शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
2
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
3
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
4
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
5
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
6
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
7
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
8
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
9
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
10
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
11
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
12
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
13
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या
14
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
15
Crocodile Torture: वसाहतीत घुसलेल्या मगरीसोबत तरुणांचं अमानुष कृत्य, आरोपींचा शोध सुरू!
16
Asia Cup Trophy Hidden Place In Abu Dhabi : पाकची नवी नौटंकी! आशिया कप ट्रॉफी अबुधाबीत लपवली?
17
भारतीय पुरुषांच्या 'स्पर्म क्वालिटी'ने अभ्यासक अवाक्; रिपोर्टमधून 'जगावेगळं'च चित्र समोर
18
आशियाई हवाई हद्दीत अचानक उडताना दिसली रशियाची आण्विक फायटर जेट्स, नेमकं प्रकरण काय?
19
काही सेकंदात होतात जळून खाक, खाजगी बसला आग लागल्यावर प्रवाशांचं वाचणं का होतं कठीण?
20
अरे बापरे! कर्मचाऱ्याच्या प्रेमात वेडी झाली मालकीण; लग्नानंतर 'त्याने'च लावला कोट्यवधींचा चुना

मदतीच्या घोषणेनंतर प्रशासनासमोर फेरमूल्यांकनाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 01:02 IST

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच्या नुक सान झालेल्या क्षेत्रासाठी मदतीची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील पीडित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनासमोर नुकसानग्रस्त क्षेत्राचे पुनर्मूल्यांकन करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

नाशिक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच्या नुक सान झालेल्या क्षेत्रासाठी मदतीची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील पीडित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनासमोर नुकसानग्रस्त क्षेत्राचे पुनर्मूल्यांकन करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.राज्यपालांनी शनिवारी (दि.१६) राज्यातील नुकसानग्रस्त शेतकºयांना खरीप पिकासाठी हेक्टरी ८ हजार रुपये व बारमाही तथा फलोत्पादन पिकांसाठी १८ हजार रुपये मदतीची घोषणा केली. परंतु, ही मदत दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसान झालेल्या क्षेत्रासाठीच देण्याची अट असल्याने मदतीची रक्कम प्रत्यक्ष शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आतापर्यंत संकलित केलल्या माहितीचे फेरमूल्यांकन करावे लागणार आहे.आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार जिल्हाभरातील सात लाख ७६ हजार ९७० शेतकºयांच्या एकूण ६ लाख ४७ हजार ३१५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध आहे. १ लाख ५६ हजार ३५०.७६ हेक्टर बागायती, ४ लाख ९ हजार २७५.८१ हेक्टर जिरायती व ८१ हजार ६८९ हेक्टर बारमाही तथा फलोत्पादन पिकक्षेत्राचा समावेश आहे. या माहितीचे राज्यपालांनी जाहीर केलेल्या मदत घोषणेच्या नियम निकषांनुसार पुनर्मूल्यांकन करून पीडित शेतकºयांपर्यंत लवकरात लवकर मदत पोहोचविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासना समोर असणार आहे. दरम्यान, शेतकºयांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी राज्यपाल शनिवारी नाशिक जिल्ह्णाचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेणार होते. परंतु, राज्यपालांनी पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून थेट मदतीची घोषणा केल्याने अतिवृष्टीने कोलमडून पडलेल्या शेतकºयांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.नुकसान लाखात, भरपाई हजारातपाटोदा : उभारी देण्यासाठी भरीव मदत मिळेल या आशेवर असलेल्या शेतकºयांना राज्यपालांनी हेक्टरी आठ हजार रु पये अशी तुटपुंजी मदत देण्याची घोषणा केल्याने शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. नुकसान लाखात झाले असून, मदत हजारात दिली जाणार असल्याने ही एक प्रकारे शेतकºयांची थट्टाच केली जात असल्याने नाराजी पसरली असून, शेतकºयांना अनुदान वाढवून देण्यात यावे अशी मागणी होत आहे.मका पिकासाठी हेक्टरी पस्तीस ते चाळीस हजार रु पये खर्च झालेला असून उत्पन्न सुमारे लाख रु पये निघाले असते. नुकसान लाखात होऊन भरपाई अनुदान हे फक्त आठ हजाररु पये जाहीर झाले आहे. तर द्राक्षबागासाठी हेक्टरी खर्च चार ते पाच लाखाच्या आसपास झालेला असून, हेक्टरी नुकसान वीस ते बावीस लाख रु पयांचे झालेले असताना हेक्टरी अठरा हजार असे तुटपुंजे अनुदान जाहीर झाल्याने शेतकºयांची बोळवण करून मोठी निराशा केली आहेनिर्यातक्षम द्राक्षबागेसाठी हेक्टरी पाच लाख रु पये खर्च झालेला आहे. मात्र परतीच्या पावसाने संपूर्ण द्राक्षबागेचा चुराडा झाला आहे नुकसानभरपाई अनुदान हेक्टरी अठरा हजार रु पये जाहीर झाल्याने ही एक प्रकारे शेतकºयांची थट्टाच केली आहे, असे द्राक्ष उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर बोरणारे यांनी म्हटले आहे.गेल्या तीन-चार वर्षांपासून दुष्काळी स्थितीचा सामना करीत असताना या वर्षी अमेरिकन लष्करी अळी व इतर संकटांशी दोन हात करून का होईना खरीप पिके चांगली आल्याने आनंदात असतानाच परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मका पिकाचे हेक्टरी लाख ते दीड लाख रु पयांचे नुकसान झालेले असताना जाहीर झालेली अनुदान रक्कम म्हणजे शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे.- रवींद्र शेळके, शेतकरी, ठाणगाव

टॅग्स :agricultureशेतीnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय