शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

पैशासाठी शेतकऱ्याच्या बॅँकेत चकरा

By admin | Updated: February 18, 2017 00:36 IST

नोटाबंदी : धनादेश वटत नसल्याने औषधोपचारासाठीही पैसे नाहीत

येवला : नोटाबंदीने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य अजूनही अडचणीत असून, राबराब राबून पिकविलेला शेतमाल विक्री केल्यानंतर त्याचा मोबदला धनादेशाने मिळतो. मात्र, महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटूनही धनादेश वटत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.  तालुक्यातील अंतरवेली येथील शेतकरी राजेंद्र खोडके यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री करून मिळालेला धनादेश बँक आॅफ महाराष्ट्रच्या येथील शाखेत दि. १३ जानेवारी रोजी जमा केला आहे. मात्र, एक महिना उलटूनही त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. खोडके यांना डोकेदुखीचा त्रास असल्याने नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. उपचारासाठी पैसे मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत.  लासलगाव येथे संबंधित बँकेला विचारले असता तुमचा धनादेश अद्यापपावेतो इकडे पोहोचलाच नाही, असे उत्तर मिळते तर संबंधित व्यापारी आम्ही तुम्हांला धनादेश दिला, आमचे काम संपले. तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधा, असे सांगितले जाते. त्यामुळे या शेतकऱ्याला औषधोपचार करणे मुस्कील झाले आहे.  येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विकल्यानंतर त्याचा धनादेश एक महिना पुढील तारखेचा मिळतो. म्हणून तालुक्यातील असंख्य शेतकरी आपला माल लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस नेत आहेत. तेथील व्यापारी माल विक्र ी केल्यानंतर त्याच तारखेचा धनादेश देत असल्याने शेतकऱ्याची सोय होते. कांदा विक्रीचे धनादेश लासलगाव येथील राष्ट्रीयीकृत बँकांचे न देता मुद्दामहून सहकारी बँकांचे दिले जातात. त्या सहकारी बँकेची शाखा ज्या गावात आहे, त्या गावात धनादेश जमा केल्यानंतर रक्कम दुसऱ्या दिवशी खात्यावर जमा होते. मात्र, येवला येथील कोणत्याही बँक शाखेत धनादेश जमा केल्यानंतर महिना उलटूनही रक्कम खात्यावर जमा होत नाही. त्यामुळे शेतकरी त्रासले आहेत.  परिसरातील शेतकऱ्यांचा गेल्या चार वर्षापासून सतत दुष्काळाचा सामना सुरू आहे. यावर्षी पावसाळा चांगला झाला. पिकेही जोमदार आली. उत्पादन चांगले निघाले. शेतमाल बाजार समितीत विक्री होण्याच्या वेळेसच नोटाबंदीचे सुलतानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले. नोटाबंदीने शेतमालाचे भाव कमालीचे घसरले. उत्पादन खर्च निघेल असेही भाव मिळेना. निवडणूक प्रचारात उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊन शेतकऱ्यांना साथ देण्यात येईल, अशा वल्गना करणाऱ्या शासनाने फक्त व्यापाऱ्यांना साथ दिली  आहे.  शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतमाल विक्रीची रक्कम व्यापाऱ्यांनी चोवीस तासाच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा कायदा करण्यात यावा, अशी मागणीही केली जात आहे. (वार्ताहर)