शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

पैशासाठी शेतकऱ्याच्या बॅँकेत चकरा

By admin | Updated: February 18, 2017 00:36 IST

नोटाबंदी : धनादेश वटत नसल्याने औषधोपचारासाठीही पैसे नाहीत

येवला : नोटाबंदीने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य अजूनही अडचणीत असून, राबराब राबून पिकविलेला शेतमाल विक्री केल्यानंतर त्याचा मोबदला धनादेशाने मिळतो. मात्र, महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटूनही धनादेश वटत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.  तालुक्यातील अंतरवेली येथील शेतकरी राजेंद्र खोडके यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री करून मिळालेला धनादेश बँक आॅफ महाराष्ट्रच्या येथील शाखेत दि. १३ जानेवारी रोजी जमा केला आहे. मात्र, एक महिना उलटूनही त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. खोडके यांना डोकेदुखीचा त्रास असल्याने नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. उपचारासाठी पैसे मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत.  लासलगाव येथे संबंधित बँकेला विचारले असता तुमचा धनादेश अद्यापपावेतो इकडे पोहोचलाच नाही, असे उत्तर मिळते तर संबंधित व्यापारी आम्ही तुम्हांला धनादेश दिला, आमचे काम संपले. तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधा, असे सांगितले जाते. त्यामुळे या शेतकऱ्याला औषधोपचार करणे मुस्कील झाले आहे.  येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विकल्यानंतर त्याचा धनादेश एक महिना पुढील तारखेचा मिळतो. म्हणून तालुक्यातील असंख्य शेतकरी आपला माल लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस नेत आहेत. तेथील व्यापारी माल विक्र ी केल्यानंतर त्याच तारखेचा धनादेश देत असल्याने शेतकऱ्याची सोय होते. कांदा विक्रीचे धनादेश लासलगाव येथील राष्ट्रीयीकृत बँकांचे न देता मुद्दामहून सहकारी बँकांचे दिले जातात. त्या सहकारी बँकेची शाखा ज्या गावात आहे, त्या गावात धनादेश जमा केल्यानंतर रक्कम दुसऱ्या दिवशी खात्यावर जमा होते. मात्र, येवला येथील कोणत्याही बँक शाखेत धनादेश जमा केल्यानंतर महिना उलटूनही रक्कम खात्यावर जमा होत नाही. त्यामुळे शेतकरी त्रासले आहेत.  परिसरातील शेतकऱ्यांचा गेल्या चार वर्षापासून सतत दुष्काळाचा सामना सुरू आहे. यावर्षी पावसाळा चांगला झाला. पिकेही जोमदार आली. उत्पादन चांगले निघाले. शेतमाल बाजार समितीत विक्री होण्याच्या वेळेसच नोटाबंदीचे सुलतानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले. नोटाबंदीने शेतमालाचे भाव कमालीचे घसरले. उत्पादन खर्च निघेल असेही भाव मिळेना. निवडणूक प्रचारात उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊन शेतकऱ्यांना साथ देण्यात येईल, अशा वल्गना करणाऱ्या शासनाने फक्त व्यापाऱ्यांना साथ दिली  आहे.  शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतमाल विक्रीची रक्कम व्यापाऱ्यांनी चोवीस तासाच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा कायदा करण्यात यावा, अशी मागणीही केली जात आहे. (वार्ताहर)