शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

रेल्वेने असे पेलले ऑक्सिजन वाहतुकीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:12 IST

नाशिकरोड : राज्यात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा पाहता विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन मागविण्यासाठी शासनाने रेल्वेची मदत घेतली. तब्बल ...

नाशिकरोड : राज्यात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा पाहता विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन मागविण्यासाठी शासनाने रेल्वेची मदत घेतली. तब्बल साडे अठराशे किलोमीटरचा प्रवास काही तासांत पूर्ण करण्याचे आव्हान रेल्वेने पेलले. त्यासाठी त्यांना काही तासांतच नियोजन करावे लागले व अवघड परिस्थिती, धोके पत्करून रेल्वेने ही मोहीम फत्ते केली.

रेल्वेने ऑक्सिजन एक्सप्रेसची वाहतूक एक आव्हान म्हणून स्वीकारले आणि कळंबोली ते विझाग आणि विझाग ते नाशिकपर्यंत पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस यशस्वीरित्या चालविली. द्रवरूप मेडिकल ऑक्सिजन टँकरच्या वाहतुकीसाठी रेल्वेला विनंती करताच रेल्वेने विविध ठिकाणी त्वरित रॅम्प बनविले. मुंबई टीमने कळंबोली येथे फक्त २४ तासांत रॅम्प बनविण्याचे आव्हान यशस्वीपणे पार पाडले. रो-रो सेवेच्या वाहतुकीसाठी रेल्वेला घाट सेक्शन, रोड ओव्हर ब्रिज, बोगदे, वक्र मार्ग, प्लॅटफॉर्म कॅनोपीज, ओव्हर हेड इक्विपमेंट आदी ठिकाणी बाधा लक्षात घेऊन संपूर्ण मार्गाचा नकाशा तयार केला. कसारा घाटाचा विचार करता रेल्वेने वसईमार्गे वाहतुकीचा नकाशा तयार केला.

वाहतुकीत धोका पत्करला

ऑक्सिजन हे क्रायोजेनिक आणि घातक रसायन असल्याने, रेल्वेला अचानक वेग वाढविणे, कमी करणे हे टाळण्याच्या आवश्यकतेसह मध्येच दाब (प्रेशर) तपासणे आवश्यक असते. जेव्हा ते भरलेल्या अवस्थेत असते तेव्हा दाब वाढतो. तरीही रेल्वेने हे आव्हान स्वीकारले. लोकांना प्रशिक्षण दिले आणि विशिष्ट आकाराचे टँकर वसई, सुरत, भुसावळ, नागपूर मार्गे विझागमध्ये नेऊ शकले. कळंबोली ते विझाग मधील अंतर १८५० किलोमीटरहून अधिक आहे. ते या ट्रेनने ५० तासांत पूर्ण केले. १०० टनांपेक्षा जास्त एलएमओ (लिक्विड मेडिकल ऑक्सिजन) असलेले ७ टँकर १० तासांत लोड केले गेले आणि केवळ २१ तासांत नागपुरात परत आणले. उर्वरित ४ टँकर केवळ १२ तासांत नागपूरहून नाशिकला पोहोचले.

वेळेत बचत

लांब पल्ल्यांसाठी ऑक्सिजनची वाहतूक रेल्वे गाड्यांद्वारे रस्ते वाहतुकीपेक्षा जलद होते. रेल्वेमार्गाने वाहतुकीस २ दिवस तर रस्त्यामार्गे ३ दिवस लागतात. रेल्वेगाड्या २४ तास धावू शकतात, परंतु ट्रक चालकांना थांबा घेण्याची गरज असते. या टँकरच्या वेगवान वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार केले गेले होते आणि हालचालींचे निरीक्षण सर्वोच्च पातळीवर केले गेले होते. गेल्या वर्षीही लॉकडाऊनमध्ये रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली आणि पुरवठा साखळी कायम ठेवली आणि आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्राची सेवा सुरू ठेवली.