शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

विनोदी लेखणीचा जादूगार चंद्रकांत महामिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:17 IST

महामिने नेहमी म्हणत, आपण खेड्यात जन्मलो हे बरं झालं. अस्सल मातीची अस्सल ग्रामीण भाषाबोली रोमारोमात भिनली. प्राथमिक शिक्षण कोल्हारला, ...

महामिने नेहमी म्हणत, आपण खेड्यात जन्मलो हे बरं झालं. अस्सल मातीची अस्सल ग्रामीण भाषाबोली रोमारोमात भिनली. प्राथमिक शिक्षण कोल्हारला, नंतर नगर, नाशिक असा त्यांचा प्रवास झाला. शिक्षणानंतर मुंबई व नाशिकला नोकरी केली. टेलिफोन खात्यात त्यांनी प्रदीर्घ सेवा दिली. पुढे नाशिकसारख्या साहित्यिक वातावरण असलेल्या शहरात त्यांची लेखणी चांगलीच खुलली. दरवर्षी जवळपास दोन डझन दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या कथा अगदी गेल्या वर्षीपर्यंत प्रसिद्ध होत होत्या. त्यांची कथा वाचताना वाचकाला कंटाळा येत नाही. आटोपशीर व खुसखुशीत संवाद, मजेशीर कथानकातील चटपटीत वळणे यामुळे त्यांना वाचकही उदंड लाभला. वाचकाला विरंगुळा देणे हेच आपले पहिले उद्दिष्ट असे ते मानत. त्यांच्या पहिल्याच "प्रवराकाठची माणसं" या कथासंग्रहाला १९८२ ला राज्य पुरस्कार मिळाला. इसापनीती विनोद, शंकराला फुटली शिंगे, बोलक्या हत्तीची करामत (दोन बाल कादंबऱ्या), दुसरा मधुचंद्र हा विनोदी कथासंग्रह अशा अनेक पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले. त्यांची ग्रंथसंपदा शंभरीजवळ आली होती. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा विमादि पटवर्धन पुरस्कार, लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार, ताराबाई मोडक पुरस्कार, गिरिजा कीर कथा पुरस्कार, स्मिता पाटील साहित्य पुरस्कार आणि सावनाचा जीवन गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले .त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघतच आहेत.

चंद्रकांत महामिने समाजाभिमुख होते. तात्यासाहेबांचे घर जसे नव्या लेखक-कवींना स्वागत करणारे होते, तसेच चंद्रकांतजींचे दरवाजेही सर्वांसाठी खुले असत. अनेक नवोदितांना त्यांनी लिहिते केले. नव्या लेखक-कवींना ऐकणे, वाचणे ही त्यांची भूक होती. नाशिक जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्ष, तसेच सटाणा, इगतपुरी, येवला, दिंडोरी येथील विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. नाशिकच्या साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात ते आबा आणि दादा या नावाने संबोधले जात. लेखनात ते खरोखरच दादा होते. अतिशय हसतमुख, नम्र, प्रेमळ असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. मैफलीत खट्याळ कोट्या करून हसवणारे महामिने सतत आनंदच वाटत गेले .त्यांच्या सहवासात येणारा प्रसन्न होऊन जायचा. पाच महिन्यांपूर्वी त्यांना आयुष्यात मोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी सुशीला यांचेही निधन झाल्याने ते खचलेच होते. ‘लोकमत’मध्येही त्यांनी प्रदीर्घ काळ सदर लेखन केले. त्यांच्या जाण्याने माझा पन्नास वर्षांच्या सहवास असलेला एक जिवलग हरवला, दूर गेला. पोरके झाल्यासारखे वाटत आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली.

- नरेश महाजन, ज्येष्ठ लेखक