शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणुकीला पोषक वातावरण निर्माण करण्याचे आव्हान

By admin | Updated: September 8, 2014 00:58 IST

गुंतवणुकीला पोषक वातावरण निर्माण करण्याचे आव्हान

 

नाशिक : वाढलेली वित्तीय तूट, कमी झालेला विकासदर आणि भाववाढीचा जटिल प्रश्न ही देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरील मोठी आव्हाने असून, गुंतवणुकीचे चक्र फिरण्यासाठी सरकारला धाडसी निर्णय घ्यावे लागणार आहेत. गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्मितीची गरज असल्याचेही प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रहास देशपांडे यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि मुक्तांगण यांच्या वतीने आयोजित व्याख्यानात बोलताना केले. कुसुमाग्रज स्मारकात आयोजित व्याख्यानात ‘भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने’ या विषयावर बोलताना देशपांडे यांनी सांगितले, महागाई, भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार आणि शैथिल्य यामुळे देश वैफल्याने ग्रासला होता. त्यामुळे त्वरित निर्णय आणि परिणाम यासाठी जनमानस अस्वस्थ आहे. गर्तेत सापडलेली अर्थव्यवस्था नवीन सरकार स्थापनेनंतर सावरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यासाठी आधीच्या सरकारनेही घेतलेल्या काही निर्णयांमुळे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. निर्यातवाढ वेगाने होत आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा दर ५.७ टक्क्यांवर गेला आहे. विदेशी गुंतवणूकही वाढते आहे. आज देशापुढे विजेचे मोठे संकट आहे. पुरेसा कोळसा उपलब्ध नाही. त्यामुळे विकासात अडसर येऊ शकतो. दूरगामी सकारात्मक परिणाम समोर आणायचे असतील, तर लोकाभिमुख आणि लोकानुनय निर्णय यात फरक करावा लागणार आहे. नव्या सरकारकडून अर्थव्यवस्थेविषयी काही सकारात्मक संदेश मिळू लागल्याचेही देशपांडे यांनी सांगितले. देशात गुंतवणूक वाढली, तर उत्पन्नात वाढ होणार आहे. रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. गुंतवणूक हाच सर्व प्रश्नांचा कळीचा मुद्दा असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. श्याम अष्टेकर यांनी केले. (प्रतिनिधी)