शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

विनोदी लेखणीचा जादूगार चंद्रकांत महामिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:17 IST

महामिने नेहमी म्हणत, आपण खेड्यात जन्मलो हे बरं झालं. अस्सल मातीची अस्सल ग्रामीण भाषाबोली रोमारोमात भिनली. प्राथमिक शिक्षण कोल्हारला, ...

महामिने नेहमी म्हणत, आपण खेड्यात जन्मलो हे बरं झालं. अस्सल मातीची अस्सल ग्रामीण भाषाबोली रोमारोमात भिनली. प्राथमिक शिक्षण कोल्हारला, नंतर नगर, नाशिक असा त्यांचा प्रवास झाला. शिक्षणानंतर मुंबई व नाशिकला नोकरी केली. टेलिफोन खात्यात त्यांनी प्रदीर्घ सेवा दिली. पुढे नाशिकसारख्या साहित्यिक वातावरण असलेल्या शहरात त्यांची लेखणी चांगलीच खुलली. दरवर्षी जवळपास दोन डझन दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या कथा अगदी गेल्या वर्षीपर्यंत प्रसिद्ध होत होत्या. त्यांची कथा वाचताना वाचकाला कंटाळा येत नाही. आटोपशीर व खुसखुशीत संवाद, मजेशीर कथानकातील चटपटीत वळणे यामुळे त्यांना वाचकही उदंड लाभला. वाचकाला विरंगुळा देणे हेच आपले पहिले उद्दिष्ट असे ते मानत. त्यांच्या पहिल्याच "प्रवराकाठची माणसं" या कथासंग्रहाला १९८२ ला राज्य पुरस्कार मिळाला. इसापनीती विनोद, शंकराला फुटली शिंगे, बोलक्या हत्तीची करामत (दोन बाल कादंबऱ्या), दुसरा मधुचंद्र हा विनोदी कथासंग्रह अशा अनेक पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले. त्यांची ग्रंथसंपदा शंभरीजवळ आली होती. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा विमादि पटवर्धन पुरस्कार, लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार, ताराबाई मोडक पुरस्कार, गिरिजा कीर कथा पुरस्कार, स्मिता पाटील साहित्य पुरस्कार आणि सावनाचा जीवन गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले .त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघतच आहेत.

चंद्रकांत महामिने समाजाभिमुख होते. तात्यासाहेबांचे घर जसे नव्या लेखक-कवींना स्वागत करणारे होते, तसेच चंद्रकांतजींचे दरवाजेही सर्वांसाठी खुले असत. अनेक नवोदितांना त्यांनी लिहिते केले. नव्या लेखक-कवींना ऐकणे, वाचणे ही त्यांची भूक होती. नाशिक जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्ष, तसेच सटाणा, इगतपुरी, येवला, दिंडोरी येथील विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. नाशिकच्या साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात ते आबा आणि दादा या नावाने संबोधले जात. लेखनात ते खरोखरच दादा होते. अतिशय हसतमुख, नम्र, प्रेमळ असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. मैफलीत खट्याळ कोट्या करून हसवणारे महामिने सतत आनंदच वाटत गेले .त्यांच्या सहवासात येणारा प्रसन्न होऊन जायचा. पाच महिन्यांपूर्वी त्यांना आयुष्यात मोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी सुशीला यांचेही निधन झाल्याने ते खचलेच होते. ‘लोकमत’मध्येही त्यांनी प्रदीर्घ काळ सदर लेखन केले. त्यांच्या जाण्याने माझा पन्नास वर्षांच्या सहवास असलेला एक जिवलग हरवला, दूर गेला. पोरके झाल्यासारखे वाटत आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली.

- नरेश महाजन, ज्येष्ठ लेखक