे, बाळासाहेब कावळे, प्रकाश देशमाने, योगेश ढोमसे, जालिंदर जाधव, दौलत कांदळकर, शिवाजी चव्हाण, मांगीलाल कांदळकर, गोविंद निरभवणे, गोरख ढगे, अंबादास घोलप, बाळकृष्ण जाधव आदींसह असंख्य नागरिकांच्या सह्या आहेत. या विभाजनाचा प्रस्ताव पडताळणी करून दि. ३० मार्च २०१५ रोजी ग्रामविकास मंत्रालयात दाखल केला होता. परंतु सिंहस्थाच्या कारणामुळे ग्रामपंचायतीच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्यात आल्याने सदरचा प्रस्ताव शासनाने परत पाठविला. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या चारही पोटनिवडणुकांवर गावातील ग्रामस्थांनी एकमताने बहिष्कार टाकला व शासनदरबारी दुसºयांदा ग्रामपंचायत विभाजनाचा प्रस्ताव विहित नमुन्यात तयार करून गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त, प्रधान सचिव, पंचायत राज यांच्या कार्यालयामधून सर्व अटींची पूर्तता करून जून २०१७ मध्ये पाठविला असून, आता पाचव्या वेळी ग्रामपंचायत मंगरूळची पोटनिवडणूक लागली आहे. त्यावरही सर्वच ग्रामस्थांनी एकमताने बहिष्कार टाकला आहे. जोपर्यंत या ग्रामपंचायतीचे विभाजन होत नाही तोपर्यंत निवडणूक होऊ देणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी केला असून, यासाठी मोर्चा, आंदोलने छेडून ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यालयास कायमस्वरूपी कुलूप लावू, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री राज्यमंत्री दादा भुसे, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार डॉ. राहुल अहेर, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.