शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणुकीला पोषक वातावरण निर्माण करण्याचे आव्हान

By admin | Updated: September 8, 2014 00:58 IST

गुंतवणुकीला पोषक वातावरण निर्माण करण्याचे आव्हान

 

नाशिक : वाढलेली वित्तीय तूट, कमी झालेला विकासदर आणि भाववाढीचा जटिल प्रश्न ही देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरील मोठी आव्हाने असून, गुंतवणुकीचे चक्र फिरण्यासाठी सरकारला धाडसी निर्णय घ्यावे लागणार आहेत. गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्मितीची गरज असल्याचेही प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रहास देशपांडे यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि मुक्तांगण यांच्या वतीने आयोजित व्याख्यानात बोलताना केले. कुसुमाग्रज स्मारकात आयोजित व्याख्यानात ‘भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने’ या विषयावर बोलताना देशपांडे यांनी सांगितले, महागाई, भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार आणि शैथिल्य यामुळे देश वैफल्याने ग्रासला होता. त्यामुळे त्वरित निर्णय आणि परिणाम यासाठी जनमानस अस्वस्थ आहे. गर्तेत सापडलेली अर्थव्यवस्था नवीन सरकार स्थापनेनंतर सावरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यासाठी आधीच्या सरकारनेही घेतलेल्या काही निर्णयांमुळे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. निर्यातवाढ वेगाने होत आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा दर ५.७ टक्क्यांवर गेला आहे. विदेशी गुंतवणूकही वाढते आहे. आज देशापुढे विजेचे मोठे संकट आहे. पुरेसा कोळसा उपलब्ध नाही. त्यामुळे विकासात अडसर येऊ शकतो. दूरगामी सकारात्मक परिणाम समोर आणायचे असतील, तर लोकाभिमुख आणि लोकानुनय निर्णय यात फरक करावा लागणार आहे. नव्या सरकारकडून अर्थव्यवस्थेविषयी काही सकारात्मक संदेश मिळू लागल्याचेही देशपांडे यांनी सांगितले. देशात गुंतवणूक वाढली, तर उत्पन्नात वाढ होणार आहे. रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. गुंतवणूक हाच सर्व प्रश्नांचा कळीचा मुद्दा असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. श्याम अष्टेकर यांनी केले. (प्रतिनिधी)