शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

गुंतवणुकीला पोषक वातावरण निर्माण करण्याचे आव्हान

By admin | Updated: September 8, 2014 00:58 IST

गुंतवणुकीला पोषक वातावरण निर्माण करण्याचे आव्हान

 

नाशिक : वाढलेली वित्तीय तूट, कमी झालेला विकासदर आणि भाववाढीचा जटिल प्रश्न ही देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरील मोठी आव्हाने असून, गुंतवणुकीचे चक्र फिरण्यासाठी सरकारला धाडसी निर्णय घ्यावे लागणार आहेत. गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्मितीची गरज असल्याचेही प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रहास देशपांडे यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि मुक्तांगण यांच्या वतीने आयोजित व्याख्यानात बोलताना केले. कुसुमाग्रज स्मारकात आयोजित व्याख्यानात ‘भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने’ या विषयावर बोलताना देशपांडे यांनी सांगितले, महागाई, भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार आणि शैथिल्य यामुळे देश वैफल्याने ग्रासला होता. त्यामुळे त्वरित निर्णय आणि परिणाम यासाठी जनमानस अस्वस्थ आहे. गर्तेत सापडलेली अर्थव्यवस्था नवीन सरकार स्थापनेनंतर सावरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यासाठी आधीच्या सरकारनेही घेतलेल्या काही निर्णयांमुळे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. निर्यातवाढ वेगाने होत आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा दर ५.७ टक्क्यांवर गेला आहे. विदेशी गुंतवणूकही वाढते आहे. आज देशापुढे विजेचे मोठे संकट आहे. पुरेसा कोळसा उपलब्ध नाही. त्यामुळे विकासात अडसर येऊ शकतो. दूरगामी सकारात्मक परिणाम समोर आणायचे असतील, तर लोकाभिमुख आणि लोकानुनय निर्णय यात फरक करावा लागणार आहे. नव्या सरकारकडून अर्थव्यवस्थेविषयी काही सकारात्मक संदेश मिळू लागल्याचेही देशपांडे यांनी सांगितले. देशात गुंतवणूक वाढली, तर उत्पन्नात वाढ होणार आहे. रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. गुंतवणूक हाच सर्व प्रश्नांचा कळीचा मुद्दा असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. श्याम अष्टेकर यांनी केले. (प्रतिनिधी)