शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

केंद्रीय समिती करणार पाहणी

By admin | Updated: November 19, 2015 23:28 IST

दुष्काळ दौरा : जिल्हा प्रशासनाची धावपळ

नाशिक : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती गुरुवारी रात्री औरंगाबाद येथे दिल्लीहून दाखल झाली असून, शुक्रवारी नाशिक जिल्ह्णातील तीन तालुक्यांच्या टंचाईग्रस्त गावांची पाहणी करून ही समिती पुढे नगरकडे रवाना होणार आहे. या समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली असून, वरिष्ठ अधिकारी रात्रीच माहिती घेऊन औरंगाबादेत दाखल झाले आहेत. मानस चौधरी व शंतनू विश्वास अशी केंद्र सरकारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे असून, गुरुवारी सायंकाळी दिल्लीहून ते औरंगाबाद येथे दाखल झाले. त्यानंतर त्यांनी नाशिक व नगर जिल्ह्णातील दुष्काळसदृश परिस्थितीची विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडून माहिती घेतली. शुक्रवारी सकाळी ही समिती औरंगाबादहून येवला येथे येणार आहे. येवला तालुक्यातील दुष्काळसदृश काही गावांना भेटी देऊन ही समिती नांदगावच्याही दौऱ्यावर जाणार आहे व तेथून पुन्हा येवला मार्गे सिन्नर तालुक्यातील तीन गावांना भेट देऊन पुढे नगरकडे रवाना होईल. राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यात नजर पैसेवारीवरूनच दुष्काळसदृश गावांची घोषणा केल्यामुळे त्यावर उपाययोजनेसाठी केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी करण्यात आलेली आहे. त्यापार्श्वभूमीवर या समितीच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.